शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
2
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
3
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
4
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
5
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
6
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
7
संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
8
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
9
GST संकलनातून भरली सरकारची तिजोरी; डिसेंबरमध्ये 6% वाढीसह ₹1.74 लाख कोटी पार...
10
Municipal Election 2026: भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
11
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
12
Vastu Tips : नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका; नाही तर अडचणी येऊ शकतात
13
Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
14
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
15
या देशात पत्र पाठवण्याची सेवा बंद, ४०१ वर्षांची परंपरा संपली; असे करणारा जगातील पहिलाच देश ठरला
16
२०२६ मध्ये राज्यसभेतील गणित बदलणार; महाराष्ट्रातील एका जागेसह ७५ जागांचं भवितव्य ठरणार
17
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
18
निवडणुकीसाठी अपक्षांना पाव, वाटाणे अन् अक्रोड अशी १९४ मुक्त चिन्हे, 'रिक्षा' चिन्हाची मोठी मागणी
19
AI दिसत नाही, पण आहे सर्वत्र! आपल्या रोजच्या आयुष्यात AI ने नेमकं काय बदललं?
20
नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान बारमध्ये भीषण स्फोट, १० जणांचा होरपळून मृत्यू, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

'आम्ही चोऱ्या-माऱ्या करीत नाही, पोट भरण्यासाठी मेहनत करतो'; रोजगार हिरावलेल्या विक्रेत्यांचा टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2022 19:41 IST

Nagpur News मनपाने लंडन स्ट्रीट अतिक्रमणातून मोकळा केला. पण इंदूबाईसारखे शेकडो कुटुंबाचा रोजगार हिरावल्याने ते चिंतित आहेत.

ठळक मुद्दे या मार्केटवर जगताहेत शेकडो परिवार

नागपूर : लंडन स्ट्रीटचे आरक्षणही नव्हते तेव्हापासून खामल्याच्या बाजारात अद्रक, लसन विकून कुटुंब पोसले. ४२ वर्षं झालीत या बाजाराने आम्हाला जगविले. आम्ही लहान लहान विक्रेते आहोत, पोटापुरते कमवितो आणि जगतो. चोऱ्या माऱ्या करीत नाही साहेब, पोट भरण्यासाठी मेहनत करतो. किमान पोटावर तर नको लाथ मारा, या वेदना ७२ वर्षीय इंदूबाई माकोडे यांच्या आहेत. मनपाने लंडन स्ट्रीट अतिक्रमणातून मोकळा केला. पण इंदूबाईसारखे शेकडो कुटुंबाचा रोजगार हिरावल्याने ते चिंतित आहेत.

महापालिकेचा लंडन स्ट्रीट प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. या रस्त्यावर खामला चौकात भाजीपाला, फळ व मांस विक्रेते छोटीमोठी दुकान टाकून कुटुंबाची उपजीविका करीत होते. ३ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीनगर झोनच्या सहायक आयुक्तांनी सर्व विक्रेत्यांना नोटीस बजावून २४ तासांच्या आत दुकान रिकामे करण्याची नोटीस दिली. २४ तासांनंतर महापालिकेच्या वतीने अतिक्रमण कारवाई करण्यात आली. खामला चौकातील ६० ते ७० दुकाने हटविण्यात आली. लगेच पाईपलाईनसाठी रस्ता खोदून ठेवल्यामुळे दुकाने लावणेही त्यांना अवघड झाले आहे. महापालिकेचे अधिकारी पुन्हा दुकान लावाल तर दंडात्मक कारवाई करू, असा इशारा देऊन गेले आहेत. त्यामुळे दोन दिवसांपासून अतिक्रमण कारवाईच्या भीतीने आजूबाजूला लपूनछपून दुकान लावून रोजगार मिळवित आहेत. हा बाजार आजचा नाही कुणाला ३०, कुणाला ४० वर्षं या बाजारात दुकान लावताना झाली आहे. महापालिकेकडून झालेल्या या कारवाईला नागपूर फेरीवाला फुटपाथ दुकानदार संघटनेने अवैध असल्याचा आरोप केला आहे.

महापालिकेने गठित केलेल्या कमिटीद्वारे खामला बाजार हॉकर्स झोन

राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याकरिता महापालिकेने फेरीवाला कमिटी गठित केली होती. त्या कमिटीची २०१६ मध्ये झालेल्या बैठकीत खामला डीपी प्लॅननुसार रेल्वे लाईनच्या उत्तरेकडील संरक्षण भिंतीला लागून सोमलवार हायस्कूलकडे जाणारा रस्त्याचा भाग फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित केले होते. येथील विक्रेत्यांना २२८ रुपये भरून परवाने देखील दिले होते. सोबतच महापालिकेकडून कचरा संकलन करणारे ४०० रुपये वसूल करीत होते. संघटनेचे म्हणणे आहे की राज्य शासन व उच्च न्यायालयाने कमिटीला मान्यता दिली आहे. त्यामुळे अतिक्रमण कारवाईचा निर्णय चुकीचा आहे. आयुक्तांकडे यासंदर्भात निवेदन दिल्यावर ते ऐकुण घेण्याला तयार नाही.

मनपाने पर्यायी व्यवस्था करावी

या मार्गावर रेल्वे लाईन होती. तेव्हापासून आम्ही भाजी, फळ विक्री करीत आहोत. आजच्या घडीला ६० दुकानांच्या भरवशावर शेकडो लोकांचे कुटुंबं जगत आहेत. आमची दुकाने अतिक्रमणाच्या नावाखाली उचलून फेकल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे. आम्हालाही महापालिकेने पर्यायी व्यवस्था करून द्यावी, आमच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी राजेश ढोके, सोना अग्रवाल, सुमित शाह, दिनेश मदने आदी विक्रेत्यांनी केली आहे.

टॅग्स :businessव्यवसाय