शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

कर्नाटक सरकारने धरपकड सुरू करून मराठी लोकांवर अन्याय केला - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 11:45 IST

Maharashtra Winter Session 2022 : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी दणाणून सोडला परिसर

नागपूर : सीमा प्रांतात महाराष्ट्रातील लोकांची धरपकड सुरू आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाची बाजू स्पष्ट करावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज निदर्शने केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना केली. सध्या आज कर्नाटकमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक होती. यावेळी कर्नाटक सरकारने धरपकड सुरू करून मराठी लोकांवर अन्याय केला आहे. या घटनेचा आम्ही निषेध करीत असल्याचे पवार म्हणाले.

शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने हे आज बेळगावमध्ये गेले असता जिल्हा प्रशासनाने त्यांना मज्जाव केला आणि प्रवेशबंदीचा आदेश बजावला. या घटनेचा आम्ही निषेध करतो असे ते म्हणाले. राज्य सरकारने सभागृहात याचे स्पष्टीकरण देऊन सविस्तर माहिती महाराष्ट्राच्या जनतेला द्यावी अशी मागणी अम्ही करीत असल्याची माहिती त्यांनी दिली. लोकपाल विधेयक सभागृहात आल्यास त्यााचा अभ्यास केला जाईल. ते लोकहिताचे असल्यास त्याला विरोध करण्याचे काहीही कारण नाही. मात्र, हेतुपुरस्कर विरोधी पक्षाच्या नेत्यांना अडविण्यासाठी जर हे विधेयक असेल तर ते ही तपासले जाईल, असेही पवार म्हणाले.

तसेच, कोणता राजकीय पक्ष, कोणती संघटना, कोणते राजकीय नेते की जे महाराष्ट्रातील वातावरण खराब करायचा प्रयत्न करताहेत. कारण नसताना संशयाचं वातावरण तयार करायचं आणि लोकांच्या मनात संभ्रमावस्था, गैरसमज निर्माण करायचा हे यामागचं कारण आहे का, हेदेखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहासह राज्यातील जनतेला सांगावं, असे पवार म्हणाले.

अंबादास दानवे यांनीही राज्य सरकारचा निषेध केला आहे. ते म्हणाले की, कर्नाटकमध्ये आज मेळावा होता. एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना व धैर्यशील माने यांनी अटकाव करण्यात आला, या घटनेचा आम्ही निषेध करतो. सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, विदर्भाचा अनुषेश का वाढला याची ईडी सरकारने माहिती द्यावी अशी मागणी त्यांनी दिली.

खोक्याच्या माध्यमातून लोकशाही विकायला चाललेली सरकार - नाना पटोले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पत्रकार परिषदेत खोक्यांबाबत विचारलेल्या प्रश्नाला खोक्यांचा थर तयार होईल असा खोचक टोला विरोधीपक्षाला लगावला होता. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे सरकार खोक्यांच्या माध्यमातून सरकार विकायला चालले, असा टोला लावला. चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत चुकीचे विधान केले. त्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याऐवजी पत्रकार, पोलीस यांच्यावर गुन्हे दाखल झाले. मात्र, विधान करणाऱ्यांवर काहीही कारवाई झाली नाही. धान उत्पादक शेतकऱ्यांना मविआ आघाडीने बोनस देणे सुरु केले होते. या सरकारने तेदेखील थांबविले परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढताहेत, असे पटोले म्हणाले.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसKarnatakकर्नाटकbelgaonबेळगाव