शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

तुमचे कार्य समाजापर्यंत पोहचविण्याचाप्रयत्न करतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 01:01 IST

गेल्या काही दिवसांपासून नागपूरकरांना नागराज मंजुळे दिग्दर्शित व महानायक अमिताभ बच्चन अभिनय करीत असलेल्या चित्रपटाच्या चित्रीकरणाने भारावून सोडले आहे. संत्रानगरीच्या ज्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे त्या विजय बारसे यांच्याशी चित्रीकरणात घाम गाळणाऱ्या अमिताभ यांनी रविवारी भेट घेतली. रियल लाईफचे बारसे यांनी रिल लाईफमधल्या विजयशी झालेली भेट भारावणारी असल्याचे मनोगत व्यक्त केले.

ठळक मुद्देमहानायकाने विजय बारसे यांना दिला विश्वास चित्रीकरण स्थळावर झाली रिल व रियलची भेट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या काही दिवसांपासून नागपूरकरांना नागराज मंजुळे दिग्दर्शित व महानायक अमिताभ बच्चन अभिनय करीत असलेल्या चित्रपटाच्या चित्रीकरणाने भारावून सोडले आहे. संत्रानगरीच्या ज्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे त्या विजय बारसे यांच्याशी चित्रीकरणात घाम गाळणाऱ्या अमिताभ यांनी रविवारी भेट घेतली. रियल लाईफचे बारसे यांनी रिल लाईफमधल्या विजयशी झालेली भेट भारावणारी असल्याचे मनोगत व्यक्त केले.गेल्या आठ-दहा दिवसांपासून नागपुरात या चित्रपटाचे चित्रीकरण होत आहे. मात्र या काळात विजय बारसे शहरात नव्हते. शनिवारी ते शहरात परतले तेव्हा नागराज यांनी अमिताभ यांच्याशी भेटण्याचे आमंत्रण बारसे यांना दिले. त्यानुसार रविवारी सेंट जॉन शाळेत असलेल्या चित्रीकरण स्थळीच बारसे यांनी कुटुंबासह जाऊन बच्चन यांची भेट घेतली. यावेळी पत्नी प्रा. रंजना, मुलगा डॉ. अभिजित व प्रियेश सोबत असल्याचे त्यांनी सांगितले. तब्बल १० मिनिटे आमच्यामध्ये धावती चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘तुम्ही अनेक चित्रपटात विजय या नावाने काम केले. माझेही नाव विजय आहे’ असे सांगताच त्यांच्या चेहºयावर हास्य फुलले. यावेळी अमिताभ यांनी, ‘तुमच्या जीवनावर, केलेल्या कार्यावर होत असलेल्या चित्रपटात काम करायला मिळत असून याचा फार आनंद होत आहे’ असे सांगितले. ‘चित्रपटातून तुमचे कार्य व तुमचा संदेश समाजापर्यंत पोहचविण्याचा पूर्ण प्रयत्न करेन’ असा विश्वास त्यांनी दिल्याचे बारसे यांनी सांगितले.अमिताभ यांना भेटण्यासाठी यापूर्वी त्यांच्या घरी व कार्यालयात गेलो होतो. मात्र त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट होऊ शकली नव्हती. यावेळी मात्र तो क्षण आल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. ज्यांना भेटण्यासाठी लोक नेहमी उत्सुक असतात त्या महानायकाशी कुटुंबासह प्रत्यक्ष भेट होणे, हे नशीबच होय, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मात्र गेली ४०-५० वर्षे केलेल्या कार्यामुळे हे शक्य झाले याचे समाधान वाटते. आपण अभावग्रस्तांसाठी, वंचितांसाठी हवे ते कार्य करू शकतो, हा संदेश समाजापर्यंत पोहचणे महत्त्वाचे आहे. महानायकाच्या माध्यमातून हा संदेश प्रभावीपणे पोहचतो आहे, याचे खरोखरच समाधान वाटत असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. या कार्यामुळेच महानायकाची शुटींग नागपुरात होत आहे, ही नागपूरकर म्हणून गौरवास्पद असल्याची भावनाही त्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

टॅग्स :Amitabh Bachchanअमिताभ बच्चनnagpurनागपूर