शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

तुमचे कार्य समाजापर्यंत पोहचविण्याचाप्रयत्न करतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 01:01 IST

गेल्या काही दिवसांपासून नागपूरकरांना नागराज मंजुळे दिग्दर्शित व महानायक अमिताभ बच्चन अभिनय करीत असलेल्या चित्रपटाच्या चित्रीकरणाने भारावून सोडले आहे. संत्रानगरीच्या ज्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे त्या विजय बारसे यांच्याशी चित्रीकरणात घाम गाळणाऱ्या अमिताभ यांनी रविवारी भेट घेतली. रियल लाईफचे बारसे यांनी रिल लाईफमधल्या विजयशी झालेली भेट भारावणारी असल्याचे मनोगत व्यक्त केले.

ठळक मुद्देमहानायकाने विजय बारसे यांना दिला विश्वास चित्रीकरण स्थळावर झाली रिल व रियलची भेट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या काही दिवसांपासून नागपूरकरांना नागराज मंजुळे दिग्दर्शित व महानायक अमिताभ बच्चन अभिनय करीत असलेल्या चित्रपटाच्या चित्रीकरणाने भारावून सोडले आहे. संत्रानगरीच्या ज्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे त्या विजय बारसे यांच्याशी चित्रीकरणात घाम गाळणाऱ्या अमिताभ यांनी रविवारी भेट घेतली. रियल लाईफचे बारसे यांनी रिल लाईफमधल्या विजयशी झालेली भेट भारावणारी असल्याचे मनोगत व्यक्त केले.गेल्या आठ-दहा दिवसांपासून नागपुरात या चित्रपटाचे चित्रीकरण होत आहे. मात्र या काळात विजय बारसे शहरात नव्हते. शनिवारी ते शहरात परतले तेव्हा नागराज यांनी अमिताभ यांच्याशी भेटण्याचे आमंत्रण बारसे यांना दिले. त्यानुसार रविवारी सेंट जॉन शाळेत असलेल्या चित्रीकरण स्थळीच बारसे यांनी कुटुंबासह जाऊन बच्चन यांची भेट घेतली. यावेळी पत्नी प्रा. रंजना, मुलगा डॉ. अभिजित व प्रियेश सोबत असल्याचे त्यांनी सांगितले. तब्बल १० मिनिटे आमच्यामध्ये धावती चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘तुम्ही अनेक चित्रपटात विजय या नावाने काम केले. माझेही नाव विजय आहे’ असे सांगताच त्यांच्या चेहºयावर हास्य फुलले. यावेळी अमिताभ यांनी, ‘तुमच्या जीवनावर, केलेल्या कार्यावर होत असलेल्या चित्रपटात काम करायला मिळत असून याचा फार आनंद होत आहे’ असे सांगितले. ‘चित्रपटातून तुमचे कार्य व तुमचा संदेश समाजापर्यंत पोहचविण्याचा पूर्ण प्रयत्न करेन’ असा विश्वास त्यांनी दिल्याचे बारसे यांनी सांगितले.अमिताभ यांना भेटण्यासाठी यापूर्वी त्यांच्या घरी व कार्यालयात गेलो होतो. मात्र त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट होऊ शकली नव्हती. यावेळी मात्र तो क्षण आल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. ज्यांना भेटण्यासाठी लोक नेहमी उत्सुक असतात त्या महानायकाशी कुटुंबासह प्रत्यक्ष भेट होणे, हे नशीबच होय, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मात्र गेली ४०-५० वर्षे केलेल्या कार्यामुळे हे शक्य झाले याचे समाधान वाटते. आपण अभावग्रस्तांसाठी, वंचितांसाठी हवे ते कार्य करू शकतो, हा संदेश समाजापर्यंत पोहचणे महत्त्वाचे आहे. महानायकाच्या माध्यमातून हा संदेश प्रभावीपणे पोहचतो आहे, याचे खरोखरच समाधान वाटत असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. या कार्यामुळेच महानायकाची शुटींग नागपुरात होत आहे, ही नागपूरकर म्हणून गौरवास्पद असल्याची भावनाही त्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

टॅग्स :Amitabh Bachchanअमिताभ बच्चनnagpurनागपूर