शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

नागपूर जिल्ह्यात वेकोली अधिकाऱ्यांनी कापसाचे उभे पीक कापून बनवला रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 10:40 IST

वेकोलिच्या सिल्लेवाडा (ता. सावनेर) सब एरिया कार्यालयांतर्गत भानेगाव (ता. सावनेर) खुल्या कोळसा खाणीचे (ओपन कास्ट माईन) काम सुरू केले आहे. या खाणीपर्यंत जाण्यासाठी रस्ता हवा असल्याने वेकोलि अधिकाऱ्यांनी कपाशीच्या शेतात जेसीबी चालवून रस्ता तयार केला.

ठळक मुद्देशेतकऱ्याचे किमान ५० हजार रुपयांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वेकोलिच्या सिल्लेवाडा (ता. सावनेर) सब एरिया कार्यालयांतर्गत भानेगाव (ता. सावनेर) खुल्या कोळसा खाणीचे (ओपन कास्ट माईन) काम सुरू केले आहे. या खाणीपर्यंत जाण्यासाठी रस्ता हवा असल्याने वेकोलि अधिकाऱ्यांनी भानेगाव शिवारातील शेतकऱ्याच्या कपाशीच्या शेतात जेसीबी चालवून बळजबरीने रस्ता तयार केला. हा प्रकार लक्षात येताच शेतकऱ्याने याला विरोध करीत सदर काम बंद पाडले. तरीही यात शेतकऱ्याचे किमान ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. हा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. विशेष म्हणजे, याबाबत वेकोलि प्रशासनाने संबंधित शेतकऱ्याला कोणतीही लेखी अथवा तोंडी पूर्वसूचना दिली नव्हती. वेकोलि अधिकाऱ्यांच्या या करंटेपणामुळे परिसरातील शेतकऱ्यांत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.वेकोलि प्रशासनाने भानेगाव परिसरात कोळशाच्या खुल्या खाणीच्या कमाला सुरुवात केली आहे. या खाणीसाठी भानेगाव परिसरातील १३१.९० हेक्टर शेतीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. वेकोलि प्रशासनाने ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अधिग्रहित केल्या आहेत, त्यातील बहुतांश शेतकऱ्यांसोबत शासकीय नियमानुसार करारनामा केला आहे. यातील काही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीचा मोबदला देण्यात आला असून, काही प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना नोकरीही दिली आहे.देवराव ढोके, रा. भानेगाव, ता. सावनेर यांची भानेगाव शिवारात साडेतीन एकर शेती आहे. वेकोलि प्रशासनाने ढोके यांचीही शेती कोळसा खाणीसाठी अधिग्रहित केली आहे. वेकोलिने त्यांच्यासोबतही नियमानुसार करारनामा केला. परंतु, त्यांना त्यांच्या शेतजमिनीचा मोबदला अद्यापही देण्यात आला नाही. शिवाय, त्यांच्या वारसांना वेकोलित नोकरीही देण्यात आली नाही. उपजीविकेचे शेतीव्यतिरिक्त दुसरे कोणतेही साधन नसल्याने ढोके यांनी त्यांच्या मालकीच्या शेतीवरील ताबा सोडला नाही. परिणामी, देवराव ढोके यांनी यावर्षी साडेतीन एकर शेतात कपाशीची लागवड केली.आधी मोबदला द्यावावेकोलि प्रशासनाने खुल्या कोळसा खाणीसाठी आपली शेती २००७ साली अधिग्रहित केली. त्यानंतर करारनामा करण्यात आला. मात्र, वेकोलि प्रशासनाने तेव्हापासून आजवर आपल्याला अधिग्रहित शेतीचा मोबदला दिला नाही. मग आपण शेतीचा ताबा सोडायचा कसा, असा प्रतिप्रश्नही देवराव ढोके यांनी लोकमतशी बोलताना केला. आपल्या कुटुंबाची उपजीविका ही शेतीच्या अवलंबून आहे. उपजीविकेचे दुसरे कोणतेही साधन नाही. तेव्हा वेकोलि प्रशासनाने आपल्याला आधी मोबदला द्यावा, नंतर जमीन ताब्यात घ्यावी, अशी मागणीही देवराव ढोके यांनी केली आहे.नुकसानभरपाई देणार कोण?हा रस्ता तयार करण्यापूर्वी वेकोलि प्रशासनाने देवराव ढोके यांना कोणतीही लेखी अथवा तोंडी पूर्वसूचना दिली नाही. त्यातच हा रस्ता तयार करण्यासाठी जेसीबीच्या मदतीने शेतातील कपाशीची झाडे उपटून फेकण्यात आली. त्यात किमान ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. याची जबाबदारी स्वीकारणार कोण, असा प्रश्न देवराव ढोके यांनी उपस्थित केला. दुसरीकडे, या प्रकाराबाबत आपल्याला कुठलीही माहिती नाही, असे वेकोलिचे नागपूर कार्यालयातील व्यवस्थापक गेडाम यांनी सांगितले. त्यामुळे हा रस्ता कुणाच्या आदेशान्वये तयार करण्यात आला, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

टॅग्स :agricultureशेतीCrimeगुन्हा