शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

पाणीपुरवठा कराराचे होणार ‘आॅडिट’

By admin | Updated: May 15, 2014 02:10 IST

नागरिकांना शुद्ध व पुरेसे पाणी मिळावे यायासाठी महापालिकेने पाणीपुरवठा व्यवस्थेचे खासगीकरण केले.

कॅगची टीम मनपात दाखल : कागदपत्रांची तपासणी सुरू

नागपूर :

नागरिकांना शुद्ध व पुरेसे पाणी मिळावे यायासाठी महापालिकेने पाणीपुरवठा व्यवस्थेचे खासगीकरण केले. यासाठी महापालिकेने आॅरेंज सिटी वॉटर (ओसीडब्ल्यू) शी करार केला. मात्र या करारात असलेल्या त्रुटी व जलप्रदाय विभागातील काही अधिकार्‍यांची भूमिका संशयास्पद आहे. कंट्रोलर अ‍ॅण्ड आॅडिटर जनरल आॅफ इंडिया (कॅग) च्या पाच सदस्यीय पथकाला पाणीपुरवठा करारात काही त्रुटी आढळल्या आहेत. यामुळे कॅगच्या पथकाने या कराराच्या अंकेक्षणात चांगलाच रस घेतला आहे. २००१ ते २०१४ च्या वार्षिक आॅडिटसाठी कॅगची चमू महापालिकेत दाखल झाली आहे. ४५ दिवस हे पथक महापालिकेच्या विविध विभागातील कागदपत्रे व करारांची तपासणी करणार आहे. पथकाचे २० दिवसांचे काम पूर्ण झाले आहे. कॅगच्या पथकात वरिष्ठ आॅडिट अधिकारी, सहायक आॅडिट अधिकारी व तीन वरिष्ठ आॅडिटर यांचा समावेश आहे.

या अधिकार्‍यांची बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जलप्रदाय विभागाची कार्यप्रणाली व पाणीपुरवठा कराराबाबत पथक जास्त उत्सुक दिसून येत आहे. या पथकाने संबंधित कराराची संपूर्ण कागदपत्रे आपल्या ताब्यात घेतली आहेत. ३ जून २०११ रोजी महापालिका, नागपूर इन्व्हायरन्मेंटल सर्व्हिसेस लिमिटेड (एनईएसएल), महापालिका आयुक्त, ओसीडब्ल्यू यांच्यात करार झाला. करारांतर्गत २५ वर्षांसाठी महापालिकेने पाणीपुरवठा व्यवस्था खासगी हातांमध्ये सोपविली. कॅगच्या पथकाने जेव्हा सुरुवातीला या करारावर नजर टाकली तेव्हा त्यांना यात बर्‍याच त्रुटी आढळून आल्या. यानंतर त्यांनी कराराची सर्व कागदपत्रे मागविली.

ओसीडब्ल्युकडून महापालिकेला दररोज १८० ते १९० एमएलडी पाण्याचे बिलिंग होत आहे. मात्र, महापालिका प्रत्यक्षात २५० एमएलडी पाण्यासाठी ओसीडब्ल्यूला शुल्क देत आहे. त्यामुळे महापालिकेला ६० ते ७० एमएलडी पाण्याच्या बिलिंगचे नुकसान होत आहे. महापालिकेचा किमान जलकर पाच रुपये आहे. असे असतानाही करारानुसार ७.९० रुपये प्रति युनिट दिले जात आहेत. एवढेच नव्हे तर वीज बिलापोटी ५० कोटी, कच्चे पाण्यासाठी १४ कोटी व टँकरने पाणीपुरवठ्यासाठी ८ कोटी रुपये हा एकूणच भार महापालिका उचलत आहे. शहरात दररोज ६४० एमएलडी पाण्याच्या पुरवठा होतो. प्रत्यक्षात बिलिंग २०० एमएलडीहून कमी होत आहे. विशेष म्हणजे एवढे सर्व असतानाही महापालिकेने २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेवरील खर्च ३८७.८६ कोटींहून वाढवून ५६६.०९ कोटी रुपये करण्यास मंजुरी देण्याची तयारी केली आहे. (प्रतिनिधी)