शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

नागपूर विभागातील जलसाठे ४८.९२ टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 21:17 IST

नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह व कामठी खैरी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्प ८० टक्के भरले आहे.

ठळक मुद्देपाणीसाठ्यांची स्थिती उत्तमतोतलाडोह, खैरी, असोलामेंढा ८० टक्के भरले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यंदा चांगला पाऊस होत असल्याने विभागातील जलसाठ्यांची स्थिती चांगली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच विभागातील मोठे प्रकल्प अर्धे भरले आहेत. यातही नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह व कामठी खैरी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्प ८० टक्के भरले आहे, हे विशेष.नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प आहेत. याची एकूण पाणीसाठवण क्षमता ३५५२.८९ दलघमी इतकी आहे. यामध्ये आजच्या तारखेला ९ जुलै रोजी १७३७.९२ दसघमी म्हणजेच ४८.९२ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. जिल्ह्यानुसार प्रकल्पांचा विचार केल्यास नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह प्रकल्प ७९.८५ टक्के भरला आहे. कामठी खैरी ९२.२९ टक्के, वडगाव ५५.११ टक्के, रामटेक खिंडसी १७.८८ टक्के, लोअर नांद वणा २४.४८ टक्के भरले आहे. गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह ३१.२५ टक्के, सिरपूर २३.७८ टक्के, पुजारी टोला ४५.२३ टक्के, धापेवाडा बॅरेज टप्पा २ प्रकल्प १८.८० टक्के भरले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा ८४.१२ टक्के, गडचिरोलीतील दिना प्रकल्प २५.९ टक्के भरले आहे. वर्धा जिल्ह्यातील बोर धरण ४३.१६ टक्के, धाम ४०.७३ टक्के, पोथरा २५.२९ टक्के आणि लोअर वर्धा ६४.९५ टक्के भरले आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द २२.८६ टक्के, तर बावनथडी प्रकल्प ३०.६९ टक्के भरला आहे.मध्यम व लघु प्रकल्पांचीही स्थिती चांगलीनागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांप्रमाणेच मध्यम व लघु प्रकल्पही हळूहळू भरत आहे. नागपूर विभागात एकूण ४० मध्यम प्रकल्प आहेत. त्यात आजच्या तारखेला ३५.६० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तसेच ३१४ लघु प्रकल्प असून ती आजच्या तारखेला ३२.०२ टक्के भरले.मागील पाच वर्षात सर्वाधिक पाणीसाठाविभागातील १८ मोठ्या प्रकल्पांचा विचार केल्यास मागील पाच वर्षात आजच्याच तारखेला असलेला पाणीसाठा यंदा सर्वाधिक आहे, हे विशेष. विभागातील मोठ्या प्रकल्पांमधील एकूण पाणीसाठा क्षमता ३५५२.८९ दलघमी इतकी आहे. यात गेल्या वर्षी २०१९ मध्ये ९ जुलै रोजी २७०.१७ म्हणजे केवळ ७.६० टक्के इतके पाणी होते. २०१८ मध्ये ७३७.५३ दलघमी, २०१७ मध्ये ३६२.५० टक्के, २०१६ मध्ये ८४४.३८ टक्के आणि २०१५ मध्ये ९४१.५ टक्के इतका पाणीसाठा होता.

 

 

 

टॅग्स :Waterपाणी