शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नागपूर विभागातील जलसाठे ४८.९२ टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 21:17 IST

नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह व कामठी खैरी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्प ८० टक्के भरले आहे.

ठळक मुद्देपाणीसाठ्यांची स्थिती उत्तमतोतलाडोह, खैरी, असोलामेंढा ८० टक्के भरले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यंदा चांगला पाऊस होत असल्याने विभागातील जलसाठ्यांची स्थिती चांगली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच विभागातील मोठे प्रकल्प अर्धे भरले आहेत. यातही नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह व कामठी खैरी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्प ८० टक्के भरले आहे, हे विशेष.नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प आहेत. याची एकूण पाणीसाठवण क्षमता ३५५२.८९ दलघमी इतकी आहे. यामध्ये आजच्या तारखेला ९ जुलै रोजी १७३७.९२ दसघमी म्हणजेच ४८.९२ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. जिल्ह्यानुसार प्रकल्पांचा विचार केल्यास नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह प्रकल्प ७९.८५ टक्के भरला आहे. कामठी खैरी ९२.२९ टक्के, वडगाव ५५.११ टक्के, रामटेक खिंडसी १७.८८ टक्के, लोअर नांद वणा २४.४८ टक्के भरले आहे. गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह ३१.२५ टक्के, सिरपूर २३.७८ टक्के, पुजारी टोला ४५.२३ टक्के, धापेवाडा बॅरेज टप्पा २ प्रकल्प १८.८० टक्के भरले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा ८४.१२ टक्के, गडचिरोलीतील दिना प्रकल्प २५.९ टक्के भरले आहे. वर्धा जिल्ह्यातील बोर धरण ४३.१६ टक्के, धाम ४०.७३ टक्के, पोथरा २५.२९ टक्के आणि लोअर वर्धा ६४.९५ टक्के भरले आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द २२.८६ टक्के, तर बावनथडी प्रकल्प ३०.६९ टक्के भरला आहे.मध्यम व लघु प्रकल्पांचीही स्थिती चांगलीनागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांप्रमाणेच मध्यम व लघु प्रकल्पही हळूहळू भरत आहे. नागपूर विभागात एकूण ४० मध्यम प्रकल्प आहेत. त्यात आजच्या तारखेला ३५.६० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तसेच ३१४ लघु प्रकल्प असून ती आजच्या तारखेला ३२.०२ टक्के भरले.मागील पाच वर्षात सर्वाधिक पाणीसाठाविभागातील १८ मोठ्या प्रकल्पांचा विचार केल्यास मागील पाच वर्षात आजच्याच तारखेला असलेला पाणीसाठा यंदा सर्वाधिक आहे, हे विशेष. विभागातील मोठ्या प्रकल्पांमधील एकूण पाणीसाठा क्षमता ३५५२.८९ दलघमी इतकी आहे. यात गेल्या वर्षी २०१९ मध्ये ९ जुलै रोजी २७०.१७ म्हणजे केवळ ७.६० टक्के इतके पाणी होते. २०१८ मध्ये ७३७.५३ दलघमी, २०१७ मध्ये ३६२.५० टक्के, २०१६ मध्ये ८४४.३८ टक्के आणि २०१५ मध्ये ९४१.५ टक्के इतका पाणीसाठा होता.

 

 

 

टॅग्स :Waterपाणी