शहरं
Join us  
Trending Stories
1
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
2
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
3
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
4
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
5
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
6
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
7
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
8
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
9
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
10
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
11
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
12
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
13
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
14
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
15
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
16
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
17
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
18
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
19
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
20
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक

नागपूर विभागातील जलसाठे ४८.९२ टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 21:17 IST

नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह व कामठी खैरी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्प ८० टक्के भरले आहे.

ठळक मुद्देपाणीसाठ्यांची स्थिती उत्तमतोतलाडोह, खैरी, असोलामेंढा ८० टक्के भरले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यंदा चांगला पाऊस होत असल्याने विभागातील जलसाठ्यांची स्थिती चांगली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच विभागातील मोठे प्रकल्प अर्धे भरले आहेत. यातही नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह व कामठी खैरी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्प ८० टक्के भरले आहे, हे विशेष.नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प आहेत. याची एकूण पाणीसाठवण क्षमता ३५५२.८९ दलघमी इतकी आहे. यामध्ये आजच्या तारखेला ९ जुलै रोजी १७३७.९२ दसघमी म्हणजेच ४८.९२ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. जिल्ह्यानुसार प्रकल्पांचा विचार केल्यास नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह प्रकल्प ७९.८५ टक्के भरला आहे. कामठी खैरी ९२.२९ टक्के, वडगाव ५५.११ टक्के, रामटेक खिंडसी १७.८८ टक्के, लोअर नांद वणा २४.४८ टक्के भरले आहे. गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह ३१.२५ टक्के, सिरपूर २३.७८ टक्के, पुजारी टोला ४५.२३ टक्के, धापेवाडा बॅरेज टप्पा २ प्रकल्प १८.८० टक्के भरले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा ८४.१२ टक्के, गडचिरोलीतील दिना प्रकल्प २५.९ टक्के भरले आहे. वर्धा जिल्ह्यातील बोर धरण ४३.१६ टक्के, धाम ४०.७३ टक्के, पोथरा २५.२९ टक्के आणि लोअर वर्धा ६४.९५ टक्के भरले आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द २२.८६ टक्के, तर बावनथडी प्रकल्प ३०.६९ टक्के भरला आहे.मध्यम व लघु प्रकल्पांचीही स्थिती चांगलीनागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांप्रमाणेच मध्यम व लघु प्रकल्पही हळूहळू भरत आहे. नागपूर विभागात एकूण ४० मध्यम प्रकल्प आहेत. त्यात आजच्या तारखेला ३५.६० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तसेच ३१४ लघु प्रकल्प असून ती आजच्या तारखेला ३२.०२ टक्के भरले.मागील पाच वर्षात सर्वाधिक पाणीसाठाविभागातील १८ मोठ्या प्रकल्पांचा विचार केल्यास मागील पाच वर्षात आजच्याच तारखेला असलेला पाणीसाठा यंदा सर्वाधिक आहे, हे विशेष. विभागातील मोठ्या प्रकल्पांमधील एकूण पाणीसाठा क्षमता ३५५२.८९ दलघमी इतकी आहे. यात गेल्या वर्षी २०१९ मध्ये ९ जुलै रोजी २७०.१७ म्हणजे केवळ ७.६० टक्के इतके पाणी होते. २०१८ मध्ये ७३७.५३ दलघमी, २०१७ मध्ये ३६२.५० टक्के, २०१६ मध्ये ८४४.३८ टक्के आणि २०१५ मध्ये ९४१.५ टक्के इतका पाणीसाठा होता.

 

 

 

टॅग्स :Waterपाणी