शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

नागपुरात पाणी कपात सुरुच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:24 IST

नागपूरसह विदर्भात पाऊस चांगला पडत आहे. पावसाचा बॅकलॉग दूर झाला असला तरी शहराला ज्या तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. तेथील परिस्थिती मात्र अजुनही सुधारलेली नाही. परिणामी एक दिवसा आड पाणी सोडण्याचा निर्णय आणखी २२ ऑगस्टपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय मनपा प्रशासनने घेतला आहे.

ठळक मुद्देनवेगाव खैरीतील पाणीसाठा घटला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरसह विदर्भात पाऊस चांगला पडत आहे. पावसाचा बॅकलॉग दूर झाला असला तरी शहराला ज्या तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. तेथील परिस्थिती मात्र अजुनही सुधारलेली नाही. परिणामी एक दिवसा आड पाणी सोडण्याचा निर्णय आणखी २२ ऑगस्टपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय मनपा प्रशासनने घेतला आहे. जेव्हापासून पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे तेव्हापासून दर सोमवारी तलावातील साठ्याचा आढावा घेतला जातो. त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जातो.शहरात गेल्या दोन आठवड्यांपासून पाऊस सुरु आहे. परंतु ना तोतलाडोह तलाव भरने ना नवेगाव खैरीतील पाणीसाठ्याची स्थिती सुधारली. नवेगाव खैरीमध्ये ५ ऑगस्ट रोजी पाण्याची पातळी ३१८.५५ मीटर नोंदवण्यात आली आहे. तर तोतलाडोह तलावातील पातळी मृत साठ्याच्याही खाली गेले आहे. येथील मृतसाठ्याची पातळी १५१ एमएमक्यूब आहे. या स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी आणखी ३० एमएमक्यूब पाण्याची आवश्यकता आहे. या दोन्ही तलावावर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अवलंबून आहे. या पावसाळ्यात हे दोन्ही तलाव भरले नाहीत तर शहरात एक दिवसा आड पाणीपुरवठ्याचा निर्णय आणखी पुढे वाढवला जाऊ शकतो.सोमवारी मनपा पाणीपुरवठा विभाग आणि ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत पाण्याच्या पातळीवर चर्चा झाली. तेव्हा पाण्याची पातळी वाढण्याऐवजी आणखी घटल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला. जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी सांगितले की, पाणी कपात सुरु राहील. धरणातील पाणीसाठ्यात वाढ न होणे ही शहरासाठी चिंतेची बाब आहे. भविष्यात काय होईल, त्यावर आताच काही बोलणे योग्य होणार नाही.वाढण्याऐवजी घटत आहे पातळीनवेगाव खैरी येथील पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे एक दिवसा आड कपातीचा निर्णय पेंचशी जुळलेल्या शहरातील भागांसाठी घेण्यात आला. शहराती जवळपास ७० टक्के भागाच पेंचमधून दररोज ५०० एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. पेंचमध्ये नवेगाव खैरीमधून पाणी येते. नवेगाव खैरीमध्ये १५ जुलै रोजी जलस्तर ३१८.३६ मीटर होते. आठवडाभरानंतर २९ जुलै रोजी ते वाढून ३१८.६० मीटरपर्यंत पोहोचले. परंतु ५ ऑगस्ट रोजी येथील जलस्तर ०.०५ मीटर खाली जाऊन ३१८.५५ मीटरवर पोहोचले. ही चिंतेची बाब आहे. भर पावसाळ्यात ही स्थिती असेल तर पुढे काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाwater shortageपाणीकपात