शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

नागपुरात पाणी कपात सुरुच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:24 IST

नागपूरसह विदर्भात पाऊस चांगला पडत आहे. पावसाचा बॅकलॉग दूर झाला असला तरी शहराला ज्या तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. तेथील परिस्थिती मात्र अजुनही सुधारलेली नाही. परिणामी एक दिवसा आड पाणी सोडण्याचा निर्णय आणखी २२ ऑगस्टपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय मनपा प्रशासनने घेतला आहे.

ठळक मुद्देनवेगाव खैरीतील पाणीसाठा घटला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरसह विदर्भात पाऊस चांगला पडत आहे. पावसाचा बॅकलॉग दूर झाला असला तरी शहराला ज्या तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. तेथील परिस्थिती मात्र अजुनही सुधारलेली नाही. परिणामी एक दिवसा आड पाणी सोडण्याचा निर्णय आणखी २२ ऑगस्टपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय मनपा प्रशासनने घेतला आहे. जेव्हापासून पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे तेव्हापासून दर सोमवारी तलावातील साठ्याचा आढावा घेतला जातो. त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जातो.शहरात गेल्या दोन आठवड्यांपासून पाऊस सुरु आहे. परंतु ना तोतलाडोह तलाव भरने ना नवेगाव खैरीतील पाणीसाठ्याची स्थिती सुधारली. नवेगाव खैरीमध्ये ५ ऑगस्ट रोजी पाण्याची पातळी ३१८.५५ मीटर नोंदवण्यात आली आहे. तर तोतलाडोह तलावातील पातळी मृत साठ्याच्याही खाली गेले आहे. येथील मृतसाठ्याची पातळी १५१ एमएमक्यूब आहे. या स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी आणखी ३० एमएमक्यूब पाण्याची आवश्यकता आहे. या दोन्ही तलावावर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अवलंबून आहे. या पावसाळ्यात हे दोन्ही तलाव भरले नाहीत तर शहरात एक दिवसा आड पाणीपुरवठ्याचा निर्णय आणखी पुढे वाढवला जाऊ शकतो.सोमवारी मनपा पाणीपुरवठा विभाग आणि ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत पाण्याच्या पातळीवर चर्चा झाली. तेव्हा पाण्याची पातळी वाढण्याऐवजी आणखी घटल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला. जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी सांगितले की, पाणी कपात सुरु राहील. धरणातील पाणीसाठ्यात वाढ न होणे ही शहरासाठी चिंतेची बाब आहे. भविष्यात काय होईल, त्यावर आताच काही बोलणे योग्य होणार नाही.वाढण्याऐवजी घटत आहे पातळीनवेगाव खैरी येथील पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे एक दिवसा आड कपातीचा निर्णय पेंचशी जुळलेल्या शहरातील भागांसाठी घेण्यात आला. शहराती जवळपास ७० टक्के भागाच पेंचमधून दररोज ५०० एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. पेंचमध्ये नवेगाव खैरीमधून पाणी येते. नवेगाव खैरीमध्ये १५ जुलै रोजी जलस्तर ३१८.३६ मीटर होते. आठवडाभरानंतर २९ जुलै रोजी ते वाढून ३१८.६० मीटरपर्यंत पोहोचले. परंतु ५ ऑगस्ट रोजी येथील जलस्तर ०.०५ मीटर खाली जाऊन ३१८.५५ मीटरवर पोहोचले. ही चिंतेची बाब आहे. भर पावसाळ्यात ही स्थिती असेल तर पुढे काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाwater shortageपाणीकपात