शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

नागपुरात पाणी कपात सुरुच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:24 IST

नागपूरसह विदर्भात पाऊस चांगला पडत आहे. पावसाचा बॅकलॉग दूर झाला असला तरी शहराला ज्या तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. तेथील परिस्थिती मात्र अजुनही सुधारलेली नाही. परिणामी एक दिवसा आड पाणी सोडण्याचा निर्णय आणखी २२ ऑगस्टपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय मनपा प्रशासनने घेतला आहे.

ठळक मुद्देनवेगाव खैरीतील पाणीसाठा घटला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरसह विदर्भात पाऊस चांगला पडत आहे. पावसाचा बॅकलॉग दूर झाला असला तरी शहराला ज्या तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. तेथील परिस्थिती मात्र अजुनही सुधारलेली नाही. परिणामी एक दिवसा आड पाणी सोडण्याचा निर्णय आणखी २२ ऑगस्टपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय मनपा प्रशासनने घेतला आहे. जेव्हापासून पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे तेव्हापासून दर सोमवारी तलावातील साठ्याचा आढावा घेतला जातो. त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जातो.शहरात गेल्या दोन आठवड्यांपासून पाऊस सुरु आहे. परंतु ना तोतलाडोह तलाव भरने ना नवेगाव खैरीतील पाणीसाठ्याची स्थिती सुधारली. नवेगाव खैरीमध्ये ५ ऑगस्ट रोजी पाण्याची पातळी ३१८.५५ मीटर नोंदवण्यात आली आहे. तर तोतलाडोह तलावातील पातळी मृत साठ्याच्याही खाली गेले आहे. येथील मृतसाठ्याची पातळी १५१ एमएमक्यूब आहे. या स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी आणखी ३० एमएमक्यूब पाण्याची आवश्यकता आहे. या दोन्ही तलावावर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अवलंबून आहे. या पावसाळ्यात हे दोन्ही तलाव भरले नाहीत तर शहरात एक दिवसा आड पाणीपुरवठ्याचा निर्णय आणखी पुढे वाढवला जाऊ शकतो.सोमवारी मनपा पाणीपुरवठा विभाग आणि ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत पाण्याच्या पातळीवर चर्चा झाली. तेव्हा पाण्याची पातळी वाढण्याऐवजी आणखी घटल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला. जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी सांगितले की, पाणी कपात सुरु राहील. धरणातील पाणीसाठ्यात वाढ न होणे ही शहरासाठी चिंतेची बाब आहे. भविष्यात काय होईल, त्यावर आताच काही बोलणे योग्य होणार नाही.वाढण्याऐवजी घटत आहे पातळीनवेगाव खैरी येथील पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे एक दिवसा आड कपातीचा निर्णय पेंचशी जुळलेल्या शहरातील भागांसाठी घेण्यात आला. शहराती जवळपास ७० टक्के भागाच पेंचमधून दररोज ५०० एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. पेंचमध्ये नवेगाव खैरीमधून पाणी येते. नवेगाव खैरीमध्ये १५ जुलै रोजी जलस्तर ३१८.३६ मीटर होते. आठवडाभरानंतर २९ जुलै रोजी ते वाढून ३१८.६० मीटरपर्यंत पोहोचले. परंतु ५ ऑगस्ट रोजी येथील जलस्तर ०.०५ मीटर खाली जाऊन ३१८.५५ मीटरवर पोहोचले. ही चिंतेची बाब आहे. भर पावसाळ्यात ही स्थिती असेल तर पुढे काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाwater shortageपाणीकपात