शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

रेल्वेत पाण्याअभावी प्रवाशांची गैरसोय : प्रशासनाच्या नावाने ओरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 23:52 IST

रेल्वेच्या शौचालयांमध्ये पाणीच नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमधून नागपुरात पोहोचलेल्या महिलेने या प्रकारावर संताप व्यक्त करीत उप स्टेशन व्यवस्थापक कार्यालयात लेखी तक्रार नोंदविली आहे.

ठळक मुद्देनागपूर स्थानकावर प्रवासी महिलेची लेखी तक्रार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रेल्वेच्या शौचालयांमध्ये पाणीच नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमधून नागपुरात पोहोचलेल्या महिलेने या प्रकारावर संताप व्यक्त करीत उप स्टेशन व्यवस्थापक कार्यालयात लेखी तक्रार नोंदविली आहे. ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमधील इतर प्रवाशांनीसुद्धा प्रशासनाच्या नावाने आरडाओरड करून आपला रोष व्यक्त केला.१२१०२ हावडा-लोकमान्य टिळक टर्मिनस ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस रविवारी रात्री नियोजित वेळेत रवाना झाली. पहिले रेल्वेस्थानक येण्यापूर्वीच बी-३ क्रमांकाच्या कोचमधील दोन्ही बाजूच्या शौचालयांमध्ये पाणी येणे बंद झाले. याच डब्यातून शर्मिला सेनसागर या मुलासह प्रवास करीत होत्या. त्यांनी याबाबत सफाई कर्मचाऱ्यांना सूचना दिली. त्यांनी टीटीकडे बोट दाखविले. यामुळे त्यांनी टीटीलासुद्धा पाणी नसल्याचे सांगितले. बिलासपूर स्थानकावर पाणी भरले जाईल, असे सांगून टीटीने वेळ मारून नेली. सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ही गाडी बिलासपूर स्थानक सोडून पुढे रवाना झाली. मात्र तरीही कोचमध्ये पाणी भरण्यात आले नाही. यामुळे अन्य प्रवाशांसोबतच शर्मिला सेनसागर यांनी रोष व्यक्त करीत जाब विचारला. त्यांनी बी-३ क्रमांकाच्या डब्यात जाऊन बघितले असता तिथेसुद्धा पाणी नव्हते. कर्मचारी, टीटीची कान उघाडणी केली. यानंतर अचानक नळाला पाणी आले. याचा अर्थ टाकीत पाणी असले तरी ते बंद करून ठेवण्यात आले होते. पाणी आल्यावरसुद्धा फ्लशर मात्र योग्यरीत्या काम करीत नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. ही गाडी नागपूर स्थानकावर पोहचल्यानंतर सेनसागर यांनी उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयात पाणी बंद का करून ठेवले, असा सवाल उपस्थित करीत लेखी तक्रार नोंदविली.हा तर नित्याचाच प्रकारकामाच्या निमित्ताने दर आठवड्यातच हावडाला जाणे येणे करावे लागते. या मार्गावर नेहमीच अशीच अवस्था असते. पाणीच राहत नसल्याने शौचालये अस्वच्छ असतात. मनस्ताप सहन करीत प्रवास करावा लागत असल्याचे शर्मिला सेनसागर यांनी सांगितले. रेल्वेत दोन स्वच्छता कर्मचारी असतात, त्यामुळे शौचालयात पाणी आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी त्यांची असून ते जबाबदारी झटकतात. याचा प्रवाशांना मनस्ताप होत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरwater shortageपाणीकपात