शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
3
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
4
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
5
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
6
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
7
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
8
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
9
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
10
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
11
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
12
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
13
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
14
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
15
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
16
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
17
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
18
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
19
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
20
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी

 नागपूर जिल्ह्यातील  पाणीटंचाईबरोबर जलस्रोतही दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 22:47 IST

मार्च महिना संपत आलाय आणि ग्रामीण भागात पाणी टंचाईला सुरुवात झाली आहे. काही भागात पाणी टंचाई बरोबरच दूषित पाण्याचा पुरवठाही होत आहे. खुद्द प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील ८९ ग्रामपंचायतीला दूषित पाण्यासाठी पिवळे कार्ड दिले आहे. या ग्रा.पं.मधील १४३ पाणी पुरवठा करणारे जलस्रोत दूषित आढळले आहेत.

ठळक मुद्दे८९ ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड : मार्चमध्येच पाण्याच्या झळा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मार्च महिना संपत आलाय आणि ग्रामीण भागात पाणी टंचाईला सुरुवात झाली आहे. काही भागात पाणी टंचाई बरोबरच दूषित पाण्याचा पुरवठाही होत आहे. खुद्द प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील ८९ ग्रामपंचायतीला दूषित पाण्यासाठी पिवळे कार्ड दिले आहे. या ग्रा.पं.मधील १४३ पाणी पुरवठा करणारे जलस्रोत दूषित आढळले आहेत.धरणातील पाणीसाठा कमी असल्याने यंदाच्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ग्रामीण भागात ही परिस्थिती शहराच्या तुलनेत अधिक भयावय होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मार्च महिन्यातच पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे अनेक भागातील पाण्याला कपात करण्यात येणार आहे. सिंचनाला देण्यात येणाऱ्या पाण्यातही कपात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून याचा विरोध होत आहे. शहरातील पाणीपुरवठ्यालाही कपातीचा फटका बसणार आहे. शहरात अतिरिक्त पाण्याची मागणी होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे स्रोत सुस्थितीत ठेवणे आवश्यक आहे. आॅक्टोबर २०१७ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जलस्रोत दूषित असलेल्या गावांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग आणि ग्रामसेवकांकडून या जलस्रोतांची योग्य दक्षता घेण्यात येत नाही आहे. त्यामुळे जलस्रोत दूषित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर जलस्रोतांची तपासणी करण्यात येत आहे. जलस्रोत सुस्थितीत ठेवण्यासाठी दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात येते. दरवर्षी नवीन बोअरवेल, नळ लाईन टाकण्यात येते. त्यानंतरही जलस्रोत दूषित होतो. त्यामुळे हा पैसा जातो कुठे, असाच प्रश्न उपस्थित होत आहे. जलस्रोत योग्य ठेवण्याची जबाबदारी ग्रामसेवकांची आहे. ती त्यांनी योग्यपद्धतीने पार पाडली पाहिजे. ब्लिचिंग पावडरचा वापर करावा. नागरिकांचे आरोग्यावर परिणाम झाल्यास संबंधित ग्रामसचिवांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरोग्य समितीचे सभापती व उपाध्यक्ष शरद डोणेकर यांनी दिला आहे. पिवळे कार्ड दिलेल्या ग्रामपंचायती व जलस्रोततालुका           ग्रामपंचायत संख्या               जलस्रोत संख्याकुही                    १४                                        २२मौदा                    ३                                           ५रामटेक               ४                                            ४काटोल                ८                                            १९कळमेश्वर            ३                                              ६कामठी               ५                                              ५नरखेड               १०                                              १३नागपूर ग्रा.         ३                                               ६भिवापूर              १०                                            १४पारशिवानी         ११                                             १८उमरेड                 १३                                            २०सावनेर               ३                                                ९हिंगणा                २                                               २

टॅग्स :Waterपाणीnagpurनागपूर