शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
2
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
3
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
4
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
5
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
6
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
7
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
8
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
9
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
10
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
11
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
12
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
13
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
14
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
15
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
16
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
17
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर

 नागपूर जिल्ह्यातील  पाणीटंचाईबरोबर जलस्रोतही दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 22:47 IST

मार्च महिना संपत आलाय आणि ग्रामीण भागात पाणी टंचाईला सुरुवात झाली आहे. काही भागात पाणी टंचाई बरोबरच दूषित पाण्याचा पुरवठाही होत आहे. खुद्द प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील ८९ ग्रामपंचायतीला दूषित पाण्यासाठी पिवळे कार्ड दिले आहे. या ग्रा.पं.मधील १४३ पाणी पुरवठा करणारे जलस्रोत दूषित आढळले आहेत.

ठळक मुद्दे८९ ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड : मार्चमध्येच पाण्याच्या झळा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मार्च महिना संपत आलाय आणि ग्रामीण भागात पाणी टंचाईला सुरुवात झाली आहे. काही भागात पाणी टंचाई बरोबरच दूषित पाण्याचा पुरवठाही होत आहे. खुद्द प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील ८९ ग्रामपंचायतीला दूषित पाण्यासाठी पिवळे कार्ड दिले आहे. या ग्रा.पं.मधील १४३ पाणी पुरवठा करणारे जलस्रोत दूषित आढळले आहेत.धरणातील पाणीसाठा कमी असल्याने यंदाच्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ग्रामीण भागात ही परिस्थिती शहराच्या तुलनेत अधिक भयावय होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मार्च महिन्यातच पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे अनेक भागातील पाण्याला कपात करण्यात येणार आहे. सिंचनाला देण्यात येणाऱ्या पाण्यातही कपात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून याचा विरोध होत आहे. शहरातील पाणीपुरवठ्यालाही कपातीचा फटका बसणार आहे. शहरात अतिरिक्त पाण्याची मागणी होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे स्रोत सुस्थितीत ठेवणे आवश्यक आहे. आॅक्टोबर २०१७ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जलस्रोत दूषित असलेल्या गावांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग आणि ग्रामसेवकांकडून या जलस्रोतांची योग्य दक्षता घेण्यात येत नाही आहे. त्यामुळे जलस्रोत दूषित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर जलस्रोतांची तपासणी करण्यात येत आहे. जलस्रोत सुस्थितीत ठेवण्यासाठी दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात येते. दरवर्षी नवीन बोअरवेल, नळ लाईन टाकण्यात येते. त्यानंतरही जलस्रोत दूषित होतो. त्यामुळे हा पैसा जातो कुठे, असाच प्रश्न उपस्थित होत आहे. जलस्रोत योग्य ठेवण्याची जबाबदारी ग्रामसेवकांची आहे. ती त्यांनी योग्यपद्धतीने पार पाडली पाहिजे. ब्लिचिंग पावडरचा वापर करावा. नागरिकांचे आरोग्यावर परिणाम झाल्यास संबंधित ग्रामसचिवांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरोग्य समितीचे सभापती व उपाध्यक्ष शरद डोणेकर यांनी दिला आहे. पिवळे कार्ड दिलेल्या ग्रामपंचायती व जलस्रोततालुका           ग्रामपंचायत संख्या               जलस्रोत संख्याकुही                    १४                                        २२मौदा                    ३                                           ५रामटेक               ४                                            ४काटोल                ८                                            १९कळमेश्वर            ३                                              ६कामठी               ५                                              ५नरखेड               १०                                              १३नागपूर ग्रा.         ३                                               ६भिवापूर              १०                                            १४पारशिवानी         ११                                             १८उमरेड                 १३                                            २०सावनेर               ३                                                ९हिंगणा                २                                               २

टॅग्स :Waterपाणीnagpurनागपूर