शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

 नागपूर जिल्ह्यातील  पाणीटंचाईबरोबर जलस्रोतही दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 22:47 IST

मार्च महिना संपत आलाय आणि ग्रामीण भागात पाणी टंचाईला सुरुवात झाली आहे. काही भागात पाणी टंचाई बरोबरच दूषित पाण्याचा पुरवठाही होत आहे. खुद्द प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील ८९ ग्रामपंचायतीला दूषित पाण्यासाठी पिवळे कार्ड दिले आहे. या ग्रा.पं.मधील १४३ पाणी पुरवठा करणारे जलस्रोत दूषित आढळले आहेत.

ठळक मुद्दे८९ ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड : मार्चमध्येच पाण्याच्या झळा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मार्च महिना संपत आलाय आणि ग्रामीण भागात पाणी टंचाईला सुरुवात झाली आहे. काही भागात पाणी टंचाई बरोबरच दूषित पाण्याचा पुरवठाही होत आहे. खुद्द प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील ८९ ग्रामपंचायतीला दूषित पाण्यासाठी पिवळे कार्ड दिले आहे. या ग्रा.पं.मधील १४३ पाणी पुरवठा करणारे जलस्रोत दूषित आढळले आहेत.धरणातील पाणीसाठा कमी असल्याने यंदाच्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ग्रामीण भागात ही परिस्थिती शहराच्या तुलनेत अधिक भयावय होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मार्च महिन्यातच पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे अनेक भागातील पाण्याला कपात करण्यात येणार आहे. सिंचनाला देण्यात येणाऱ्या पाण्यातही कपात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून याचा विरोध होत आहे. शहरातील पाणीपुरवठ्यालाही कपातीचा फटका बसणार आहे. शहरात अतिरिक्त पाण्याची मागणी होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे स्रोत सुस्थितीत ठेवणे आवश्यक आहे. आॅक्टोबर २०१७ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जलस्रोत दूषित असलेल्या गावांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग आणि ग्रामसेवकांकडून या जलस्रोतांची योग्य दक्षता घेण्यात येत नाही आहे. त्यामुळे जलस्रोत दूषित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर जलस्रोतांची तपासणी करण्यात येत आहे. जलस्रोत सुस्थितीत ठेवण्यासाठी दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात येते. दरवर्षी नवीन बोअरवेल, नळ लाईन टाकण्यात येते. त्यानंतरही जलस्रोत दूषित होतो. त्यामुळे हा पैसा जातो कुठे, असाच प्रश्न उपस्थित होत आहे. जलस्रोत योग्य ठेवण्याची जबाबदारी ग्रामसेवकांची आहे. ती त्यांनी योग्यपद्धतीने पार पाडली पाहिजे. ब्लिचिंग पावडरचा वापर करावा. नागरिकांचे आरोग्यावर परिणाम झाल्यास संबंधित ग्रामसचिवांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरोग्य समितीचे सभापती व उपाध्यक्ष शरद डोणेकर यांनी दिला आहे. पिवळे कार्ड दिलेल्या ग्रामपंचायती व जलस्रोततालुका           ग्रामपंचायत संख्या               जलस्रोत संख्याकुही                    १४                                        २२मौदा                    ३                                           ५रामटेक               ४                                            ४काटोल                ८                                            १९कळमेश्वर            ३                                              ६कामठी               ५                                              ५नरखेड               १०                                              १३नागपूर ग्रा.         ३                                               ६भिवापूर              १०                                            १४पारशिवानी         ११                                             १८उमरेड                 १३                                            २०सावनेर               ३                                                ९हिंगणा                २                                               २

टॅग्स :Waterपाणीnagpurनागपूर