शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

नागपुरात जलसंकटाचे सावट : तलाव, धरणात अल्पसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 00:09 IST

नागपूरसह संपूर्ण विभागावर पाणी संकट येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विभागातील जलाशयांमध्ये केवळ १७ टक्के पाणी शिल्लक आहे. उन्हाळा अद्याप सुरू झाला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात भीषण पाणी समस्या भेडसावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्दे१७ टक्केच जलसाठा शिल्लक : मध्य प्रदेश सरकारला पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरसह संपूर्ण विभागावर पाणी संकट येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विभागातील जलाशयांमध्ये केवळ १७ टक्के पाणी शिल्लक आहे. उन्हाळा अद्याप सुरू झाला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात भीषण पाणी समस्या भेडसावण्याची शक्यता नाकारता येत नाही.विभागात ३७२ लघु, मध्यम व मोठे जलप्रकल्प आहेत. त्यांची एकूण क्षमता ४५९३.९ दशलक्ष घनमीटर आहे. सध्या या प्रकल्पांत केवळ ७९१.३९ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध आहे. १८ मोठ्या प्रकल्पांमध्ये ३५५४ च्या तुलनेत केवळ १६ टक्के, म्हणजे ५६९ दशलक्ष घनमीटर पाणी उरले आहे. तसेच, ४० मध्यम प्रकल्पांत २१ टक्के तर, ३१ लघु प्रकल्पांत २० टक्के जलसाठा आहे. पेंच प्रकल्पाची परिस्थिती चिंताजनक आहे.पाणी संकटातून मार्ग काढण्यासाठी प्रशासन सक्रिय झाले आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांना पत्र लिहून चौराई धरणातील ५ एमएलडी पाणी पेंचमध्ये सोडण्याची मागणी केली आहे. मध्य प्रदेश सरकारने यावर अद्याप सकारात्मक उत्तर दिले नाही. त्यामुळे बावनकुळे यांनी यासंदर्भात कमलनाथ यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे.भूजलाचा आधारजलाशयांमध्ये केवळ १७ टक्के पाणी शिल्लक असले तरी उन्हाळ्यात जास्त पाणी कपात केली जाणार नाही असे जाणकारांचे म्हणणे आहे. परंतु, येणारा पावसाळा असमाधानकारक राहिल्यास परिस्थिती बिघडेल. विभागात भूजलाची अवस्था चांगली आहे. जल संकटावर त्यामुळे मात करता येईल असे जाणकारांचे मत आहे.पाणी काटकसरीने वापरामहापालिकेतर्फे महिनाभरापूर्वी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री बावनकुळे यांनी नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले होते. सोबतच महापालिकेला पाण्याच्या गळतीचे प्रमाण कमी करण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळीच भविष्यात भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागू शकते, हे स्पष्ट झाले होते. आता महापालिकेला संभाव्य टंचाईचा धोका लक्षात घेता वेळीच उपाय योजावे लागणार आहेत.निवडणुकीच्या तोंडावर पाणी पेटणारलोकसभेची निवडणूक एप्रिल- मे मध्ये होईल. हे उन्हाळ्याचे दिवस असतील. दरवर्षीच तशीही उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होते. मात्र, हा निवडणुकीचा काळ असल्यामुळे पाणी टंचाईचे ‘राजकीय’ चटके बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सत्तापक्ष भाजपाची चिंता वाढणार आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईnagpurनागपूर