शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात जलसंकटाचे सावट : तलाव, धरणात अल्पसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 00:09 IST

नागपूरसह संपूर्ण विभागावर पाणी संकट येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विभागातील जलाशयांमध्ये केवळ १७ टक्के पाणी शिल्लक आहे. उन्हाळा अद्याप सुरू झाला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात भीषण पाणी समस्या भेडसावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्दे१७ टक्केच जलसाठा शिल्लक : मध्य प्रदेश सरकारला पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरसह संपूर्ण विभागावर पाणी संकट येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विभागातील जलाशयांमध्ये केवळ १७ टक्के पाणी शिल्लक आहे. उन्हाळा अद्याप सुरू झाला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात भीषण पाणी समस्या भेडसावण्याची शक्यता नाकारता येत नाही.विभागात ३७२ लघु, मध्यम व मोठे जलप्रकल्प आहेत. त्यांची एकूण क्षमता ४५९३.९ दशलक्ष घनमीटर आहे. सध्या या प्रकल्पांत केवळ ७९१.३९ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध आहे. १८ मोठ्या प्रकल्पांमध्ये ३५५४ च्या तुलनेत केवळ १६ टक्के, म्हणजे ५६९ दशलक्ष घनमीटर पाणी उरले आहे. तसेच, ४० मध्यम प्रकल्पांत २१ टक्के तर, ३१ लघु प्रकल्पांत २० टक्के जलसाठा आहे. पेंच प्रकल्पाची परिस्थिती चिंताजनक आहे.पाणी संकटातून मार्ग काढण्यासाठी प्रशासन सक्रिय झाले आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांना पत्र लिहून चौराई धरणातील ५ एमएलडी पाणी पेंचमध्ये सोडण्याची मागणी केली आहे. मध्य प्रदेश सरकारने यावर अद्याप सकारात्मक उत्तर दिले नाही. त्यामुळे बावनकुळे यांनी यासंदर्भात कमलनाथ यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे.भूजलाचा आधारजलाशयांमध्ये केवळ १७ टक्के पाणी शिल्लक असले तरी उन्हाळ्यात जास्त पाणी कपात केली जाणार नाही असे जाणकारांचे म्हणणे आहे. परंतु, येणारा पावसाळा असमाधानकारक राहिल्यास परिस्थिती बिघडेल. विभागात भूजलाची अवस्था चांगली आहे. जल संकटावर त्यामुळे मात करता येईल असे जाणकारांचे मत आहे.पाणी काटकसरीने वापरामहापालिकेतर्फे महिनाभरापूर्वी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री बावनकुळे यांनी नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले होते. सोबतच महापालिकेला पाण्याच्या गळतीचे प्रमाण कमी करण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळीच भविष्यात भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागू शकते, हे स्पष्ट झाले होते. आता महापालिकेला संभाव्य टंचाईचा धोका लक्षात घेता वेळीच उपाय योजावे लागणार आहेत.निवडणुकीच्या तोंडावर पाणी पेटणारलोकसभेची निवडणूक एप्रिल- मे मध्ये होईल. हे उन्हाळ्याचे दिवस असतील. दरवर्षीच तशीही उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होते. मात्र, हा निवडणुकीचा काळ असल्यामुळे पाणी टंचाईचे ‘राजकीय’ चटके बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सत्तापक्ष भाजपाची चिंता वाढणार आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईnagpurनागपूर