शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

नागपुरात जलसंकटाचे सावट : तलाव, धरणात अल्पसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 00:09 IST

नागपूरसह संपूर्ण विभागावर पाणी संकट येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विभागातील जलाशयांमध्ये केवळ १७ टक्के पाणी शिल्लक आहे. उन्हाळा अद्याप सुरू झाला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात भीषण पाणी समस्या भेडसावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्दे१७ टक्केच जलसाठा शिल्लक : मध्य प्रदेश सरकारला पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरसह संपूर्ण विभागावर पाणी संकट येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विभागातील जलाशयांमध्ये केवळ १७ टक्के पाणी शिल्लक आहे. उन्हाळा अद्याप सुरू झाला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात भीषण पाणी समस्या भेडसावण्याची शक्यता नाकारता येत नाही.विभागात ३७२ लघु, मध्यम व मोठे जलप्रकल्प आहेत. त्यांची एकूण क्षमता ४५९३.९ दशलक्ष घनमीटर आहे. सध्या या प्रकल्पांत केवळ ७९१.३९ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध आहे. १८ मोठ्या प्रकल्पांमध्ये ३५५४ च्या तुलनेत केवळ १६ टक्के, म्हणजे ५६९ दशलक्ष घनमीटर पाणी उरले आहे. तसेच, ४० मध्यम प्रकल्पांत २१ टक्के तर, ३१ लघु प्रकल्पांत २० टक्के जलसाठा आहे. पेंच प्रकल्पाची परिस्थिती चिंताजनक आहे.पाणी संकटातून मार्ग काढण्यासाठी प्रशासन सक्रिय झाले आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांना पत्र लिहून चौराई धरणातील ५ एमएलडी पाणी पेंचमध्ये सोडण्याची मागणी केली आहे. मध्य प्रदेश सरकारने यावर अद्याप सकारात्मक उत्तर दिले नाही. त्यामुळे बावनकुळे यांनी यासंदर्भात कमलनाथ यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे.भूजलाचा आधारजलाशयांमध्ये केवळ १७ टक्के पाणी शिल्लक असले तरी उन्हाळ्यात जास्त पाणी कपात केली जाणार नाही असे जाणकारांचे म्हणणे आहे. परंतु, येणारा पावसाळा असमाधानकारक राहिल्यास परिस्थिती बिघडेल. विभागात भूजलाची अवस्था चांगली आहे. जल संकटावर त्यामुळे मात करता येईल असे जाणकारांचे मत आहे.पाणी काटकसरीने वापरामहापालिकेतर्फे महिनाभरापूर्वी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री बावनकुळे यांनी नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले होते. सोबतच महापालिकेला पाण्याच्या गळतीचे प्रमाण कमी करण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळीच भविष्यात भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागू शकते, हे स्पष्ट झाले होते. आता महापालिकेला संभाव्य टंचाईचा धोका लक्षात घेता वेळीच उपाय योजावे लागणार आहेत.निवडणुकीच्या तोंडावर पाणी पेटणारलोकसभेची निवडणूक एप्रिल- मे मध्ये होईल. हे उन्हाळ्याचे दिवस असतील. दरवर्षीच तशीही उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होते. मात्र, हा निवडणुकीचा काळ असल्यामुळे पाणी टंचाईचे ‘राजकीय’ चटके बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सत्तापक्ष भाजपाची चिंता वाढणार आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईnagpurनागपूर