शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

नागपुरात जलसंकट वाढले, नळातून अपुरे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 01:32 IST

एप्रिल व मे महिन्यातील कडाक्याचे ऊन अजून बाकी आहे. पाराही पाहिजे तसा चढलेला नाही. मात्र, मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था कोलमडण्याची चिन्हे दिसू लागली आहे. शहराचा मध्य भाग असो किंवा बाह्य भाग सर्वत्र नळाद्वारे अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही भागात तर काही मिनिटातच नळाचे पाणी बंद होत आहे.

ठळक मुद्देबाह्य भागातील वस्त्यांमध्ये टंचाई : अपुरा व दूषित पाण्याचा पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एप्रिल व मे महिन्यातील कडाक्याचे ऊन अजून बाकी आहे. पाराही पाहिजे तसा चढलेला नाही. मात्र, मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था कोलमडण्याची चिन्हे दिसू लागली आहे. शहराचा मध्य भाग असो किंवा बाह्य भाग सर्वत्र नळाद्वारे अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही भागात तर काही मिनिटातच नळाचे पाणी बंद होत आहे.शहरात दररोज ६३० ते ६४० दलघमी पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचा दावा महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने केला आहे. पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आली नसताना नळाला येणारे पाणी एकाएक कमी कसे झाले, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. पूर्व नागपूरच्या पारडी पुनापूर, गुलमोहर नगर, विजय नगर, भारत नगर यासह अनेक वस्त्यांमध्ये गेल्या महिनाभरापासून नळाला येणाऱ्या पाण्याची धार मंदावली आहे. एक बादली पाणी भरण्यासाठी १० मिनीट लागत आहेत. काही भागात माती मिश्रीत पाणी येत असल्याची तक्रार आहे. जेथे दोन तास पाणी येत होते त्या भागात आता फक्त अर्धा तास पाणी येत आहे. मध्य नागपुरातील मोमिनपुरा, तकिया, नाईक तलाव परिसर, बोरियापुरा, टिमकी, डोबीनगर, अन्सारनगर आदी भागात दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. येथील काही भागात तर फक्त १५ ते २० मिनिटच पाणी मिळत आहे. नगरसेवकांकडे वारंवार तक्रारी करूनही प्रश्न सुटत नसल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.उत्तर नागपुरातील नारा, नारी, दीक्षित नगर या बाह्य भागातील वस्त्यांमध्ये अनियमित व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. काही भागात तर दिवसाआड पाणी येत आहे. नगरसेवकांकडून तक्रारींची दखल घेतली जात नाही, मागणी करून टँकरही मिळत नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. दक्षिण नागपुरातही तशीच परिस्थिती आहे. नळाची धार मंदावली आहे. भूजल पातळी घटल्याने विहिरीचे पाणी खोल गेले आहे. भाजपाचे नगरसेवक व नेते वास्तव्यास असलेल्या भागातच सुरळीत पाणी पुरवठा होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. शहरातील मार्च एडिंंगचे हे चित्र पाहता पुढे परिस्थिती आणखी कठीण होण्याची चिन्हे आहेत.टिल्लू पंप जप्ती मोहीम राबविणार पाणीपुररवठा कंपनी ओसीडब्ल्यूचे जनसंपर्क अधिकारी सचिन द्रवेकर यांनी सांगितले की, शहरातील पाणीपुरवठ्यात कपात झालेली नाही. उन्हाळ्याच्या दिवसात नागरिक अधिक पाणी मिळविण्यासाठी टिल्लू पंपाचा वापर करीत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळते. याची दखल घेत झोन स्तरावर टिल्लू पंप जप्तीची मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारीची दखल घेऊन प्रश्न सोडविला जाईल, असेही त्यांनी सांगितले.पुरेसा पाणीपुरवठा होतोय :  गायकवाड जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता संजय गायकवाड म्हणाले, शहरात दररोज ६३० ते ६४० दलघमी पाणीपुरवठा होत आहे. पाणी कपात करण्यात आलेली नाही. भविष्यातही कपात केली जाणार नाही. उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढते. वापर वाढतो. त्यामुळे नळाद्वारे कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणीnagpurनागपूर