शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात जलसंकट वाढले, नळातून अपुरे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 01:32 IST

एप्रिल व मे महिन्यातील कडाक्याचे ऊन अजून बाकी आहे. पाराही पाहिजे तसा चढलेला नाही. मात्र, मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था कोलमडण्याची चिन्हे दिसू लागली आहे. शहराचा मध्य भाग असो किंवा बाह्य भाग सर्वत्र नळाद्वारे अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही भागात तर काही मिनिटातच नळाचे पाणी बंद होत आहे.

ठळक मुद्देबाह्य भागातील वस्त्यांमध्ये टंचाई : अपुरा व दूषित पाण्याचा पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एप्रिल व मे महिन्यातील कडाक्याचे ऊन अजून बाकी आहे. पाराही पाहिजे तसा चढलेला नाही. मात्र, मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था कोलमडण्याची चिन्हे दिसू लागली आहे. शहराचा मध्य भाग असो किंवा बाह्य भाग सर्वत्र नळाद्वारे अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही भागात तर काही मिनिटातच नळाचे पाणी बंद होत आहे.शहरात दररोज ६३० ते ६४० दलघमी पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचा दावा महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने केला आहे. पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आली नसताना नळाला येणारे पाणी एकाएक कमी कसे झाले, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. पूर्व नागपूरच्या पारडी पुनापूर, गुलमोहर नगर, विजय नगर, भारत नगर यासह अनेक वस्त्यांमध्ये गेल्या महिनाभरापासून नळाला येणाऱ्या पाण्याची धार मंदावली आहे. एक बादली पाणी भरण्यासाठी १० मिनीट लागत आहेत. काही भागात माती मिश्रीत पाणी येत असल्याची तक्रार आहे. जेथे दोन तास पाणी येत होते त्या भागात आता फक्त अर्धा तास पाणी येत आहे. मध्य नागपुरातील मोमिनपुरा, तकिया, नाईक तलाव परिसर, बोरियापुरा, टिमकी, डोबीनगर, अन्सारनगर आदी भागात दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. येथील काही भागात तर फक्त १५ ते २० मिनिटच पाणी मिळत आहे. नगरसेवकांकडे वारंवार तक्रारी करूनही प्रश्न सुटत नसल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.उत्तर नागपुरातील नारा, नारी, दीक्षित नगर या बाह्य भागातील वस्त्यांमध्ये अनियमित व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. काही भागात तर दिवसाआड पाणी येत आहे. नगरसेवकांकडून तक्रारींची दखल घेतली जात नाही, मागणी करून टँकरही मिळत नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. दक्षिण नागपुरातही तशीच परिस्थिती आहे. नळाची धार मंदावली आहे. भूजल पातळी घटल्याने विहिरीचे पाणी खोल गेले आहे. भाजपाचे नगरसेवक व नेते वास्तव्यास असलेल्या भागातच सुरळीत पाणी पुरवठा होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. शहरातील मार्च एडिंंगचे हे चित्र पाहता पुढे परिस्थिती आणखी कठीण होण्याची चिन्हे आहेत.टिल्लू पंप जप्ती मोहीम राबविणार पाणीपुररवठा कंपनी ओसीडब्ल्यूचे जनसंपर्क अधिकारी सचिन द्रवेकर यांनी सांगितले की, शहरातील पाणीपुरवठ्यात कपात झालेली नाही. उन्हाळ्याच्या दिवसात नागरिक अधिक पाणी मिळविण्यासाठी टिल्लू पंपाचा वापर करीत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळते. याची दखल घेत झोन स्तरावर टिल्लू पंप जप्तीची मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारीची दखल घेऊन प्रश्न सोडविला जाईल, असेही त्यांनी सांगितले.पुरेसा पाणीपुरवठा होतोय :  गायकवाड जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता संजय गायकवाड म्हणाले, शहरात दररोज ६३० ते ६४० दलघमी पाणीपुरवठा होत आहे. पाणी कपात करण्यात आलेली नाही. भविष्यातही कपात केली जाणार नाही. उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढते. वापर वाढतो. त्यामुळे नळाद्वारे कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणीnagpurनागपूर