शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाणी बचतीचा संकल्प

By admin | Updated: May 9, 2016 03:05 IST

सध्या संपूर्ण महाराष्ट्र पाण्यासाठी व्याकूळ झाला आहे. लाखो नागरिक तहान भागविण्यासाठी गावे सोडत आहेत.

‘लोकमत’जलमित्र अभियान : नागपूर रेसिडेन्सियल हॉटेल्स असोसिएशनचा पाठिंबानागपूर : सध्या संपूर्ण महाराष्ट्र पाण्यासाठी व्याकूळ झाला आहे. लाखो नागरिक तहान भागविण्यासाठी गावे सोडत आहेत. त्यामुळे आज महाराष्ट्रच नव्हे तर संंपूर्ण देशावर ओढवलेले हे संकट दूर करण्यासाठी पाण्याच्या प्रत्येक थेंबाची बचत करण्याची गरज निर्माण झाली असून, यासाठी लोकांमध्ये जनजागरण करण्यासाठी ‘लोकमत’ ने ८ मेपासून राज्यव्यापी ‘जलमित्र’ अभियानाचा प्रारंभ केला आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून रविवारी ‘लोकमत भवन’ येथे नागपूर रेसिडेन्सियल हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करून त्यांच्याशी पाणीबचतीवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत असोसिएशनचे सचिव तेजिंदरसिंग रेणू, असोसिएशनचे सदस्य विजय जयस्वाल, प्रकाश त्रिवेदी, नितीन त्रिवेदी व अजय जयस्वाल यांनी भाग घेतला होता. या चर्चेदरम्यान हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’च्या अभियानाचे मुक्तकंठाने कौतुक केले. शिवाय या उपक्रमाला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. नागपूर रेसिडेन्सियल असोसिएशनचे शहरात सुमारे ९० सदस्य असून, या सर्व हॉटेल्स मालकांची लवकरच एक बैठक बोलावून त्यात ‘लोकमत’च्या जलमित्र अभियानाची माहिती दिली जाईल, असे यावेळी रेणू यांनी सांगितले. चर्चेच्या सुरुवातीला ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष नीलेश सिंग यांनी अभियानाची डीपीटी प्रेझेन्टेशनद्वारे सविस्तर माहिती दिली.या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात सहा आठवड्यांचा कार्यक्रम आखण्यात आला आहे.त्यानुसार पुढील १२ जूनपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार असून, यात सामान्य नागरिकांसह व्यावसायिक, विद्यार्थी आणि सेलिब्रिटीजचा सहभाग राहणार आहे. यामध्ये लोकांना जलसाक्षर करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. यावेळी लोकमतचे संपादक दिलीप तिखिले, लोकमत समाचारचे प्रोडक्ट हेड मतीन खान, लोकमतचे सहायक संपादक गजानन जानभोर, संतोष चिपडा महाव्यवस्थापक (रेस), मुश्ताक शेखवरिष्ठ व्यवस्थापक (रेस) व लोकमत इव्हेन्ट विभागाचे उपव्यवस्थापक आतिश वानखेडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)अपव्यय थांबलाच पाहिजेआजचा ग्राहक हा सुशिक्षित व जागरूक आहे. त्यामुळे त्यांना पाणीबचतीचे महत्त्व पटवून देणे फार कठीण नाही. यातून नक्कीच पाण्याचा अपव्यय थांबेल. मात्र यासाठी पुढाकार घेण्याची गरज होती आणि तो पुढाकार ‘लोकमत’ने घेतला आहे. अनेक हॉटेल्समध्ये ग्राहकांना उत्तम सेवा देण्याच्या नावाखाली पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होते, हे मान्य करावेच लागेल. ‘लोकमत’च्या या अभियानाचा पुढील पिढीला फार मोठा फायदा होईल. आजपर्यंत हॉटेल्स व रेस्टॉरंटमध्ये पाणीबचतीचा हा प्रयोग झालाच नाही. परंतु ‘लोकमत’ने या अभियानाच्या माध्यमातून हॉटेल्स मालकांना जलसाक्षर केले आहे. तेजिंदरसिंग रेणू, सचिव - नागपूर रेसिडेन्सियल हॉटेल्स असो.हॉटेलमधील शॉवर बंद व्हावे हॉटेल्स व रेस्टॉरंटमध्ये पाणीबचत करणे, आज काळाची गरज ठरली आहे. यासाठी शहरातील सर्व लहान-मोठ्या हॉटेल्सनी स्वत:हून पुढाकार घेतला पाहिजे. हॉटेलमधील शॉवर बंद करून, केवळ नळांचा उपयोग करावा. यातून फार मोठी पाण्याची बचत होईल. नागपूर हे टुरिस्ट सेंटर नाही, येथील हॉटेल्समध्ये थांबणारे ग्राहक बहुतांश व्यापारी असतात. त्यामुळे त्यांना अधिक सहजपणे पाणीबचतीचे महत्त्व पटवून दिल्या जाऊ शकते. आम्ही आमच्या हॉटेलमध्ये हा प्रयोग सुरू केला असून, हॉटेलमधील सर्व शॉवर बंद केले आहेत. यामधून रोज शेकडो लिटर पाण्याची बचत होत आहे. प्रकाश त्रिवेदी, सदस्य - नागपूर रेसिडेन्सियल हॉटेल्स असो.