शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

पाणी बचतीचा संकल्प

By admin | Updated: May 9, 2016 03:05 IST

सध्या संपूर्ण महाराष्ट्र पाण्यासाठी व्याकूळ झाला आहे. लाखो नागरिक तहान भागविण्यासाठी गावे सोडत आहेत.

‘लोकमत’जलमित्र अभियान : नागपूर रेसिडेन्सियल हॉटेल्स असोसिएशनचा पाठिंबानागपूर : सध्या संपूर्ण महाराष्ट्र पाण्यासाठी व्याकूळ झाला आहे. लाखो नागरिक तहान भागविण्यासाठी गावे सोडत आहेत. त्यामुळे आज महाराष्ट्रच नव्हे तर संंपूर्ण देशावर ओढवलेले हे संकट दूर करण्यासाठी पाण्याच्या प्रत्येक थेंबाची बचत करण्याची गरज निर्माण झाली असून, यासाठी लोकांमध्ये जनजागरण करण्यासाठी ‘लोकमत’ ने ८ मेपासून राज्यव्यापी ‘जलमित्र’ अभियानाचा प्रारंभ केला आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून रविवारी ‘लोकमत भवन’ येथे नागपूर रेसिडेन्सियल हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करून त्यांच्याशी पाणीबचतीवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत असोसिएशनचे सचिव तेजिंदरसिंग रेणू, असोसिएशनचे सदस्य विजय जयस्वाल, प्रकाश त्रिवेदी, नितीन त्रिवेदी व अजय जयस्वाल यांनी भाग घेतला होता. या चर्चेदरम्यान हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’च्या अभियानाचे मुक्तकंठाने कौतुक केले. शिवाय या उपक्रमाला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. नागपूर रेसिडेन्सियल असोसिएशनचे शहरात सुमारे ९० सदस्य असून, या सर्व हॉटेल्स मालकांची लवकरच एक बैठक बोलावून त्यात ‘लोकमत’च्या जलमित्र अभियानाची माहिती दिली जाईल, असे यावेळी रेणू यांनी सांगितले. चर्चेच्या सुरुवातीला ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष नीलेश सिंग यांनी अभियानाची डीपीटी प्रेझेन्टेशनद्वारे सविस्तर माहिती दिली.या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात सहा आठवड्यांचा कार्यक्रम आखण्यात आला आहे.त्यानुसार पुढील १२ जूनपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार असून, यात सामान्य नागरिकांसह व्यावसायिक, विद्यार्थी आणि सेलिब्रिटीजचा सहभाग राहणार आहे. यामध्ये लोकांना जलसाक्षर करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. यावेळी लोकमतचे संपादक दिलीप तिखिले, लोकमत समाचारचे प्रोडक्ट हेड मतीन खान, लोकमतचे सहायक संपादक गजानन जानभोर, संतोष चिपडा महाव्यवस्थापक (रेस), मुश्ताक शेखवरिष्ठ व्यवस्थापक (रेस) व लोकमत इव्हेन्ट विभागाचे उपव्यवस्थापक आतिश वानखेडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)अपव्यय थांबलाच पाहिजेआजचा ग्राहक हा सुशिक्षित व जागरूक आहे. त्यामुळे त्यांना पाणीबचतीचे महत्त्व पटवून देणे फार कठीण नाही. यातून नक्कीच पाण्याचा अपव्यय थांबेल. मात्र यासाठी पुढाकार घेण्याची गरज होती आणि तो पुढाकार ‘लोकमत’ने घेतला आहे. अनेक हॉटेल्समध्ये ग्राहकांना उत्तम सेवा देण्याच्या नावाखाली पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होते, हे मान्य करावेच लागेल. ‘लोकमत’च्या या अभियानाचा पुढील पिढीला फार मोठा फायदा होईल. आजपर्यंत हॉटेल्स व रेस्टॉरंटमध्ये पाणीबचतीचा हा प्रयोग झालाच नाही. परंतु ‘लोकमत’ने या अभियानाच्या माध्यमातून हॉटेल्स मालकांना जलसाक्षर केले आहे. तेजिंदरसिंग रेणू, सचिव - नागपूर रेसिडेन्सियल हॉटेल्स असो.हॉटेलमधील शॉवर बंद व्हावे हॉटेल्स व रेस्टॉरंटमध्ये पाणीबचत करणे, आज काळाची गरज ठरली आहे. यासाठी शहरातील सर्व लहान-मोठ्या हॉटेल्सनी स्वत:हून पुढाकार घेतला पाहिजे. हॉटेलमधील शॉवर बंद करून, केवळ नळांचा उपयोग करावा. यातून फार मोठी पाण्याची बचत होईल. नागपूर हे टुरिस्ट सेंटर नाही, येथील हॉटेल्समध्ये थांबणारे ग्राहक बहुतांश व्यापारी असतात. त्यामुळे त्यांना अधिक सहजपणे पाणीबचतीचे महत्त्व पटवून दिल्या जाऊ शकते. आम्ही आमच्या हॉटेलमध्ये हा प्रयोग सुरू केला असून, हॉटेलमधील सर्व शॉवर बंद केले आहेत. यामधून रोज शेकडो लिटर पाण्याची बचत होत आहे. प्रकाश त्रिवेदी, सदस्य - नागपूर रेसिडेन्सियल हॉटेल्स असो.