शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
2
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
3
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
4
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
5
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
6
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
7
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
8
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
9
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
10
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
11
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
12
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
13
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
14
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
15
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
16
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
17
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
18
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
19
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
20
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले

नागपूर शहराचे पाणी वाढले : १७३.५०० दलघमी पाणी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 22:48 IST

Water of Nagpur city increased नागपूरकरांना नववर्षासाठी गुड न्यूज आहे. शहराला मिळणाऱ्या पाण्यात वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी नागपूर शहरासाठी १५४ दलघमी पाणी आरक्षित ठेवण्यात आले होते. यावेळी त्यात वाढ करून १७३.५०० दलघमी इतके पाणी आरक्षित केले जाणार आहे.

ठळक मुद्दे पाणी आरक्षणाला मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूरकरांना नववर्षासाठी गुड न्यूज आहे. शहराला मिळणाऱ्या पाण्यात वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी नागपूर शहरासाठी १५४ दलघमी पाणी आरक्षित ठेवण्यात आले होते. यावेळी त्यात वाढ करून १७३.५०० दलघमी इतके पाणी आरक्षित केले जाणार आहे. पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी पाणी आरक्षण बैठकीत संबंधित निर्देश दिले. त्यामुळे आता नागपूरचा पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लागला आहे.

नागपूर शहराला दररोज ६४० एमएलडी पाणी लागते. गेल्यावर्षी प्रत्यक्षात १५६ दलघमी पाणी वापरण्यात आले होते. यावर्षी कोरोना काळात नेहमीपेक्षा कमी पाणी वापरण्यात आले. त्यामुळे जून २०२१ पर्यंत १५२ दलघमी पाणी प्रत्यक्षात वापरले जाईल, असा अंदाज आहे. पाणी आरक्षणासंदर्भात सोमवारी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मनपाने वर्ष २०२०-२१ साठी पेंच प्रकल्पांतर्गत तोतलाडोह धरणातून १७३.५०० दलघमी पाणी देण्याची मागणी केली होती. पालकमंत्र्यांनी ही मागणी तात्काळ मंजूर करण्याचे निर्देश दिले. बैठकीत जिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण नागपूरचे अधीक्षक अभियंता जयंत गवळी, लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश ढुमणे उपस्थित होते. या वर्षी घरगुती व औद्योगिक वापराच्या पाण्याची जितकी मागणी आहे. त्यानुसार पुरेसे पाणी उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत सिंचन विभागाने पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली.

अशी आहे मागणी

 घरघुती व औद्योगिक दोन्ही मिळून नोव्हेंबर २०२० ते जून २०२१ पर्यंत जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांतून १५१.४१ दलघमी पाणी वापरले जाईल. मध्यम प्रकल्पातून १९.४२ दलघमी व लघु प्रकल्पातून ३.२९ दलघमी पाणी वापरले जाईल. तसेच नदीवरून असणाऱ्या पाणी पुरवठ्याची मागणी ५६.१७५ दलघमी आहे.

जिल्ह्यात ७७ प्रकल्पात १५६४.४ दलघमी पाणी उपलब्ध

 नागपूर जिल्ह्यात एकूण ७७ प्रकल्प आहेत. यात ५ मोठे, १२ मध्यम व ६० लघु प्रकल्प आहे. यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे या प्रकल्पांमध्ये एकूण ८९.५६ टक्के पाणीसाठी आहे. या प्रकल्पांची एकूण पाणीसाठा क्षमता १७७७.७३ दलघमी इतकी आहे. एकूण १५६४.४ दलघमी पाणी उपलब्ध आहे. मोठ्या प्रकल्पांमध्ये १२७७.३० दलघमी, मध्यम प्रकल्पात १६०.५ व लघु प्रकल्पांमध्ये १२७.०५ दलघमी इतके पाणी आहे.

टॅग्स :Waterपाणीnagpurनागपूर