शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपूर शहराचे पाणी वाढले : १७३.५०० दलघमी पाणी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 22:48 IST

Water of Nagpur city increased नागपूरकरांना नववर्षासाठी गुड न्यूज आहे. शहराला मिळणाऱ्या पाण्यात वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी नागपूर शहरासाठी १५४ दलघमी पाणी आरक्षित ठेवण्यात आले होते. यावेळी त्यात वाढ करून १७३.५०० दलघमी इतके पाणी आरक्षित केले जाणार आहे.

ठळक मुद्दे पाणी आरक्षणाला मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूरकरांना नववर्षासाठी गुड न्यूज आहे. शहराला मिळणाऱ्या पाण्यात वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी नागपूर शहरासाठी १५४ दलघमी पाणी आरक्षित ठेवण्यात आले होते. यावेळी त्यात वाढ करून १७३.५०० दलघमी इतके पाणी आरक्षित केले जाणार आहे. पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी पाणी आरक्षण बैठकीत संबंधित निर्देश दिले. त्यामुळे आता नागपूरचा पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लागला आहे.

नागपूर शहराला दररोज ६४० एमएलडी पाणी लागते. गेल्यावर्षी प्रत्यक्षात १५६ दलघमी पाणी वापरण्यात आले होते. यावर्षी कोरोना काळात नेहमीपेक्षा कमी पाणी वापरण्यात आले. त्यामुळे जून २०२१ पर्यंत १५२ दलघमी पाणी प्रत्यक्षात वापरले जाईल, असा अंदाज आहे. पाणी आरक्षणासंदर्भात सोमवारी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मनपाने वर्ष २०२०-२१ साठी पेंच प्रकल्पांतर्गत तोतलाडोह धरणातून १७३.५०० दलघमी पाणी देण्याची मागणी केली होती. पालकमंत्र्यांनी ही मागणी तात्काळ मंजूर करण्याचे निर्देश दिले. बैठकीत जिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण नागपूरचे अधीक्षक अभियंता जयंत गवळी, लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश ढुमणे उपस्थित होते. या वर्षी घरगुती व औद्योगिक वापराच्या पाण्याची जितकी मागणी आहे. त्यानुसार पुरेसे पाणी उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत सिंचन विभागाने पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली.

अशी आहे मागणी

 घरघुती व औद्योगिक दोन्ही मिळून नोव्हेंबर २०२० ते जून २०२१ पर्यंत जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांतून १५१.४१ दलघमी पाणी वापरले जाईल. मध्यम प्रकल्पातून १९.४२ दलघमी व लघु प्रकल्पातून ३.२९ दलघमी पाणी वापरले जाईल. तसेच नदीवरून असणाऱ्या पाणी पुरवठ्याची मागणी ५६.१७५ दलघमी आहे.

जिल्ह्यात ७७ प्रकल्पात १५६४.४ दलघमी पाणी उपलब्ध

 नागपूर जिल्ह्यात एकूण ७७ प्रकल्प आहेत. यात ५ मोठे, १२ मध्यम व ६० लघु प्रकल्प आहे. यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे या प्रकल्पांमध्ये एकूण ८९.५६ टक्के पाणीसाठी आहे. या प्रकल्पांची एकूण पाणीसाठा क्षमता १७७७.७३ दलघमी इतकी आहे. एकूण १५६४.४ दलघमी पाणी उपलब्ध आहे. मोठ्या प्रकल्पांमध्ये १२७७.३० दलघमी, मध्यम प्रकल्पात १६०.५ व लघु प्रकल्पांमध्ये १२७.०५ दलघमी इतके पाणी आहे.

टॅग्स :Waterपाणीnagpurनागपूर