शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
4
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेर नाही आली; दरवाजा तोडला तर...
5
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
6
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
7
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
8
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
9
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
10
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
11
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
12
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
13
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
14
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
15
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
16
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
17
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
18
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
19
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
20
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?

विधानभवन परिसरातील नाल्यांमध्ये दारुच्या बाटल्यांचा खच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 16:39 IST

विधानभवन परिसरातील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दारुच्या बाटल्यांचा खच पडला आहे.

नागपूर : एरवी विधानभवन परिसरात सत्ताधारी व विरोधकांमधील होणारी राजकीय चकमक नवीन नाही. या भवनाने अनेकदा असे दावे-प्रतिदावे अनुभवले आहेत व राजकारणाचे विविध रंगदेखील पाहिले आहेत. मात्र शुक्रवारी चक्क दारुच्या बाटल्यांवरुन राजकारण तापल्याचे दिसून आले. 

शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे विधानभवनातील सर्व ‘रेनप्रुफ’ व्यवस्था उघडी पडली. परिसरातील पाण्याचा निचरा व्हावा म्हणून ज्यावेळी गटरचे झाकण उघडण्यात आले तेव्हा त्यात दारुच्या बाटल्या आढळून आल्या. दुर्दैवाची बाब म्हणजे या बाटल्या नेमक्या कुणाच्या कार्यकाळातील आहे, यावरुन सत्तापक्ष व विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये दावे-प्रतिदावे सुरू झाल्याचे दिसून आले.

शुक्रवारी सकाळपासूनच पावसाचा जोर वाढल्याने विधानभवन परिसराला तळ्याचे स्वरुप आले होते. गटारे तुंबल्यामुळे पाण्याचा निचरा होत नव्हता. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, परिवहनमंत्री दिवाकर रावते, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतला. मागच्या बाजूला असलेल्या एका गटाराजवळ मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. त्यामुळे तेथील झाकणे काढण्याची सूचना विधानसभा अध्यक्षांनी केली. कर्मचाऱ्यांनी ज्यावेळी ही झाकणे काढली तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. गटराच्या आत दारुच्या व बिअरच्या बाटल्या होत्या. तत्काळ कर्मचाऱ्यांनी तेथील सर्व कचरा साफ केला व पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था केली. मात्र तोपर्यंत प्रशासनाची पोलखोल झाली होती.

विधानसभा अध्यक्षांनी व्यक्त केली नाराजी

विधानभवन परिसरात बाटल्या आढळल्यामुळे विधानसभा अध्यक्ष नाराज झाले होते. संबंधित बाटल्या लवकर काढा व लगेच परिसराबाहेर फेका, असे निर्देश त्यांनी दिले.

दावे-प्रतिदावे रंगले

दरम्यान, संबंधित बॉटल नेमक्या कुणाच्या कार्यकाळातील आहेत, यावरुन आमदारांकडून दावे-प्रतिदावे झाले. भाजपचे आमदार सुधाकर कोहळे यांनी संबंधित बॉटल या २०१३ च्या असल्याचे सांगत आमच्या कार्यकाळातील त्या नसल्याचे अजब विधान केले. तर शिवसेनेचे आ.अनिल परब यांनी गटारी तुंबल्या तरी कशामुळे याची चौकशी करावी, असे म्हणत बॉटल आल्या कशा याकडे संकेत केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी विधानभवनात दारुच्या बाटल्या येतात आणि सत्ताधाऱ्यांना याची माहितीही कळत नाही, हे दुर्दैवी असल्याचे प्रतिपादन केले.

बाटल्या आल्या तरी कशा?

विधानभवन परिसर हा अत्यंत संवेदनशील व सुरक्षित मानला जातो. येथे प्रत्येकाची तपासणी झाल्यावरच आत येता येते. शिवाय अधिवेशन सुरू होण्याअगोदर कोपऱ्याकोपऱ्याची तपासणी होते. असे असताना येथे बाटल्या नेमक्या आल्या कशा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आ.बच्चू कडू यांनी यासंदर्भात सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

टॅग्स :nagpurनागपूर