शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

विधानभवन परिसरातील नाल्यांमध्ये दारुच्या बाटल्यांचा खच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 16:39 IST

विधानभवन परिसरातील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दारुच्या बाटल्यांचा खच पडला आहे.

नागपूर : एरवी विधानभवन परिसरात सत्ताधारी व विरोधकांमधील होणारी राजकीय चकमक नवीन नाही. या भवनाने अनेकदा असे दावे-प्रतिदावे अनुभवले आहेत व राजकारणाचे विविध रंगदेखील पाहिले आहेत. मात्र शुक्रवारी चक्क दारुच्या बाटल्यांवरुन राजकारण तापल्याचे दिसून आले. 

शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे विधानभवनातील सर्व ‘रेनप्रुफ’ व्यवस्था उघडी पडली. परिसरातील पाण्याचा निचरा व्हावा म्हणून ज्यावेळी गटरचे झाकण उघडण्यात आले तेव्हा त्यात दारुच्या बाटल्या आढळून आल्या. दुर्दैवाची बाब म्हणजे या बाटल्या नेमक्या कुणाच्या कार्यकाळातील आहे, यावरुन सत्तापक्ष व विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये दावे-प्रतिदावे सुरू झाल्याचे दिसून आले.

शुक्रवारी सकाळपासूनच पावसाचा जोर वाढल्याने विधानभवन परिसराला तळ्याचे स्वरुप आले होते. गटारे तुंबल्यामुळे पाण्याचा निचरा होत नव्हता. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, परिवहनमंत्री दिवाकर रावते, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतला. मागच्या बाजूला असलेल्या एका गटाराजवळ मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. त्यामुळे तेथील झाकणे काढण्याची सूचना विधानसभा अध्यक्षांनी केली. कर्मचाऱ्यांनी ज्यावेळी ही झाकणे काढली तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. गटराच्या आत दारुच्या व बिअरच्या बाटल्या होत्या. तत्काळ कर्मचाऱ्यांनी तेथील सर्व कचरा साफ केला व पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था केली. मात्र तोपर्यंत प्रशासनाची पोलखोल झाली होती.

विधानसभा अध्यक्षांनी व्यक्त केली नाराजी

विधानभवन परिसरात बाटल्या आढळल्यामुळे विधानसभा अध्यक्ष नाराज झाले होते. संबंधित बाटल्या लवकर काढा व लगेच परिसराबाहेर फेका, असे निर्देश त्यांनी दिले.

दावे-प्रतिदावे रंगले

दरम्यान, संबंधित बॉटल नेमक्या कुणाच्या कार्यकाळातील आहेत, यावरुन आमदारांकडून दावे-प्रतिदावे झाले. भाजपचे आमदार सुधाकर कोहळे यांनी संबंधित बॉटल या २०१३ च्या असल्याचे सांगत आमच्या कार्यकाळातील त्या नसल्याचे अजब विधान केले. तर शिवसेनेचे आ.अनिल परब यांनी गटारी तुंबल्या तरी कशामुळे याची चौकशी करावी, असे म्हणत बॉटल आल्या कशा याकडे संकेत केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी विधानभवनात दारुच्या बाटल्या येतात आणि सत्ताधाऱ्यांना याची माहितीही कळत नाही, हे दुर्दैवी असल्याचे प्रतिपादन केले.

बाटल्या आल्या तरी कशा?

विधानभवन परिसर हा अत्यंत संवेदनशील व सुरक्षित मानला जातो. येथे प्रत्येकाची तपासणी झाल्यावरच आत येता येते. शिवाय अधिवेशन सुरू होण्याअगोदर कोपऱ्याकोपऱ्याची तपासणी होते. असे असताना येथे बाटल्या नेमक्या आल्या कशा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आ.बच्चू कडू यांनी यासंदर्भात सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

टॅग्स :nagpurनागपूर