शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

नागपूर शहराचे पाणी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूरकरांना नववर्षासाठी गुड न्यूज आहे. शहराला मिळणाऱ्या पाण्यात वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी नागपूर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूरकरांना नववर्षासाठी गुड न्यूज आहे. शहराला मिळणाऱ्या पाण्यात वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी नागपूर शहरासाठी १५४ दलघमी पाणी आरक्षित ठेवण्यात आले होते. यावेळी त्यात वाढ करून १७३.५०० दलघमी इतके पाणी आरक्षित केले जाणार आहे. पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी पाणी आरक्षण बैठकीत संबंधित निर्देश दिले. त्यामुळे आता नागपूरचा पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लागला आहे.

नागपूर शहराला दररोज ६४० एमएलडी पाणी लागते. गेल्यावर्षी प्रत्यक्षात १५६ दलघमी पाणी वापरण्यात आले होते. यावर्षी कोरोना काळात नेहमीपेक्षा कमी पाणी वापरण्यात आले. त्यामुळे जून २०२१ पर्यंत १५२ दलघमी पाणी प्रत्यक्षात वापरले जाईल, असा अंदाज आहे. पाणी आरक्षणासंदर्भात सोमवारी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मनपाने वर्ष २०२०-२१ साठी पेंच प्रकल्पांतर्गत तोतलाडोह धरणातून १७३.५०० दलघमी पाणी देण्याची मागणी केली होती. पालकमंत्र्यांनी ही मागणी तात्काळ मंजूर करण्याचे निर्देश दिले. बैठकीत जिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण नागपूरचे अधीक्षक अभियंता जयंत गवळी, लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश ढुमणे उपस्थित होते. या वर्षी घरगुती व औद्योगिक वापराच्या पाण्याची जितकी मागणी आहे. त्यानुसार पुरेसे पाणी उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत सिंचन विभागाने पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली.

अशी आहे मागणी

- घरघुती व औद्योगिक दोन्ही मिळून नोव्हेंबर २०२० ते जून २०२१ पर्यंत जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांतून १५१.४१ दलघमी पाणी वापरले जाईल. मध्यम प्रकल्पातून १९.४२ दलघमी व लघु प्रकल्पातून ३.२९ दलघमी पाणी वापरले जाईल. तसेच नदीवरून असणाऱ्या पाणी पुरवठ्याची मागणी ५६.१७५ दलघमी आहे.

जिल्ह्यात ७७ प्रकल्पात

१५६४.४ दलघमी पाणी उपलब्ध

- नागपूर जिल्ह्यात एकूण ७७ प्रकल्प आहेत. यात ५ मोठे, १२ मध्यम व ६० लघु प्रकल्प आहे. यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे या प्रकल्पांमध्ये एकूण ८९.५६ टक्के पाणीसाठी आहे. या प्रकल्पांची एकूण पाणीसाठा क्षमता १७७७.७३ दलघमी इतकी आहे. एकूण १५६४.४ दलघमी पाणी उपलब्ध आहे. मोठ्या प्रकल्पांमध्ये १२७७.३० दलघमी, मध्यम प्रकल्पात १६०.५ व लघु प्रकल्पांमध्ये १२७.०५ दलघमी इतके पाणी आहे.