शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नागपूरनजिकच्या कन्हान नदीचा जलस्तर उन्हाळ्यापूर्वीच घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 11:21 IST

अद्याप उन्हाळ्याला सुरुवात झालेली नाही. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात कन्हान नदीचा जलस्तर घटला आहे.

ठळक मुद्देउत्तर व पूर्व नागपूरचा पाणीपुरवठा बाधित जलसंपदा विभागाने सोडले ५० क्युसेक पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अद्याप उन्हाळ्याला सुरुवात झालेली नाही. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात कन्हान नदीचा जलस्तर घटला आहे. बुधवारी सकाळी घेतलेल्या मोजमापानुसार बीणा संगम येथे नदीचा प्रवाह १२९ एमएलडी इतका होता.  या प्रवाहात कन्हान जलशुद्धीकरण केंद्र पूर्ण क्षमतेने चालविणे शक्य नाही. यामुळे उत्तर व पूर्व नागपूरचा पाणीपुरवठा सकाळीदेखील बाधित राहिला. ही परिस्थिती आणखी काही दिवसपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.पावसाळ्यात पूर्व विदर्भ व पेंन नदीच्या पाणलोट क्षेत्रात अपुरा पाऊ स झाला. त्यातच तोतलाडोहच्या वरील भागात मध्यप्रदेशात चौराई धरण बांधण्यात आले आहे. यामुळे तोतलाडोह प्रकल्पात ३० टक्केच जलसाठा शिल्लक आहे.यामुळे अचानक पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या उन्हाळ्यात पाण्याची संभाव्य वाढीव मागणी लक्षात घेऊ न महापालिका व ओसीडब्ल्यू यांनी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना अतिरिक्त पाणी कन्हान नदीमध्ये सोडण्याची विनंती केली आहे. त्यांच्या सूचनेनुसार जलसंपदा विभागाने उजव्या कालव्यातून ५० क्युसेक पाणी सोडले आहे. नदीत सोडलेले हे पाणी उजव्या कालव्याच्या एस्केप गेटमधून ३२ किमी प्रवास करून ७२ तासांत म्हणजेच रविवारी १० फेब्रुवारीला सकाळी १० वाजता कन्हान इनटेक वेल येथे पोहचेल. या काळात नियंत्रित पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून उत्तर व पूर्व नागपूरला कमीत कमी त्रास होईल.कालव्यात सोडलेले पाणी कुठल्याही प्रकारचा अडथळा न येता ७२ तासांत इनटेक वेलपर्यंत पोहचावे यासाठी महापालिका व ओसीडब्ल्यू यांनी पाहणी सुरू केली आहे. कन्हान जलशुद्धीकरण येथे नदीचा प्रवाह पूर्णपणे इनटेक वेलकडे वळवण्यात आलेला आहे व तात्पुरता बंधारा बांधण्यात आला आहे .जेणेकरून उपलब्ध पाणी वाहून जाणार नाही. यासाठी जलसंपदा विभागाच्या उजव्या कालव्यात रेतीची पोती टाकलेली आहे. या पोत्यांमुळे सोडण्यात आलेले पाणी एस्केप गेटकडे वळवण्याला मदत होईल.

टॅग्स :Kanhan Riverकन्हान नदीWaterपाणी