शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी हाहाकार :अनेक ठिकाणी केवळ तासभरच नळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 00:58 IST

पाण्याच्या भीषण टंचाईमुळे मनपाने शहरात एक दिवसा आड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बुधवारी शहरात नळ सोडण्यात आले नव्हते. त्यामुळे चांगलाच हाहाकार उडाला. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागली. आज गुरुवारी नळ सोडल्यामुळे काहिसा दिलासा मिळाला.

ठळक मुद्देराजकीय पक्षही उतरले रस्त्यावर 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाण्याच्या भीषण टंचाईमुळे मनपाने शहरात एक दिवसा आड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बुधवारी शहरात नळ सोडण्यात आले नव्हते. त्यामुळे चांगलाच हाहाकार उडाला. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागली. आज गुरुवारी नळ सोडल्यामुळे काहिसा दिलासा मिळाला.बुधवारी शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे मोल खऱ्या अर्थाने कळले. नळ न आल्याने दिवसभर पाणी कसेबसे वापरण्यात आले. परंतु सायंकाळपर्यंत अनेकांच्या घरचे पाणी संपले होते. शेजारी पाणी मागितले असता त्याच्याकडेही पाणी कुठून येणार. प्रत्येकाची सारखीच अवस्था होती. पिण्यासाठीही पाणी शिल्लक नव्हते. अशा वेळी नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे कॅन बोलावून रात्र काढावी लागली. बुधवारचा फटका लक्षात असल्याने गुरुवारी अनेकजण खास पाण्यासाठी सकाळीच उठले. दुसऱ्या दिवशी नळ येणार नाहीत याची जाणीव असल्याने पाणी साठवून ठेवण्यासाठी नागरिकांनी घरातील राखून ठेवलेली भांडीही बाहेर काढली. ड्रम आदी वस्तू बाहेर काढल्या. परंतु अनेक ठिकाणी केवळ तासभर नळ सोडल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.पिण्याच्या पाण्याचा त्रास केवळ नागरिकांनाच होत नाही तर रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही याचा फटका बसला आहे. रेल्वेत पाणी भरणे बंद करण्यात आले आहे. नागरिकांना होत असलेला हा त्रास पाहता राजकीय पक्षही रस्त्यावर उतरले आहेत. गुरुवारी दुपारी मनपाच्या विरोधात मटका फोडो आंदोलन करण्यात आले. माजी मंत्री अनिस अहमद यांनी शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.एकूणच शहरात पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली असून लवकरच मुसळधार पाऊस न आल्यास संतप्त नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका