शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

पाण्यासाठी हाहाकार :अनेक ठिकाणी केवळ तासभरच नळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 00:58 IST

पाण्याच्या भीषण टंचाईमुळे मनपाने शहरात एक दिवसा आड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बुधवारी शहरात नळ सोडण्यात आले नव्हते. त्यामुळे चांगलाच हाहाकार उडाला. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागली. आज गुरुवारी नळ सोडल्यामुळे काहिसा दिलासा मिळाला.

ठळक मुद्देराजकीय पक्षही उतरले रस्त्यावर 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाण्याच्या भीषण टंचाईमुळे मनपाने शहरात एक दिवसा आड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बुधवारी शहरात नळ सोडण्यात आले नव्हते. त्यामुळे चांगलाच हाहाकार उडाला. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागली. आज गुरुवारी नळ सोडल्यामुळे काहिसा दिलासा मिळाला.बुधवारी शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे मोल खऱ्या अर्थाने कळले. नळ न आल्याने दिवसभर पाणी कसेबसे वापरण्यात आले. परंतु सायंकाळपर्यंत अनेकांच्या घरचे पाणी संपले होते. शेजारी पाणी मागितले असता त्याच्याकडेही पाणी कुठून येणार. प्रत्येकाची सारखीच अवस्था होती. पिण्यासाठीही पाणी शिल्लक नव्हते. अशा वेळी नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे कॅन बोलावून रात्र काढावी लागली. बुधवारचा फटका लक्षात असल्याने गुरुवारी अनेकजण खास पाण्यासाठी सकाळीच उठले. दुसऱ्या दिवशी नळ येणार नाहीत याची जाणीव असल्याने पाणी साठवून ठेवण्यासाठी नागरिकांनी घरातील राखून ठेवलेली भांडीही बाहेर काढली. ड्रम आदी वस्तू बाहेर काढल्या. परंतु अनेक ठिकाणी केवळ तासभर नळ सोडल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.पिण्याच्या पाण्याचा त्रास केवळ नागरिकांनाच होत नाही तर रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही याचा फटका बसला आहे. रेल्वेत पाणी भरणे बंद करण्यात आले आहे. नागरिकांना होत असलेला हा त्रास पाहता राजकीय पक्षही रस्त्यावर उतरले आहेत. गुरुवारी दुपारी मनपाच्या विरोधात मटका फोडो आंदोलन करण्यात आले. माजी मंत्री अनिस अहमद यांनी शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.एकूणच शहरात पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली असून लवकरच मुसळधार पाऊस न आल्यास संतप्त नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका