शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

पाण्यासाठी हाहाकार :अनेक ठिकाणी केवळ तासभरच नळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 00:58 IST

पाण्याच्या भीषण टंचाईमुळे मनपाने शहरात एक दिवसा आड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बुधवारी शहरात नळ सोडण्यात आले नव्हते. त्यामुळे चांगलाच हाहाकार उडाला. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागली. आज गुरुवारी नळ सोडल्यामुळे काहिसा दिलासा मिळाला.

ठळक मुद्देराजकीय पक्षही उतरले रस्त्यावर 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाण्याच्या भीषण टंचाईमुळे मनपाने शहरात एक दिवसा आड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बुधवारी शहरात नळ सोडण्यात आले नव्हते. त्यामुळे चांगलाच हाहाकार उडाला. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागली. आज गुरुवारी नळ सोडल्यामुळे काहिसा दिलासा मिळाला.बुधवारी शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे मोल खऱ्या अर्थाने कळले. नळ न आल्याने दिवसभर पाणी कसेबसे वापरण्यात आले. परंतु सायंकाळपर्यंत अनेकांच्या घरचे पाणी संपले होते. शेजारी पाणी मागितले असता त्याच्याकडेही पाणी कुठून येणार. प्रत्येकाची सारखीच अवस्था होती. पिण्यासाठीही पाणी शिल्लक नव्हते. अशा वेळी नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे कॅन बोलावून रात्र काढावी लागली. बुधवारचा फटका लक्षात असल्याने गुरुवारी अनेकजण खास पाण्यासाठी सकाळीच उठले. दुसऱ्या दिवशी नळ येणार नाहीत याची जाणीव असल्याने पाणी साठवून ठेवण्यासाठी नागरिकांनी घरातील राखून ठेवलेली भांडीही बाहेर काढली. ड्रम आदी वस्तू बाहेर काढल्या. परंतु अनेक ठिकाणी केवळ तासभर नळ सोडल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.पिण्याच्या पाण्याचा त्रास केवळ नागरिकांनाच होत नाही तर रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही याचा फटका बसला आहे. रेल्वेत पाणी भरणे बंद करण्यात आले आहे. नागरिकांना होत असलेला हा त्रास पाहता राजकीय पक्षही रस्त्यावर उतरले आहेत. गुरुवारी दुपारी मनपाच्या विरोधात मटका फोडो आंदोलन करण्यात आले. माजी मंत्री अनिस अहमद यांनी शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.एकूणच शहरात पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली असून लवकरच मुसळधार पाऊस न आल्यास संतप्त नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका