शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

उपराजधानीवर जलसंकट; काटकसरीने वापरण्याचा पालकमंत्र्यांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 10:41 IST

अपुरा पाऊस आणि जलाशयामध्ये असलेला अपुरा साठा यामुळे नागपूर शहरासह संपूर्ण जिल्हा जलसंकटाच्या छायेत आहे.

ठळक मुद्देशहरासाठी पेंचमधून १५५ दलघमी पाणीकन्हान-कोलार नदीवर बांधणार धरणसुरागोंदी-अंबाझरीतील पाण्याचाही विचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: अपुरा पाऊस आणि जलाशयामध्ये असलेला अपुरा साठा यामुळे नागपूर शहरासह संपूर्ण जिल्हा जलसंकटाच्या छायेत आहे. उन्हाळ्यात परिस्थिती अधिकच चिंताजनक होऊ शकते. त्यामुळे जलसंकटाची परिस्थिती लक्षात घेता पिण्याच्या पाण्याचा वापर अतिशय काळजीपूर्वक व काटकसरीने करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.पेंच प्रकल्पांतर्गत असलेल्या तीन धरणांमध्ये केवळ २८३.६६८ दश लक्ष घन मीटर म्हणजे २२.४८ टक्के साठा उपलब्ध आहे. या प्रकल्पामध्ये महानगरपालिकेसाठी १५५ दलघमी पाण्याचे आरक्षण असून कळमेश्वर, पारशिवनी, रामटेक, नगरधन आदी शहरांसाठी पाणी पुरविण्यात येते. यावर्षी उपलब्ध असलेल्या जलसाठ्यानुसार शहरासाठी पाणी उपलब्ध होणार नसल्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर आवश्यक आहे. तसेच पाण्याचे इतर पर्यायही शोधले जात आहे, असे पालकमंत्री बावकुळे यांनी स्पष्ट केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात पाणी आरक्षण समितीची बैठक पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली. महापौर नंदा जिचकार, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, आ. सुधाकर देशमुख,आ. जोगेंद्र कवाडे, आ.डॉ. मिलिंद माने, आ.गिरीश व्यास, माजी आ. आशिष देशमुख, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता जयंत गवळी, कार्यकारी अभियंता एस.जी. ढवळे, जितेंद्र तुरखेडे तसेच सर्व नगर परिषद, नगर पंचायतचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.नागपूर शहरासाठी पेंच जलाशयातून पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी येणाऱ्या मर्यादा बघता कन्हानमधून वाहून जाणारे पाणी अडविण्याची व्यवस्था करणे तसेच कन्हान-कोलार नदीवर प्रकल्प बांधून शहराला पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने पर्याय म्हणून प्रस्ताव तयार करण्यात येत आहे, असे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले. वाडी नगर परिषद तसेच डिफेन्ससाठी वेणा जलाशयातून पाणीपुरवठा करण्यात येतो. प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, विभागाने विद्यापीठाच्या विविध चमूतील खेळाडूंसाठी ब्लेझर, ट्रॅकसूट व स्पोर्ट कीटची खरेदी केली होती. नियमानुसार तीन लाखापर्यंत खरेदीचा अधिकार विभागाला असतो. त्यापेक्षा अधिक रकमेची खरेदी करण्यासाठी निविदा काढणे आवश्यक आहे. निविदा मागविल्यानंतर सामानाच्या खरेदीसाठी कुलगुरुंची मंजुरी घेणे आवश्यक आहे. परंतु असे करण्यात आले नाही. निविदा काढण्यापूर्वीच सामान मागविण्यात आले. विना मंजुरी घेता एका व्यक्तीला कंत्राट देण्यात आले. सामानाचा पुरवठाही झाला आहे. बिलाला मंजुरी देण्यासाठी समितीसमोर ठेवण्यात आले. यावर बैठकीत उपस्थित सदस्यांनी आक्षेप घेतला. या बाबीची गंभीर दखल घेऊन समितीने खरेदीला मंजुरी देण्यास नकार दिला. सोबतच विभागाच्या संचालक डॉ. कल्पना वसंत जाधव यांना स्पष्टीकरण मागितले होते.अपव्यय टाळण्यासाठी स्वतंत्र बैठकशहरात आधीच पाणी कमी आहे. यातच पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. यावर बैठकीत बरीच चर्चा झाली. तेव्हा शहरात पिण्याच्या पाण्याचा होणारा अपव्यव टाळण्यासंदर्भात स्वतंत्र बैठक घेऊन उपाययोजना करण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी जाहीर केले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई