शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

उपराजधानीवर जलसंकट; काटकसरीने वापरण्याचा पालकमंत्र्यांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 10:41 IST

अपुरा पाऊस आणि जलाशयामध्ये असलेला अपुरा साठा यामुळे नागपूर शहरासह संपूर्ण जिल्हा जलसंकटाच्या छायेत आहे.

ठळक मुद्देशहरासाठी पेंचमधून १५५ दलघमी पाणीकन्हान-कोलार नदीवर बांधणार धरणसुरागोंदी-अंबाझरीतील पाण्याचाही विचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: अपुरा पाऊस आणि जलाशयामध्ये असलेला अपुरा साठा यामुळे नागपूर शहरासह संपूर्ण जिल्हा जलसंकटाच्या छायेत आहे. उन्हाळ्यात परिस्थिती अधिकच चिंताजनक होऊ शकते. त्यामुळे जलसंकटाची परिस्थिती लक्षात घेता पिण्याच्या पाण्याचा वापर अतिशय काळजीपूर्वक व काटकसरीने करा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.पेंच प्रकल्पांतर्गत असलेल्या तीन धरणांमध्ये केवळ २८३.६६८ दश लक्ष घन मीटर म्हणजे २२.४८ टक्के साठा उपलब्ध आहे. या प्रकल्पामध्ये महानगरपालिकेसाठी १५५ दलघमी पाण्याचे आरक्षण असून कळमेश्वर, पारशिवनी, रामटेक, नगरधन आदी शहरांसाठी पाणी पुरविण्यात येते. यावर्षी उपलब्ध असलेल्या जलसाठ्यानुसार शहरासाठी पाणी उपलब्ध होणार नसल्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर आवश्यक आहे. तसेच पाण्याचे इतर पर्यायही शोधले जात आहे, असे पालकमंत्री बावकुळे यांनी स्पष्ट केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात पाणी आरक्षण समितीची बैठक पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली. महापौर नंदा जिचकार, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, आ. सुधाकर देशमुख,आ. जोगेंद्र कवाडे, आ.डॉ. मिलिंद माने, आ.गिरीश व्यास, माजी आ. आशिष देशमुख, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता जयंत गवळी, कार्यकारी अभियंता एस.जी. ढवळे, जितेंद्र तुरखेडे तसेच सर्व नगर परिषद, नगर पंचायतचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.नागपूर शहरासाठी पेंच जलाशयातून पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी येणाऱ्या मर्यादा बघता कन्हानमधून वाहून जाणारे पाणी अडविण्याची व्यवस्था करणे तसेच कन्हान-कोलार नदीवर प्रकल्प बांधून शहराला पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने पर्याय म्हणून प्रस्ताव तयार करण्यात येत आहे, असे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले. वाडी नगर परिषद तसेच डिफेन्ससाठी वेणा जलाशयातून पाणीपुरवठा करण्यात येतो. प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, विभागाने विद्यापीठाच्या विविध चमूतील खेळाडूंसाठी ब्लेझर, ट्रॅकसूट व स्पोर्ट कीटची खरेदी केली होती. नियमानुसार तीन लाखापर्यंत खरेदीचा अधिकार विभागाला असतो. त्यापेक्षा अधिक रकमेची खरेदी करण्यासाठी निविदा काढणे आवश्यक आहे. निविदा मागविल्यानंतर सामानाच्या खरेदीसाठी कुलगुरुंची मंजुरी घेणे आवश्यक आहे. परंतु असे करण्यात आले नाही. निविदा काढण्यापूर्वीच सामान मागविण्यात आले. विना मंजुरी घेता एका व्यक्तीला कंत्राट देण्यात आले. सामानाचा पुरवठाही झाला आहे. बिलाला मंजुरी देण्यासाठी समितीसमोर ठेवण्यात आले. यावर बैठकीत उपस्थित सदस्यांनी आक्षेप घेतला. या बाबीची गंभीर दखल घेऊन समितीने खरेदीला मंजुरी देण्यास नकार दिला. सोबतच विभागाच्या संचालक डॉ. कल्पना वसंत जाधव यांना स्पष्टीकरण मागितले होते.अपव्यय टाळण्यासाठी स्वतंत्र बैठकशहरात आधीच पाणी कमी आहे. यातच पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. यावर बैठकीत बरीच चर्चा झाली. तेव्हा शहरात पिण्याच्या पाण्याचा होणारा अपव्यव टाळण्यासंदर्भात स्वतंत्र बैठक घेऊन उपाययोजना करण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी जाहीर केले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई