शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

धो-धो बरसला

By admin | Updated: October 11, 2016 03:30 IST

उपराजधानीत सोमवारी दुपारी अचानक धो-धो वादळी पाऊस बरसला. या पावसाने दीक्षाभूमीसह संपूर्ण

नागपूर : उपराजधानीत सोमवारी दुपारी अचानक धो-धो वादळी पाऊस बरसला. या पावसाने दीक्षाभूमीसह संपूर्ण शहरात एकच तारांबळ उडाली. शिवाय अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडे पडल्याने जाम लागला होता. विशेष म्हणजे, उद्या दीक्षाभूमीवर आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी देशभरातील लाखो बौद्घ बांधव येथे दाखल झाले असून, त्यांनाही या पावसाचा सामना करावा लागला. अवघ्या अर्धा तासात शहरात २२.६ मिमी. पावसाची नोंद झाली. विशेष म्हणजे, सप्टेंबरच्या अखेरीस परतीचा मान्सून थांबतो. परंतु यंदा आॅक्टोबर महिन्यात सुद्धा तो सक्रिय दिसून येत आहे. हवामान खात्याच्या मते, बंगालची खाडी व छत्तीसगडमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मध्यभारतात पावसाचा जोर वाढला. ११ आॅक्टोबरपर्यंत पावसाची अशीच स्थिती राहणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. शिवाय दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास वादळी पावसाला सुरुवात झाली. यानंतर तो साधारण अर्धा तास चांगलाच बरसला. याचवेळी विदर्भातील अन्य जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाल्याची माहिती पुढे आली आहे. यात सिरोंचा व गोंडपिपरी येथे ५० मिमी, भामरागड, कोरची, धानोरा व मूल येथे २०.२० मिमी व एटापल्ली, चामोर्शी, कोरपना, लाखनी आणि संग्रामपूर या भागात १०.१० मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. (प्रतिनिधी) बसस्थानकावर झाड पडले अचानक आलेल्या वादळी पावसाने शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडे पडली होती. यात विमानतळाशेजारी एक झाड रस्त्यावर पडल्याने या मार्गावरील वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती. यानंतर मनपाच्या उद्यान विभागाला घटनेची माहिती देण्यात आली. त्यावर मनपा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून रस्त्यावरील झाड हटविले. मात्र त्याचवेळी सिव्हिल लाईन्स परिसरातील जीपीओ चौक आणि वेस्ट हायकोर्ट रोडवरील एका बसस्थानकावर झाड पडल्याची घटना पुढे आली. यात बसस्थानकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच सिव्हिल लाईन्स परिसरातील जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी एक झाड पडले. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लगेच या सर्व ठिकाणी पोहोचून झाडे रस्त्यांवरून हटविली.