शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
5
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
6
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
7
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
8
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
9
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
10
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
11
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
12
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
13
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
14
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
15
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
16
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
17
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
18
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
19
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
20
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

चंद्रपुरात दाेन दिवस उष्ण लाटेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 00:12 IST

एकीकडे काेराेना आणि आकाशातून आग ओकणारा सूर्य तापदायक हाेत आहे. हाेळीनंतर तापमानात चांगलीच वाढ हाेत आहे. हवामान विभागाने विदर्भातील चंद्रपूर जिल्हावासीयांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देविदर्भात पाच दिवस तापदायकच : हवामान खात्याचा अंदाज

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : एकीकडे काेराेना आणि आकाशातून आग ओकणारा सूर्य तापदायक हाेत आहे. हाेळीनंतर तापमानात चांगलीच वाढ हाेत आहे. हवामान विभागाने विदर्भातील चंद्रपूर जिल्हावासीयांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. येत्या ३ व ४ एप्रिल राेजी जिल्ह्यातील तापमान ४५ अंशापर्यंत जाण्याची शक्यता असून, उष्ण लाट येण्याचा इशारा विभागाने दिला आहे. नागपूरचे शुक्रवारचे तापमान ४० अंश नाेंदविण्यात आले. विदर्भवासीयांसाठी पुढचे पाच दिवस तापदायकच जाणार असून, हा आणि पुढचा मे महिना परीक्षा घेणारा ठरणार आहे.

हाेळीपूर्वीचे काही दिवस नागरिकांना वातावरणाने सुखावले हाेते. पण त्यानंतर अचानक तापमानात ४ ते ५ अंशाची वाढ झाली. ३० मार्चला नागपूरचा पारा थेट ४२ अंशावर पाेहचला. त्यानंतर २ अंश खाली उतरून स्थिर झाला. मात्र विदर्भातील चंद्रपूर जिल्हा तापलेलाच आहे. पुढचे दाेन दिवस त्यात आणखी वाढ हाेणार आहे. शुक्रवारी चंद्रपुरात ४३.६ अंश तापमानाची नाेंद झाली, जी या काळात सर्वाधिक आहे. मात्र येणाऱ्या दाेन दिवसात हीट वेव्हज येतील. जिल्ह्यातील बल्लारपूरचे तापमान ४४.९ पर्यंत तर राजुरामध्ये पारा ४५ अंशापर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. ब्रह्मपुरी, जिवती व इतर भागात तापमान ४४.९ अंशापर्यंत वाढणार असल्याची नाेंद हवामान विभागाने केली आहे.

दरम्यान, चंद्रपूरनंतर गडचिराेली ४१.६, भंडारा ४१.४, यवतमाळ ४१.७, वर्धा ४१.१, अकाेला ४०.७, अमरावती ४०.२, गाेंदिया व वाशिममध्ये ४० अंश तापमानाची नाेंद करण्यात आली. येत्या पाच दिवसात यामध्ये २ ते ३ अंशाची वाढ हाेण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

एप्रिल-मेमध्ये हीट वेव्हज

एप्रिलच्या पुढच्या पंधरवड्यात आणि मे महिन्यात तापमानात आणखी वाढ हाेणार असून, उष्णतेच्या लाटा येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ, मध्य भारतासह उत्तर-पूर्व भागात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहील, असा अंदाज आहे. चालू दशकात तापमानात चांगलीच वाढ झाली असून, २०१५ ते २०२० ही वर्षे अत्याधिक तापमानाची ठरली. २०२१ या वर्षात आणखी तीव्रता जाणवणार असल्याचा धाेका हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. विदर्भात एप्रिल-मे महिन्यात तापमान सरासरीपेक्षा १ ते २ अंशाने वाढण्याची म्हणजे पारा ४५ वर जाण्याची शक्यता आहे. आताच उन्हाचे चटके असह्य वाटत असल्याने येत्या काळात परिस्थिती आणखी गंभीर हाेण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Sun strokeउष्माघातVidarbhaविदर्भ