शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात दाेन दिवस उष्ण लाटेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 00:12 IST

एकीकडे काेराेना आणि आकाशातून आग ओकणारा सूर्य तापदायक हाेत आहे. हाेळीनंतर तापमानात चांगलीच वाढ हाेत आहे. हवामान विभागाने विदर्भातील चंद्रपूर जिल्हावासीयांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देविदर्भात पाच दिवस तापदायकच : हवामान खात्याचा अंदाज

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : एकीकडे काेराेना आणि आकाशातून आग ओकणारा सूर्य तापदायक हाेत आहे. हाेळीनंतर तापमानात चांगलीच वाढ हाेत आहे. हवामान विभागाने विदर्भातील चंद्रपूर जिल्हावासीयांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. येत्या ३ व ४ एप्रिल राेजी जिल्ह्यातील तापमान ४५ अंशापर्यंत जाण्याची शक्यता असून, उष्ण लाट येण्याचा इशारा विभागाने दिला आहे. नागपूरचे शुक्रवारचे तापमान ४० अंश नाेंदविण्यात आले. विदर्भवासीयांसाठी पुढचे पाच दिवस तापदायकच जाणार असून, हा आणि पुढचा मे महिना परीक्षा घेणारा ठरणार आहे.

हाेळीपूर्वीचे काही दिवस नागरिकांना वातावरणाने सुखावले हाेते. पण त्यानंतर अचानक तापमानात ४ ते ५ अंशाची वाढ झाली. ३० मार्चला नागपूरचा पारा थेट ४२ अंशावर पाेहचला. त्यानंतर २ अंश खाली उतरून स्थिर झाला. मात्र विदर्भातील चंद्रपूर जिल्हा तापलेलाच आहे. पुढचे दाेन दिवस त्यात आणखी वाढ हाेणार आहे. शुक्रवारी चंद्रपुरात ४३.६ अंश तापमानाची नाेंद झाली, जी या काळात सर्वाधिक आहे. मात्र येणाऱ्या दाेन दिवसात हीट वेव्हज येतील. जिल्ह्यातील बल्लारपूरचे तापमान ४४.९ पर्यंत तर राजुरामध्ये पारा ४५ अंशापर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. ब्रह्मपुरी, जिवती व इतर भागात तापमान ४४.९ अंशापर्यंत वाढणार असल्याची नाेंद हवामान विभागाने केली आहे.

दरम्यान, चंद्रपूरनंतर गडचिराेली ४१.६, भंडारा ४१.४, यवतमाळ ४१.७, वर्धा ४१.१, अकाेला ४०.७, अमरावती ४०.२, गाेंदिया व वाशिममध्ये ४० अंश तापमानाची नाेंद करण्यात आली. येत्या पाच दिवसात यामध्ये २ ते ३ अंशाची वाढ हाेण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

एप्रिल-मेमध्ये हीट वेव्हज

एप्रिलच्या पुढच्या पंधरवड्यात आणि मे महिन्यात तापमानात आणखी वाढ हाेणार असून, उष्णतेच्या लाटा येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ, मध्य भारतासह उत्तर-पूर्व भागात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहील, असा अंदाज आहे. चालू दशकात तापमानात चांगलीच वाढ झाली असून, २०१५ ते २०२० ही वर्षे अत्याधिक तापमानाची ठरली. २०२१ या वर्षात आणखी तीव्रता जाणवणार असल्याचा धाेका हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. विदर्भात एप्रिल-मे महिन्यात तापमान सरासरीपेक्षा १ ते २ अंशाने वाढण्याची म्हणजे पारा ४५ वर जाण्याची शक्यता आहे. आताच उन्हाचे चटके असह्य वाटत असल्याने येत्या काळात परिस्थिती आणखी गंभीर हाेण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Sun strokeउष्माघातVidarbhaविदर्भ