शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दारुबंदीसाठी बिहारसारखी इच्छाशक्ती हवी

By admin | Updated: April 13, 2017 03:07 IST

दारुबंदीचा कायदा कठोर करून त्याची व्यवस्थित अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. परंतु राज्यशासन दारूचा कमाईचा स्रोत

मेधा पाटकर : नशामुक्त भारत राष्ट्रीय संमेलन नागपूर : दारुबंदीचा कायदा कठोर करून त्याची व्यवस्थित अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. परंतु राज्यशासन दारूचा कमाईचा स्रोत मानत असल्यामुळे दारुबंदीसाठी पुढाकार घेत नाही. त्यामुळे दारुबंदी होण्यासाठी बिहारसारखी राजकीय इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी बुधवारी येथे केले. नशा मुक्त भारत आंदोलनाच्यावतीने सिव्हील लाईन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले. व्यासपीठावर आर्य प्रतिनिधी सभेचे संयोजक स्वामी अग्निवेश, स्वामिनी दारुबंदी अभियानाचे महेश पवार, ग्राम संरक्षण दलाच्या माया चवरे, गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे विलास भोंगाडे, कोळसा श्रमिक सभेचे दीपक चौधरी, नशामुक्त भारत आंदोलनाचे संयोजक डॉ. सुनीलम, डॉ. सुरेश खैरनार, आमदार बी. आर. पाटील, शाम रज्जक, अ‍ॅड आराधना भार्गव, गौतम बंडोपाध्याय, सदाशिव मगदुम, प्रफुल्ल सामंतराय आदी प्रतिनिधी उपस्थित होते. मेधा पाटकर म्हणाल्या, लोक प्रतिनिधींनी दारुबंदीचा मुद्दा लावून धरणे आवश्यक आहे. दारू हेच महिलांवरील अत्याचाराचे प्रमुख कारण आहे. दारूचे परवाने राजकीय नेते वाटतात. त्यामुळे राजकारणावर दारू माफियांचा प्रभाव मोठा आहे. पंतप्रधान मोदींनी जेथे भाजपचे सरकार आहे, त्या राज्यात तरी किमान दारुबंदी करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आठ टक्के आत्महत्या दारूमुळे झाल्याचे समोर आले आहे. तरुणांमध्येही नशेचे प्रमाण वाढत आहे. दारुबंदीसाठी जनमत चाचणी घ्यावी, या चाचणीत घोळ होऊ नये. हाय वे पासून ५०० मीटरवर दारूचे दुकान असू नये हा शासनाचा निर्णय दारुबंदीतील पळवाट असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक दीपक चौधरी यांनी केले. संचालन डॉ. सुनीलम यांनी केले. आभार विलास भोंगाडे यांनी मानले. कार्यक्रमाला विविध राज्यातून आलेले नशा मुक्त भारत आंदोलनाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी) गाय विकणाऱ्यालाही शिक्षा व्हावी : स्वामी अग्निवेश सरसंघचालक मोहन भागवत यांनी गोहत्या बंदीची मागणी केली, त्यांच्या मागणीचे स्वागत आहे. केवळ गाय कापणाऱ्यालाच नव्हे तर गाय विकणाऱ्यालाही शिक्षा व्हावी, अशी भूमिका स्वामी अग्निवेश यांनी मांडली. १९६८ पासून लाल किल्ल्यासमोर हातात मशाल घेऊन दारुबंदीचे आंदोलन सुरू केले. त्यासाठी आठ वेळा तुरुंगवास सोसला. अनेकदा जीवघेणे हल्ले झाले. संमेलनात १ मे पासून दारुबंदीचे आवाहन करण्यात येणार आहे. २ आॅक्टोबरपूर्वी देशात दारुबंदी व्हावी, असा प्रयत्न राहणार आहे. गुजरातमध्ये दारुबंदीमुळे महिला सुरक्षित आहेत, असेही त्यांनी सांगितले. दारुबंदीसाठी दीक्षाभूमीवरून रॅली नशामुक्त भारत आंदोलनाच्या वतीने देशपांडे सभागृहात राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले. त्यापूर्वी दीक्षाभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकाळी १० वाजता रॅली काढण्यात आली. रॅलीत सहभागी महिला, पुरुष, युवकांनी ‘दारुबंदी झालीच पाहिजे’, ‘नशामुक्त भारत आंदोलन जिंदाबाद’, ‘शराब के ठेके तोड दो’ अशा घोषणा देऊन दारुबंदीची मागणी रेटून धरली. दुपारी १२ वाजता रॅलीचा देशपांडे सभागृहात समारोप करण्यात आला. ग्रामीण भागातील महिलांचा उत्साह नशामुक्त भारत राष्ट्रीय संमेलनात सहभागी होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून महिला-पुरुष आले होते. यात सहभागी झालेल्या महिलांमध्ये उत्साह दिसून आला. अनेक महिलांनी स्वयंस्फूर्तीने व्यासपीठावर येऊन दारुबंदीवर गीत सादर करून अनुभवकथन केले. यातील बहुसंख्य पुरुष आणि महिला ग्रामीण भागातील असल्याचे दिसले. त्यामुळे ग्रामीण भागात दारूमुळे किती जणांचे संसार उद्ध्वस्त झाले असतील, याची प्रचिती आली.