शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

जीवनात यशस्वी होण्यासाठी हवी जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 01:07 IST

प्रत्येकाने स्वप्न पाहावे आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर परिश्रम करावे. जगात अनेक आव्हाने आहेत. पण सृजनशील संकल्पना आणि यश प्राप्त करण्याची इच्छा असेल तर भाषा अडथळा होऊ शकत नाही. जीवनात स्वप्नाचा पाठपुरावा केल्यास यश हमखास मिळते. पण त्यासाठी मनात जिद्द, परिश्रम करण्याची तयारी आणि आत्मविश्वासाची जोड हवी, असा विश्वास भारतातील यशस्वी युवकांनी येथे व्यक्त केला.

ठळक मुद्दे युवकांचे प्रेरणा देणारे कथन : ‘यूथ’ संस्थेचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रत्येकाने स्वप्न पाहावे आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर परिश्रम करावे. जगात अनेक आव्हाने आहेत. पण सृजनशील संकल्पना आणि यश प्राप्त करण्याची इच्छा असेल तर भाषा अडथळा होऊ शकत नाही. जीवनात स्वप्नाचा पाठपुरावा केल्यास यश हमखास मिळते. पण त्यासाठी मनात जिद्द, परिश्रम करण्याची तयारी आणि आत्मविश्वासाची जोड हवी, असा विश्वास भारतातील यशस्वी युवकांनी येथे व्यक्त केला.‘यूथ’ संस्थेच्या वतीने ‘यूथ टॉक’ या युवकांच्या यशस्वी जीवनाचे कथन करणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन आयटी पार्क, दक्षिण अंबाझरी मार्गावरील पर्सिस्टंट सिस्टीम आॅडिटोरियमध्ये शनिवारी करण्यात आले. या वेळी ‘यूथ’ संस्थेच्या संस्थापिका व सीईओ, पर्सिस्टंट सिस्टीम्सचे सीईओ समीर बेंदे, नागपूर एन्जल्सचे सहसंस्थापक शशिकांत चौधरी, इंडिया नेटवर्कच्या पल्लवी राव नार्वेकर, वन्यजीव अभ्यासक डॉ. जेरिल बानाईत, प्रहारच्या ट्रस्टी फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे, रिनोव्हेटिओ एनजीओचे संस्थापक नकुल अग्रवाल, उद्योजिका व वक्त्या स्वयमा अहमद, लेखक सिद्धार्थ रॉय, अभिनेत्री मेहेर वालिया, आरजे दिव्या, गायक श्रेया जैन आणि को-क्रिएटोचे विवर्ट व साकेत यांनी यशस्वी जीवनाचे सार सांगितले.केतकी मेहता म्हणाल्या, युवकांमध्ये प्रतिभा आहे. एका सहायकाला सोबतीला घेऊन आर्मी आॅफिसरवर फिल्म तयार केली. या फिल्मला एकाच दिवसात २ लाख दर्शक मिळाले. कोणत्याही कामात भाषा अडथळा होऊ शकत नाही. समीर बेंद्रे म्हणाले, युवकांसमोर अनेक आव्हाने आहेत. रेल्वेच्या एक लाख जागेसाठी एका आॅस्ट्रेलियाच्या लोकसंख्याएवढे अर्ज येतात. युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी वसिम अक्रम आणि इम्रानखान यांची उदाहरणे दिली. यशात नेतृत्वगुण महत्त्वाचा आहे.डॉ. जेरिल बानाईत यांनी वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी केलेल्या संघर्षाची माहिती दिली. लोकांचा जंगलात वावर वाढल्यामुळे वाघांचे हल्ले वाढले आहेत. वन विभागाचा वाघिणीला मारण्याचा आदेश आणि वाघिण वाचविण्यासाठी एकट्याने केलेल्या न्यायालयीन संघर्षाची माहिती दिली. १९ वर्षीय लेखक सिद्धार्थ रॉय याने लेखक बनण्याचा प्रवास कथन केला. आई सुपरवूमन असल्याचे तो म्हणाला. अकरावीत असताना ५०० शब्दांची कथा लिहिली. वडिलांनी पुढाकार घेऊन ‘शॉर्ट स्टोरी’चे पुस्तक बारावीत असताना प्रकाशित केले. त्यानंतर लोक मला ओळखू लागले. जीवनात आनंद मिळेल तेच काम करा, असा संदेश त्यांनी युवकांना दिला. बॅटमिंटनमध्ये रौप्य पदक मिळविल्याचे त्याने सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूर