शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

महाविद्यालयात प्रवेश हवाय, मतदार आहात का ?

By admin | Updated: March 22, 2017 02:50 IST

विद्यार्थ्यांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी

नागपूर विद्यापीठ : पुढील सत्रापासून प्रवेश अर्जात राहणार अट नागपूर : विद्यार्थ्यांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी मतदार यादीतील नोंदणीचा तपशील तयार ठेवा ! वाचून आश्चर्य वाटले असेल मात्र पुढील शैक्षणिक सत्रापासून मतदार यादीत नाव नोंदविले आहे की नाही, याची माहिती देणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासंदर्भात राज्य शासनाने आदेश दिले असून नागपूर विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना त्या आशयाच्या सूचना दिल्या आहेत. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. मात्र अनेकदा वयाची १८ वर्षे पूर्ण होऊनदेखील विद्यार्थी मतदार यादीत नोंदणी करत नसल्याचे चित्र दिसून येते. लोकशाहीच्या बळकटीसाठी जास्तीत जास्त प्रमाणात मतदारांनी मतदान करणे आवश्यक आहे. मात्र मतदार यादीतच नोंदणी न केल्याने अनेक जण मतदानापासून वंचित राहतात. हीच बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने महाविद्यालयीन तरुणांवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. तरुण मतदारांची अधिकाधिक नाव नोंदणी व्हावी यासाठी राज्य शासन व राज्य निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेतच. याचाच एक भाग म्हणून राज्यातील सर्व विद्यापीठ व महाविद्यालयांत उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जांत ‘आपण मतदार यादीत नाव नोंदविले आहे का ’ या प्रकारचा अतिरिक्त रकाना राहणार आहे. यासंबंधात पावले उचलण्यासंदर्भात राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने महाविद्यालयांना, विद्यापीठांना कळविले. या अनुषंगाने नागपूर विद्यापीठातर्फे सर्व संलग्नित महाविद्यालयांचे अध्यक्ष, सचिव व प्राचार्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून होणाऱ्या प्रवेशप्रक्रियेदरम्यान प्रवेशअर्जांत संबंधित रकान्याचा समावेश करावा व विद्यार्थ्यांकडून मतदार यादीत नाव नोंदविले की नाही याचा तपशील घ्यावा, असे निर्देश विद्यापीठाने दिले आहेत. (प्रतिनिधी) मतदार नोंदणी अनिवार्य करावी का ? पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणारे बहुतांश विद्यार्थी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेले असतात. त्यामुळे मतदार यादीत नाव असणं बंधनकारक करावं का याविषयीचा सल्लाही राज्य शासनाने विद्यापीठांकडून मागविला आहे. तरुण मतदारांची संख्या वाढावी यासाठी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या अभियानांतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.