शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
5
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
6
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
7
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
8
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
9
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
10
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
11
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
12
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
13
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
14
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
15
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
16
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
17
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
18
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
19
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
20
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयात प्रवेश हवाय, मतदार आहात का ?

By admin | Updated: March 22, 2017 02:50 IST

विद्यार्थ्यांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी

नागपूर विद्यापीठ : पुढील सत्रापासून प्रवेश अर्जात राहणार अट नागपूर : विद्यार्थ्यांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी मतदार यादीतील नोंदणीचा तपशील तयार ठेवा ! वाचून आश्चर्य वाटले असेल मात्र पुढील शैक्षणिक सत्रापासून मतदार यादीत नाव नोंदविले आहे की नाही, याची माहिती देणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासंदर्भात राज्य शासनाने आदेश दिले असून नागपूर विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना त्या आशयाच्या सूचना दिल्या आहेत. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. मात्र अनेकदा वयाची १८ वर्षे पूर्ण होऊनदेखील विद्यार्थी मतदार यादीत नोंदणी करत नसल्याचे चित्र दिसून येते. लोकशाहीच्या बळकटीसाठी जास्तीत जास्त प्रमाणात मतदारांनी मतदान करणे आवश्यक आहे. मात्र मतदार यादीतच नोंदणी न केल्याने अनेक जण मतदानापासून वंचित राहतात. हीच बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने महाविद्यालयीन तरुणांवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. तरुण मतदारांची अधिकाधिक नाव नोंदणी व्हावी यासाठी राज्य शासन व राज्य निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेतच. याचाच एक भाग म्हणून राज्यातील सर्व विद्यापीठ व महाविद्यालयांत उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जांत ‘आपण मतदार यादीत नाव नोंदविले आहे का ’ या प्रकारचा अतिरिक्त रकाना राहणार आहे. यासंबंधात पावले उचलण्यासंदर्भात राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने महाविद्यालयांना, विद्यापीठांना कळविले. या अनुषंगाने नागपूर विद्यापीठातर्फे सर्व संलग्नित महाविद्यालयांचे अध्यक्ष, सचिव व प्राचार्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून होणाऱ्या प्रवेशप्रक्रियेदरम्यान प्रवेशअर्जांत संबंधित रकान्याचा समावेश करावा व विद्यार्थ्यांकडून मतदार यादीत नाव नोंदविले की नाही याचा तपशील घ्यावा, असे निर्देश विद्यापीठाने दिले आहेत. (प्रतिनिधी) मतदार नोंदणी अनिवार्य करावी का ? पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणारे बहुतांश विद्यार्थी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेले असतात. त्यामुळे मतदार यादीत नाव असणं बंधनकारक करावं का याविषयीचा सल्लाही राज्य शासनाने विद्यापीठांकडून मागविला आहे. तरुण मतदारांची संख्या वाढावी यासाठी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या अभियानांतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.