शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

५४ कोटींच्या इमारतीच्या भिंती झाल्या लाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:11 IST

नागपूर : गरीबच नाही तर सामान्यांसाठी आधार ठरलेल्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेयो) रुग्णांच्या सोयीसाठी ५४ ...

नागपूर : गरीबच नाही तर सामान्यांसाठी आधार ठरलेल्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेयो) रुग्णांच्या सोयीसाठी ५४ कोटी रुपये खर्चून २५० खाटांचे सर्जिकल कॉम्प्लेक्स उभारले. परंतु रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसह कर्मचाऱ्यांनी खर्रा, गुटख्याच्या पिचकऱ्यांनी भिंती लाल केल्या आहेत. जागोजागी थुंकणाऱ्यावर कारवाई कधी, असा प्रश्न येथील डॉक्टर, परिचारिकांनी उपस्थित केला आहे.

मेयोच्या पायाभूत गैरसोयींवर तत्कालीन ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ (एमसीआय) दरवर्षी त्रुटी काढून कोंडी करीत असल्याने अखेर शासनाने २०१७ मध्ये २५० खाटांची अद्यायावत इमारत उभी केली. चार मजलीच्या या इमारतीला ‘सर्जिकल कॉम्प्लेक्स’ असे नाव दिले. या कॉम्प्लेक्समधून जनरल सर्जरी विभागासह, अस्थिव्यंगोपचार विभाग, कान, नाक, व घसा विभाग (ईएनटी) व नेत्र रोग विभागाच्या कामकाजाला सुरुवात झाली. सुरुवातीला या देखण्या इमारतीची चर्चाही झाली. परंतु वर्षभरातच ही इमारत घाणीच्या विळख्यात सापडली. याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच मुख्य प्रवेद्वारावर सुरक्षा रक्षकांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या खिशातील खर्रा, गुटखा जप्त करणे सुरू केले. यामुळे घाण पसरविणाऱ्यांवर मर्यादा आली होती. मार्च २०२० पासून कोरोनाला सुरुवात होताच हे कॉम्प्लेक्स ‘डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल’मध्ये रुपांतरित झाले. यामुळे हॉस्पिटलमधील नातेवाईकांची गर्दी कमी झाली. परंतु आता मागील तीन महिन्यापासून पुन्हा ‘नॉन कोविड’च्या रुग्णांना कॉम्प्लेक्समध्ये भरती केले जाऊ लागल्याने पुन्हा रुग्णालाच्य भिंती, कोपरे खर्रा व गुटख्याच्या पिचकाऱ्याने रंगू लागले आहेत.

-चौथ्या मजल्यावरून खाली मारतात पिचकारी

काही रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि कर्मचारीसुद्धा चौथ्या मजल्यावरून खर्रा, गुटखा खाऊन भिंतीवर पिचकारी मारतात. यामुळे खालपर्यंत या भिंती लाल झाल्या आहेत. तर काही नातेवाईक उघड्यावर तर काही वॉर्डातील खिडकीतून बाहेर कचरा टाकत असल्याने जागोजागी घाण पसरत आहे.

-सुरक्षा रक्षकांनी घ्यावी जबाबदारी

मेयोच्या सुरक्षेची जबाबदारी जवळपास ७० सुरक्षा रक्षकांवर आहे. आपल्या तीन पाळीत ते सेवा देतात. यांनी पिचकाऱ्या मारणाऱ्यांवर कारवाई करणे सुरू केल्यास, रुग्णालयाच्या आत खर्रा, पान, गुटखा घेऊन जाणाऱ्यांवर प्रतिबंध आणल्यास घाणीसोबतच आजार पसरणार नाही, असे मत काही डॉक्टरांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.