शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

घराची भिंत काेसळली, महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:11 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क मनसर : माेडकळीस आलेल्या मातीच्या घराची भिंत काेसळल्याने त्याच्या ढिगाऱ्याखाली दबून महिलेचा मृत्यू झाला तर तिचा ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

मनसर : माेडकळीस आलेल्या मातीच्या घराची भिंत काेसळल्याने त्याच्या ढिगाऱ्याखाली दबून महिलेचा मृत्यू झाला तर तिचा पती, नातू व नात असे तिघे जखमी झाले. ही घटना मनसर (ता. रामटेक) येथे रविवारी (दि. ११) रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.

ललिता गणेश चिंचूलकर (४८) असे मृत महिलेचे नाव असून, जखमींमध्ये पती गणेश चिंचूलकर (५२), नात अंकिता व नातू अंशित या तिघांचा समावेश आहे. त्यांचे घर नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील मनसर येथील डाेंगरावर आहे. त्या घराचे बांधकाम विटामातीचे असून, बांधकाम जुने असल्याने ते माेडकळीस आले आहे. अंकिता व अंशित ही ललिता यांच्या मुलीचे मुले असून, दाेघेही काही दिवसापासून ललिता यांच्याकडेच राहतात. चाैघेही रविवार रात्री जेवण केल्यानंतर झाेपी गेले.

सर्व जण झाेपेत असतानाच घराची भिंत आतल्या भागाला काेसळली. त्यामुळे ललिता भिंतीच्या ढिगाऱ्याखाली पूर्णपणे तर इतर तिघे अंशत: दबले गेले. गणेश यांनी नातवांना बाहेर काढले. त्यांना ललिताला काढणे शक्य न झाल्याने त्यांनी शेजाऱ्यांना मदतीसाठी बाेलावले. शेजाऱ्यांनी तिन्ही जखमींना लगेच मनसर येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात उपचारसाठी नेले. तिथे उपचार केल्यानंतर त्यांना सुटीही देण्यात आली.

शेजाऱ्यांनी ढिगारा बाजूला करीत ललिता यांना बाहेर काढले. ताेपर्यंत त्यांचा जखमा व गुदमरून मृत्यू झाला हाेता. खंडविकास अधिकारी प्रदीप बमनाेटे यांनी साेमवारी (दि. १२) सकाळी तिघांनाही पुन्हा प्राथमिक आराेग्य केंद्रात नेले हाेते. शिवाय, त्यांच्या उपस्थितीत तसेच तलाठ्याच्या गैरहजेरीत काेतवालाने घटनेचा पंचनामा केला. विशेष म्हणजे, या घटनेची पाेलीस दप्तरी नाेंद नाही.

....

स्थानिक लाेकप्रतिनिधीवर राेष

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक जिल्हा परिषद व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी रविवारी रात्री घटनास्थळ गाठले. मात्र, त्या दाेघांनाही नागरिकांच्या राेषाला सामाेरे जावे लागल्याने लगेच माघारी वळावे लागले. मागील वर्षी ललिता चिंचूलकर यांच्या घराजवळील एका घराची भिंत काेसळली हाेती. सुदैवाने त्यात कुणालाही दुखापत झाली नव्हती. मात्र, त्यावेळी या दाेन्ही नेत्यांनी नुकसानग्रस्ताला नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले हाेते. नुकसान भरपाईचा एक रुपयाही न मिळाल्याने स्थानिक नागरिकांनी दाेघांवर राेष व्यक्त केला हाेता.