शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

घराची भिंत काेसळली, महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:11 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क मनसर : माेडकळीस आलेल्या मातीच्या घराची भिंत काेसळल्याने त्याच्या ढिगाऱ्याखाली दबून महिलेचा मृत्यू झाला तर तिचा ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

मनसर : माेडकळीस आलेल्या मातीच्या घराची भिंत काेसळल्याने त्याच्या ढिगाऱ्याखाली दबून महिलेचा मृत्यू झाला तर तिचा पती, नातू व नात असे तिघे जखमी झाले. ही घटना मनसर (ता. रामटेक) येथे रविवारी (दि. ११) रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.

ललिता गणेश चिंचूलकर (४८) असे मृत महिलेचे नाव असून, जखमींमध्ये पती गणेश चिंचूलकर (५२), नात अंकिता व नातू अंशित या तिघांचा समावेश आहे. त्यांचे घर नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील मनसर येथील डाेंगरावर आहे. त्या घराचे बांधकाम विटामातीचे असून, बांधकाम जुने असल्याने ते माेडकळीस आले आहे. अंकिता व अंशित ही ललिता यांच्या मुलीचे मुले असून, दाेघेही काही दिवसापासून ललिता यांच्याकडेच राहतात. चाैघेही रविवार रात्री जेवण केल्यानंतर झाेपी गेले.

सर्व जण झाेपेत असतानाच घराची भिंत आतल्या भागाला काेसळली. त्यामुळे ललिता भिंतीच्या ढिगाऱ्याखाली पूर्णपणे तर इतर तिघे अंशत: दबले गेले. गणेश यांनी नातवांना बाहेर काढले. त्यांना ललिताला काढणे शक्य न झाल्याने त्यांनी शेजाऱ्यांना मदतीसाठी बाेलावले. शेजाऱ्यांनी तिन्ही जखमींना लगेच मनसर येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात उपचारसाठी नेले. तिथे उपचार केल्यानंतर त्यांना सुटीही देण्यात आली.

शेजाऱ्यांनी ढिगारा बाजूला करीत ललिता यांना बाहेर काढले. ताेपर्यंत त्यांचा जखमा व गुदमरून मृत्यू झाला हाेता. खंडविकास अधिकारी प्रदीप बमनाेटे यांनी साेमवारी (दि. १२) सकाळी तिघांनाही पुन्हा प्राथमिक आराेग्य केंद्रात नेले हाेते. शिवाय, त्यांच्या उपस्थितीत तसेच तलाठ्याच्या गैरहजेरीत काेतवालाने घटनेचा पंचनामा केला. विशेष म्हणजे, या घटनेची पाेलीस दप्तरी नाेंद नाही.

....

स्थानिक लाेकप्रतिनिधीवर राेष

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक जिल्हा परिषद व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी रविवारी रात्री घटनास्थळ गाठले. मात्र, त्या दाेघांनाही नागरिकांच्या राेषाला सामाेरे जावे लागल्याने लगेच माघारी वळावे लागले. मागील वर्षी ललिता चिंचूलकर यांच्या घराजवळील एका घराची भिंत काेसळली हाेती. सुदैवाने त्यात कुणालाही दुखापत झाली नव्हती. मात्र, त्यावेळी या दाेन्ही नेत्यांनी नुकसानग्रस्ताला नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले हाेते. नुकसान भरपाईचा एक रुपयाही न मिळाल्याने स्थानिक नागरिकांनी दाेघांवर राेष व्यक्त केला हाेता.