शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

२० किलोमीटर फिरलो, एकाच ठिकाणी दिसले पोलीस; पोलीस आयुक्तांची तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 11:23 IST

Nagpur News शहरात २२५ पेक्षा अधिक गस्तीची वाहने उपलब्ध आहेत. ही वाहने कुठेच दिसली नाहीत. भविष्यात असा अनुभव आल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, या शब्दांत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ठाणेदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना तंबी दिली.

ठळक मुद्देबीट मार्शलला नेहमी सावध ठेवणे आवश्यक आहे. झोपडपट्टीची पाहणी, कुख्यात गुन्हेगारांची धरपकड, दारूच्या दुकानांच्या तपासणीत बीट मार्शलचा उपयोग करण्याचे आदेश त्यांनी दिले.

जगदीश जोशी

नागपूर: मी २० किलोमीटर शहरात फिरलो, फक्त एकाच ठिकाणी वाहतूक शाखेची महिला कर्मचारी दिसली, ही खेदाची बाब आहे. शहरात २२५ पेक्षा अधिक गस्तीची वाहने उपलब्ध आहेत. ही वाहने कुठेच दिसली नाहीत. भविष्यात असा अनुभव आल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, या शब्दांत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ठाणेदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना तंबी दिली.

कोरोनाच्या प्रादुर्भावात डेल्टा व्हायरस प्रभावी झाल्यामुळे प्रतिबंध पुन्हा वाढविण्यात आले आहेत. दुपारी ४ नंतर बाजार बंद करण्याचे निर्देश आहेत. या निर्देशाचे सक्तीने पालन करण्यासाठी पोलिसांची महत्त्वाची भूमिका आहे. रविवारी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तत्त्वाच्या भागांचे अचानक निरीक्षण केले. जवळपास २० किलोमीटर परिसरात पोलीस आयुक्तांना पोलीस कर्मचारी दिसले नाहीत. केवळ कामठी मार्गावर ऑटोमोटिव्ह चौकात महिला कर्मचारी दिसली. हे पाहून पोलीस आयुक्तांनी मंगळवारी सायंकाळी ठाणेदार व वरिष्ठ अधिकाऱ्यांना ऑन एअर फटकारले.

त्यांच्या मते २० किलोमीटर परिसरात एकाच ठिकाणी पोलीस कर्मचारी दिसणे चिंताजनक आहे. गस्त, नाकाबंदी, आरोपींचा तपास आणि धरपकड या कामात हलगर्जीपणा व्हायला नको. ४ वाजता दुकाने बंद झाली पाहिजेत. नागरिकांना ये-जा करण्यासाठी एक तासाचा वेळ दिला जाऊ शकतो. सायंकाळी ५ ते सकाळी ७ दरम्यान संचारबंदी राहील. सायंकाळी ५ नंतर विनाकारण फिरताना दिसणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी.

पोलीस आयुक्तांनी ठाणेदारांना हॉटेल, बार, रेस्टॉरंट, आमलेट आणि चायनीजचे ठेले सुरू राहणार नाहीत, याची खबरदारी घेण्याची कडक शब्दांत सूचना केली. या ठिकाणी गर्दी दिसल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा दिला. ते म्हणाले, रस्त्यावर पोलीस दिसले पाहिजे. कोणत्याही घटनास्थळावर पोहोचण्याचा रिस्पॉन्स टाइम कमी झाला पाहिजे. डीसीपी आणि एसीपी यांनी स्वत: नाकाबंदी पॉइंटची निगराणी करून, त्यास प्रभावी करायला पाहिजे. महत्त्वाच्या नाकाबंदी पॉइंटवर अधिकाऱ्यांना तैनात करायला हवे.

त्यांनी वाहतूक शाखेचा समाचार घेताना सांगितले की, वाहतूक शाखेचे ६०० कर्मचारी रस्त्यावर तैनात राहतात. त्यांनी सुरक्षित अंतर, मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. अमितेश कुमार यांनी बिट मार्शलचे लोकेशन तसेच मूव्हमेंटची नियमित देखरेख करण्याचे निर्देश दिले.

 

.........

टॅग्स :Policeपोलिस