शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

नागपुरात आचारसंहिता शिथिल होण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 00:52 IST

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महापालिकेच्या विकास कामांना ब्रेक लागले आहेत. पहिल्या टप्प्यात नागपूरसह विदर्भातील सात जागांसाठी गुरुवारी मतदान झाले. २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. म्हणजेच आचारसंहिता संपण्यासाठी ४० दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यास विकास कामे ठप्पच राहणार आहेत. याचा विचार करता मतदान होताच आचारसंहिता शिथिल होण्याची प्रतीक्षा महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांना लागली आहे.

ठळक मुद्देशहरातील विकास कामांवर मर्यादा : पाणीपुरवठा योजनांनाही फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महापालिकेच्या विकास कामांना ब्रेक लागले आहेत. पहिल्या टप्प्यात नागपूरसह विदर्भातील सात जागांसाठी गुरुवारी मतदान झाले. २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. म्हणजेच आचारसंहिता संपण्यासाठी ४० दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यास विकास कामे ठप्पच राहणार आहेत. याचा विचार करता मतदान होताच आचारसंहिता शिथिल होण्याची प्रतीक्षा महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांना लागली आहे.मतदान संपल्यानंतर आचारसंहिता शिथिल होऊ शकते. यामुळे महापालिकेत तशी चर्चा आहे. मात्र अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबत कोणत्याही स्वरुपाचे पत्र महापालिका प्रशासनाला मिळालेले नाही. यामुळे संभ्रमाचे वातावरण आहे.आचारसंहितेमुळे अमृत योजना, ई-लायब्ररी, रस्ते व निविदा मंजुरी, अनुकंपावरील नियुक्त्या यासह विकास योजनांचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. आचारसंहितेमुळे स्थायी समितीच्या बैठकी बंद आहेत. सर्वसाधारण सभा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. एखादा प्रस्ताव तातडीने मंजूर करावयाचा असला तरी यासाठी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. १० मार्चला निवडणूक आचारसंहिता लागली. लोक सभा निवडणुका सात टप्प्यात होणार आहे. देशातील सर्व भागातील मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर मतमोजणी होईल. त्यानंतर आचार संहिता संपणार असल्याने विकास कामांच्या फाईल मंजुरीचा मार्ग मोकळा होणार आहे.मतदान संपल्यानंतर आचारसंहिता शिथिल करता येते. याबाबतचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. स्थानिक स्तरावरील विकास कामांचा प्रस्ताव मंजूर करणे गरजेचे आहे. याचा राज्यातील वा देशातील अन्य भागातील मतदानावर कोणताही प्रभाव पडणार नसल्यास अशा प्रस्तावाला मंजुरी देता येते.शहरालगतच्या भागात पाणीपुरवठा योजना नाही. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. अमृत योजनेच्या माध्यमातून या भागात नळाचे नेटवर्क टाकले जाणार आहे. मात्र आचारसंहितेमुळे काम प्रलंबित आहे. लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी कर्मचाºयांच्या वारसांना महापालिकेत अनुकंपावर नियुक्ती करण्याबाबतची फाईल तयार करण्यात आली होती. संबंधित वारसांची पोलिसांनी पडताळणीही केली आहे. मात्र आचारसंहितेमुळे फाईलला ब्रेक लागले आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर