शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

नागपुरात आचारसंहिता शिथिल होण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 00:52 IST

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महापालिकेच्या विकास कामांना ब्रेक लागले आहेत. पहिल्या टप्प्यात नागपूरसह विदर्भातील सात जागांसाठी गुरुवारी मतदान झाले. २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. म्हणजेच आचारसंहिता संपण्यासाठी ४० दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यास विकास कामे ठप्पच राहणार आहेत. याचा विचार करता मतदान होताच आचारसंहिता शिथिल होण्याची प्रतीक्षा महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांना लागली आहे.

ठळक मुद्देशहरातील विकास कामांवर मर्यादा : पाणीपुरवठा योजनांनाही फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महापालिकेच्या विकास कामांना ब्रेक लागले आहेत. पहिल्या टप्प्यात नागपूरसह विदर्भातील सात जागांसाठी गुरुवारी मतदान झाले. २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. म्हणजेच आचारसंहिता संपण्यासाठी ४० दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यास विकास कामे ठप्पच राहणार आहेत. याचा विचार करता मतदान होताच आचारसंहिता शिथिल होण्याची प्रतीक्षा महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांना लागली आहे.मतदान संपल्यानंतर आचारसंहिता शिथिल होऊ शकते. यामुळे महापालिकेत तशी चर्चा आहे. मात्र अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबत कोणत्याही स्वरुपाचे पत्र महापालिका प्रशासनाला मिळालेले नाही. यामुळे संभ्रमाचे वातावरण आहे.आचारसंहितेमुळे अमृत योजना, ई-लायब्ररी, रस्ते व निविदा मंजुरी, अनुकंपावरील नियुक्त्या यासह विकास योजनांचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. आचारसंहितेमुळे स्थायी समितीच्या बैठकी बंद आहेत. सर्वसाधारण सभा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. एखादा प्रस्ताव तातडीने मंजूर करावयाचा असला तरी यासाठी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. १० मार्चला निवडणूक आचारसंहिता लागली. लोक सभा निवडणुका सात टप्प्यात होणार आहे. देशातील सर्व भागातील मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर मतमोजणी होईल. त्यानंतर आचार संहिता संपणार असल्याने विकास कामांच्या फाईल मंजुरीचा मार्ग मोकळा होणार आहे.मतदान संपल्यानंतर आचारसंहिता शिथिल करता येते. याबाबतचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. स्थानिक स्तरावरील विकास कामांचा प्रस्ताव मंजूर करणे गरजेचे आहे. याचा राज्यातील वा देशातील अन्य भागातील मतदानावर कोणताही प्रभाव पडणार नसल्यास अशा प्रस्तावाला मंजुरी देता येते.शहरालगतच्या भागात पाणीपुरवठा योजना नाही. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. अमृत योजनेच्या माध्यमातून या भागात नळाचे नेटवर्क टाकले जाणार आहे. मात्र आचारसंहितेमुळे काम प्रलंबित आहे. लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी कर्मचाºयांच्या वारसांना महापालिकेत अनुकंपावर नियुक्ती करण्याबाबतची फाईल तयार करण्यात आली होती. संबंधित वारसांची पोलिसांनी पडताळणीही केली आहे. मात्र आचारसंहितेमुळे फाईलला ब्रेक लागले आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर