शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

नागनदीच्या सांडपाण्याने वैनगंगा प्रदूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 10:52 IST

नागनदीतून वाहणारे सांडपाणी व घाणीमुळे वैनगंगा नदीच्या प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे.

ठळक मुद्देशुद्धीकरणाशिवाय पाणी पिण्यायोग्य नाहीजलवनस्पती, किडे व जीवाणूंचे प्रमाण प्रचंड वाढलेनीरीचे परीक्षण

निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागनदीतून वाहणारे सांडपाणी व घाणीमुळे वैनगंगा नदीच्याप्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. गोसेखुर्द धरणामुळे साठविलेल्या पाण्यात जलवनस्पती व जलकिड्यांच्या प्रमाणात झपाट्याने वाढ झाली आहे. दुसरीकडे प्रदूषणामुळे नदीच्या पाण्यात गढूळपणा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे वैनगंगेचे पाणी शुद्धीकरण केल्याशिवाय पिण्यायोग्य नाही, असे परीक्षण राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थे(नीरी)ने नोंदविले आहे.नीरीच्या वैज्ञानिकांनी जून २०१८ मध्ये गोसेखुर्द धरणाच्या आसपासच्या परिसरातून वैनगंगा नदीच्या पाण्याचे परीक्षण केले होते. त्यानुसार एकीकडे थांबलेल्या पाण्यावर ई-कॉर्निया वनस्पतीचे प्रमाण वाढल्याने पाण्यातील आक्सिजनचे प्रमाण कमी झाले आहे. दुसरीकडे सर्वाधिक परिणाम नागपुरातून नागनदीद्वारे वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे झाल्याची नोंद या रिपोर्टमध्ये नोंदविली आहे. शहराचे सांडपाणी नागनदीद्वारे वाहत पानमारा गावाजवळ कन्हान नदीला मिळते आणि कन्हान नदीद्वारे ते वैनगंगेला मिळते. या प्रदूषित सांडपाण्यामुळे वैनगंगेच्या प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. या प्रदूषणामुळे गढूळपणा (टर्बिडिटी) वाढला आहे तसेच चिल्यासारख्या जल वनस्पती व जलकिड्यांचे प्रमाणही मोठ्याने वाढले आहे. शिवाय प्रदूषित पाण्यात वाढणाºया जिवाणूंचे प्रमाणही धोकादायक प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे शुद्धीकरण के ल्याशिवाय वैनगंगा नदीचे पाणी पिण्यास अजिबात योग्य नाही, असा स्पष्ट रिपोर्ट नीरीने तयार केला आहे. नदीचे पाणी शेतीसाठी वापरले जाऊ शकते, मात्र या पाण्याशी संपर्क आलेल्या व्यक्तीवर त्याचे धोकादायक परिणाम होण्याची शक्यताही या रिपोर्टमध्ये व्यक्त केली आहे. दरम्यान, नदीच्या पाण्यातील पीएच स्तर, आम्लता, अ‍ॅसिडिटीचा स्तर सामान्य आहे. शिवाय कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम आदी रासायनिकांचा स्तरही सामान्य असून मॅगनीज वगळता जड धातूंचे प्रमाणही नगण्य असल्याचा खुलासा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.नदीच्या पाण्याचे वाढलेले प्रदूषण बघता नदीपात्रातील वनस्पती काढणे, पिण्यासाठी वापरण्यापूर्वी पाण्याची ट्रीटमेंट करणे, नाग नदीचे सांडपाणी वैनगंगेच्या पात्रात जाण्यापासून रोखणे किंवा सांडपाण्याची ट्रीटमेंट क रूनच सोडणे आणि नदीच्या पाण्याचे सातत्याने परीक्षण करून पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्यात यावी आदी सूचना नीरीने दिल्या आहेत.

नीरीच्या परीक्षण रिपोर्टमधील खुलासापाण्यात पीएच स्तर, अल्कलिनिटी, हार्डनेस तसेच कॅल्शियम, पोटॅशियम आदी फिजिकोकेमिकल पॅरामीटर्स सामान्य आहे. वैनगंगेच्या पाण्यातील गढूळपणा वरच्या भागाला १० एनटीयू तर तळाशी १७ एनटीयू आहे. ५ एनटीयूचा स्तर सामान्य मानला जातो.जीवाणूयुक्त प्रदूषण प्रचंड वाढले आहे. टोटल कॉलिफार्म्स शुन्य असायला हवे ते ७० ते २८० सीएफयू/१०० मिलि आहे. फिकल कॉलिफार्म्स (मलविषयक जीवाणू) शुनय असायला हवे ते ५० ते ७० सीएफयू-१०० मिलिपर्यंत वाढले आहे.फायटोप्लँकटन्स (जल वनस्पती) चे प्रमाण १०० मिलिलीटरमध्ये २ ते ३ लाखापर्यंत वाढले आहे. झुप्लँकटन्स (जलकिडे) चे प्रमाणही ३५१ ते ७५३३/ मीटरक्युबवर पोहचले आहे.

नीरीने केलेल्या सूचनाआॅर्गनिक प्रदूषण रोखण्यासाठी पाणीसाठा करण्यापूर्वी नदीपात्रातील जल वनस्पती, जलपर्णी काढणे गरजेचे आहे.पिण्यासाठी वापरण्यापूर्वी पाण्याचे योग्य शुद्धीकरण नितांत आवश्यक आहे.शेतीसाठी पाणी वापरता येईल पण काही पिकांची निवड गरजेची आहे. मायक्रोबियल प्रादुर्भावाचा धोका असल्याने सुरक्षित सिंचन प्रॅक्टीस आवश्यक आहे.नागनदीचे सांडपाणी वैनगंगेत सोडणे पूर्णपणे थांबविणे आवश्यक आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करून शुद्धीकरण गरजेचे आहे.गोसेखुर्द धरणपात्रातील पाण्याचे सातत्याने निरीक्षण करण्याची यंत्रणा आखणे आवश्यक आहे.

नीरीतर्फे दोन वर्षापूर्वी वैनगंगेच्या पाण्याचे परीक्षण करण्यात आले होते. त्यानुसार पाणी प्रदूषित होत असल्याचे आढळून आले. सूचनेनुसार महापालिकेने ट्रीटमेंट प्लान्ट स्थापन करून सांडपाण्याचे शुद्धीकरण केले जात आहे, ही सकारात्मक बाब आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होण्याची शक्यता आहे. मात्र गोसेखुर्द पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.- डॉ. पवन लाभशेटवार, वरिष्ठ वैज्ञानिक, नीरी

टॅग्स :riverनदीpollutionप्रदूषण