शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
4
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
5
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
6
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
7
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
8
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
9
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
10
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
11
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
12
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
13
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
14
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
15
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
16
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
17
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
18
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
19
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
20
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

व्योमिका-सोफिया निर्माण होतात, पण कुठे हरवतात?

By शुभांगी काळमेघ | Updated: May 12, 2025 11:45 IST

Nagpur : ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी मोहिमेने आणि त्याच्या प्रेस कॉन्फरन्सने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले कारण विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी या मोहिमेची माहिती दिली आणि भारतीय महिलांची ताकद पुन्हा एकदा जगासमोर आली. पण हा प्रेरणादायी प्रवास प्रत्येक मुलीला सहजगत्या मिळतो का? दुर्दैवाने नाही.

शुभांगी काळमेघ नागपूर : बारावीचा निकाल पुन्हा एकदा सांगून गेला की मुली हुशार आहेत, कर्तृत्ववान आहेत आणि प्रगतीपथावर वेगाने वाटचाल करत आहेत. यंदाही मुलींनी मुलांपेक्षा ७.५७% अधिक निकाल लावला. राज्यभर हजारो मुलींनी मेहनतीचं फळ मिळवून, स्वप्नांना उंच झेप दिली. निकालानंतर मुलींच्या आनंदाचे, विजयाचं प्रतीक असलेल्या दृश्यांनी अनेकांची मनं जिंकली. 

हातात निकालपत्र, चेहऱ्यावर आनंदाचे अश्रू आणि डोळ्यांत चमकणारी स्वप्नं... पण हे चित्र पुढे नेहमीच टिकतं का? याचं उत्तर मनाला चटका लावणारं आहे. कारण दहावी-बारावीपर्यंत यशस्वी ठरणाऱ्या अनेक मुली पुढील शैक्षणिक टप्प्यांवर आणि करिअरच्या वाटेवर मात्र कुठे तरी हरवतात.

आकडेवारी सांगते की भारतात महिलांचं श्रमशक्तीत योगदान केवळ २०-२५% आहे आणि दुर्दैवाने हा आकडा वाढत नाही, मुलींची शैक्षणिक प्रगती बघूनही समाजाची मानसिकता अजूनही "शिकवू या, पण मर्यादेतच" अशीच आहे. अनेक वेळा मुलींना शिकवलं जातं केवळ सुसंस्कारित, 'बायोडेटा योग्य' बनवण्यासाठी. शिक्षणाला प्राधान्य दिलं जातं, पण करिअरच्या बाबतीत मात्र बंधनं वाढतात. "लग्न झालं की बघू", "इतकं शिकून काय करणार?" हे वाक्य अजूनही सामान्य आहेत. समाजाच्या नजरा, आर्थिक मर्यादा, आणि सुरक्षिततेच्या भीतीमुळे मुलींची स्वप्नं टप्प्याटप्प्याने लहान होऊ लागतात. अनेकदा त्या स्वप्नं पाहतात, पण त्यासाठी लढण्याची ताकद त्यांच्या हातून हिरावली जाते. काहींनी नोकरी केली तरी त्यात टिकून राहणं हे अजून एक मोठं आव्हान असतं. हे दुभंगलेलं वास्तव फार काही बोलून जातं. आजही अनेक मुलींना शिक्षणाच्या पलीकडे जाण्यासाठी सतत संघर्ष करावा लागतो, हेच वास्तव अस्वस्थ करतं. मात्र हे चित्र बदलण्याची नितांत गरज आहे. घरातून, समाजातून, आणि शासनाकडून पाठबळ मिळालं तर हे वास्तव बदलू शकतं. मुलींना केवळ शिकण्याचीच नाही, तर आपल्या स्वप्नांसाठी लढण्याचीही मोकळीक दिली पाहिजे. सुरक्षितता, संधी आणि समानतेचा आधार दिला, तर आजची 'बारावीतील टॉपर' उद्याची 'व्योमिका सिंग' किंवा 'सोफिया कुरैशी' बनू शकते.

टॅग्स :nagpurनागपूरWomenमहिला