शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपानं तिकीट नाकारलं, RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल; अखेरच्या क्षणी शिवसेनेशी संपर्क
2
"मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
3
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
4
UPI ट्रान्झॅक्शन फेल झालं? घाबरू नका, त्वरित फॉलो करा 'या' स्टेप्स
5
"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले
6
नासिरशी निकाहाचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा गायब झाली सरबजीत कौर; वकिलाने केलं मोठं वक्तव्य! म्हणाला-
7
सौदी अरेबियातील बस अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख, माहिती गोळा करण्याचे दिले निर्देश
8
Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार
9
"डॉक्टर RDX बांधून स्वतःला उडवून देत आहेत"; मुफ्तींचा केंद्रावर हल्ला,'तुमच्या धोरणांनी दिल्लीही असुरक्षित'
10
Ganpatipule: गणपतीपुळे येथे देवदर्शनाला गेलेले भिवंडीतील ३ जण समुद्रात बुडाले; एकाचा मृत्यू!
11
इस्त्रीत लपवले कोट्यवधी रुपयांचे सोने; हैदराबाद विमानतळावरील घटना, दोघे अटकेत
12
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
13
गळ्यात नेकलेस घातला अन् पैठणीची लुंगी नेसला! 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याचा लूक पाहून चाहत्यांनी डोक्यावर मारला हात
14
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
15
Leopards Alert: बिबट्यापासून सतर्क करेल एआय कॅमेरा; दिसताच वाजेल सायरन!
16
Rohini Acharya : "कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट
17
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
18
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
19
५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय?
20
Protest: आधी ‘शेल्टर’ची व्यवस्था करा, नंतरच श्वानांना हात लावा; प्राणीमित्र संघटना रस्त्यावर!
Daily Top 2Weekly Top 5

व्योमिका-सोफिया निर्माण होतात, पण कुठे हरवतात?

By शुभांगी काळमेघ | Updated: May 12, 2025 11:45 IST

Nagpur : ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी मोहिमेने आणि त्याच्या प्रेस कॉन्फरन्सने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले कारण विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी या मोहिमेची माहिती दिली आणि भारतीय महिलांची ताकद पुन्हा एकदा जगासमोर आली. पण हा प्रेरणादायी प्रवास प्रत्येक मुलीला सहजगत्या मिळतो का? दुर्दैवाने नाही.

शुभांगी काळमेघ नागपूर : बारावीचा निकाल पुन्हा एकदा सांगून गेला की मुली हुशार आहेत, कर्तृत्ववान आहेत आणि प्रगतीपथावर वेगाने वाटचाल करत आहेत. यंदाही मुलींनी मुलांपेक्षा ७.५७% अधिक निकाल लावला. राज्यभर हजारो मुलींनी मेहनतीचं फळ मिळवून, स्वप्नांना उंच झेप दिली. निकालानंतर मुलींच्या आनंदाचे, विजयाचं प्रतीक असलेल्या दृश्यांनी अनेकांची मनं जिंकली. 

हातात निकालपत्र, चेहऱ्यावर आनंदाचे अश्रू आणि डोळ्यांत चमकणारी स्वप्नं... पण हे चित्र पुढे नेहमीच टिकतं का? याचं उत्तर मनाला चटका लावणारं आहे. कारण दहावी-बारावीपर्यंत यशस्वी ठरणाऱ्या अनेक मुली पुढील शैक्षणिक टप्प्यांवर आणि करिअरच्या वाटेवर मात्र कुठे तरी हरवतात.

आकडेवारी सांगते की भारतात महिलांचं श्रमशक्तीत योगदान केवळ २०-२५% आहे आणि दुर्दैवाने हा आकडा वाढत नाही, मुलींची शैक्षणिक प्रगती बघूनही समाजाची मानसिकता अजूनही "शिकवू या, पण मर्यादेतच" अशीच आहे. अनेक वेळा मुलींना शिकवलं जातं केवळ सुसंस्कारित, 'बायोडेटा योग्य' बनवण्यासाठी. शिक्षणाला प्राधान्य दिलं जातं, पण करिअरच्या बाबतीत मात्र बंधनं वाढतात. "लग्न झालं की बघू", "इतकं शिकून काय करणार?" हे वाक्य अजूनही सामान्य आहेत. समाजाच्या नजरा, आर्थिक मर्यादा, आणि सुरक्षिततेच्या भीतीमुळे मुलींची स्वप्नं टप्प्याटप्प्याने लहान होऊ लागतात. अनेकदा त्या स्वप्नं पाहतात, पण त्यासाठी लढण्याची ताकद त्यांच्या हातून हिरावली जाते. काहींनी नोकरी केली तरी त्यात टिकून राहणं हे अजून एक मोठं आव्हान असतं. हे दुभंगलेलं वास्तव फार काही बोलून जातं. आजही अनेक मुलींना शिक्षणाच्या पलीकडे जाण्यासाठी सतत संघर्ष करावा लागतो, हेच वास्तव अस्वस्थ करतं. मात्र हे चित्र बदलण्याची नितांत गरज आहे. घरातून, समाजातून, आणि शासनाकडून पाठबळ मिळालं तर हे वास्तव बदलू शकतं. मुलींना केवळ शिकण्याचीच नाही, तर आपल्या स्वप्नांसाठी लढण्याचीही मोकळीक दिली पाहिजे. सुरक्षितता, संधी आणि समानतेचा आधार दिला, तर आजची 'बारावीतील टॉपर' उद्याची 'व्योमिका सिंग' किंवा 'सोफिया कुरैशी' बनू शकते.

टॅग्स :nagpurनागपूरWomenमहिला