शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

व्हीएनआयटीचा ‘टॉप’ विद्यापीठात समावेश व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:13 IST

व्हीएनआयटीने आज देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविला आहे. संस्थेच्या प्रगतीवर विश्वास आहे.

ठळक मुद्देविश्राम जामदार यांचे प्रतिपादन : व्हीएनआयटीचा दीक्षांत समारंभ थाटात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्हीएनआयटीने आज देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविला आहे. संस्थेच्या प्रगतीवर विश्वास आहे. परंतु अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. व्हीएनआयटीने जगातील १०० प्रमुख विद्यापीठात स्थान मिळविणे हे आमचे ध्येय असून त्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नालॉजीचे चेअरमन विश्राम जामदार यांनी केले.शुक्रवारी विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थेच्या (व्हीएनआयटी) १५ व्या दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. संचालक डॉ. नरेंद्र चौधरी, सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता उपस्थित होते. विश्राम जामदार म्हणाले, भारत सरकारने देशातील २० जागतिक दर्जाचे विद्यापीठ साकारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. व्हीएनआयटीला या संधीचा फायदा घेण्याची गरज आहे. त्यासाठी विद्यार्थ्यानी संशोधनावर भर देण्याची गरज आहे. व्हीएनआयटीला टॉप रँंकिंगमध्ये आणण्याची जबाबदारी सर्वांची आहे. ते आव्हान म्हणून स्वीकारण्याची गरज आहे. प्राध्यापकांप्रमाणेच विद्यार्थ्यांनीही आपली जबाबदारी ओळखावी. उत्तर अमेरिकेच्या दौºयावर असताना तीन विद्यापीठांना भेट दिली. त्यात व्हीएनआयटीने इलनाईस इन्स्टिट्यूूट आॅफ टेक्नॉलॉजी या संस्थेशी शैक्षणिक करार केला असून दोन विद्यापीठांसोबत बोलणी सुरू आहे. समारंभात संचालक डॉ. नरेंद्र चौधरी यांनी संस्थेच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. समारंभात एकूण ११२९ विद्यार्थ्यांना पदवीने सन्मानित करण्यात आले.सुयश निलावारला डॉ. विश्वेश्वरय्या पदकदीक्षांत समारंभात संस्थेच्या सर्व विभागांमधून सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाºया बी. टेक मेकॅनिकल अभ्यासक्रमातील सुयश निलावार याला ९.८४ सीजीपीए मिळाल्याबद्दल डॉ. विश्वेश्वरय्या पदकाने सन्मानित करण्यात आले तर बी. टेक. सिव्हील अभ्यासक्रमातील अर्चना व्ही. हिला ९.२९ सीजीपीए मिळविल्याबद्दल सर्वाधिक पदकांनी सन्मानित करण्यात आले.डॉ. कस्तुरीरंगन यांचा संदेशइस्रोचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. कस्तुरीरंगन यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या संदेशाचे यावेळी वाचन करण्यात आले. आपल्या संदेशात त्यांनी विद्यार्थ्यांना संशोधक होण्याचे आवाहन केले. जगाच्या इतर देशाच्या तुलनेत भारतात संशोधनाची गती अतिशय कमी आहे. भारतात चांगले इंजिनिअर घडत आहेत. परंतु त्यांच्यात संशोधकांची कमतरता आहे. शिक्षणासोबत संशोधक तयार होतील, अशी शिक्षण पद्धती तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले.