शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

व्हीएनआयटीचा ‘टॉप’ विद्यापीठात समावेश व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:13 IST

व्हीएनआयटीने आज देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविला आहे. संस्थेच्या प्रगतीवर विश्वास आहे.

ठळक मुद्देविश्राम जामदार यांचे प्रतिपादन : व्हीएनआयटीचा दीक्षांत समारंभ थाटात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्हीएनआयटीने आज देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविला आहे. संस्थेच्या प्रगतीवर विश्वास आहे. परंतु अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. व्हीएनआयटीने जगातील १०० प्रमुख विद्यापीठात स्थान मिळविणे हे आमचे ध्येय असून त्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नालॉजीचे चेअरमन विश्राम जामदार यांनी केले.शुक्रवारी विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थेच्या (व्हीएनआयटी) १५ व्या दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. संचालक डॉ. नरेंद्र चौधरी, सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता उपस्थित होते. विश्राम जामदार म्हणाले, भारत सरकारने देशातील २० जागतिक दर्जाचे विद्यापीठ साकारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. व्हीएनआयटीला या संधीचा फायदा घेण्याची गरज आहे. त्यासाठी विद्यार्थ्यानी संशोधनावर भर देण्याची गरज आहे. व्हीएनआयटीला टॉप रँंकिंगमध्ये आणण्याची जबाबदारी सर्वांची आहे. ते आव्हान म्हणून स्वीकारण्याची गरज आहे. प्राध्यापकांप्रमाणेच विद्यार्थ्यांनीही आपली जबाबदारी ओळखावी. उत्तर अमेरिकेच्या दौºयावर असताना तीन विद्यापीठांना भेट दिली. त्यात व्हीएनआयटीने इलनाईस इन्स्टिट्यूूट आॅफ टेक्नॉलॉजी या संस्थेशी शैक्षणिक करार केला असून दोन विद्यापीठांसोबत बोलणी सुरू आहे. समारंभात संचालक डॉ. नरेंद्र चौधरी यांनी संस्थेच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. समारंभात एकूण ११२९ विद्यार्थ्यांना पदवीने सन्मानित करण्यात आले.सुयश निलावारला डॉ. विश्वेश्वरय्या पदकदीक्षांत समारंभात संस्थेच्या सर्व विभागांमधून सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाºया बी. टेक मेकॅनिकल अभ्यासक्रमातील सुयश निलावार याला ९.८४ सीजीपीए मिळाल्याबद्दल डॉ. विश्वेश्वरय्या पदकाने सन्मानित करण्यात आले तर बी. टेक. सिव्हील अभ्यासक्रमातील अर्चना व्ही. हिला ९.२९ सीजीपीए मिळविल्याबद्दल सर्वाधिक पदकांनी सन्मानित करण्यात आले.डॉ. कस्तुरीरंगन यांचा संदेशइस्रोचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. कस्तुरीरंगन यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या संदेशाचे यावेळी वाचन करण्यात आले. आपल्या संदेशात त्यांनी विद्यार्थ्यांना संशोधक होण्याचे आवाहन केले. जगाच्या इतर देशाच्या तुलनेत भारतात संशोधनाची गती अतिशय कमी आहे. भारतात चांगले इंजिनिअर घडत आहेत. परंतु त्यांच्यात संशोधकांची कमतरता आहे. शिक्षणासोबत संशोधक तयार होतील, अशी शिक्षण पद्धती तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले.