शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

रामभाऊंच्या ‘विमलाश्रम’ला हवाय समाजाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 10:06 IST

कुठलेही शासकीय अनुदान न घेता रामभाऊंनी उभे केलेले ‘विमलाश्रम’ या मुलांचे आधारवड झाले आहे. मात्र, हे सर्व करताना, या मुलांच्या दैनंदिन तसेच शालेय व वैद्यकीय गरजा पूर्ण करताना रामभाऊंवर कर्जाचा डोंगर चढला आहे.

ठळक मुद्देदानशूरांनी द्यावा मदतीचा हात वंचितांच्या वेदनेशी जोडलेय माणुसकीचे नाते २२ वर्षांपासून सुरू आहे सेवाकार्य

निशांत वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वंचितांचे दु:ख, वेदना आपल्या मानून त्यांना माया लावणारी काही थोडी माणसे असतात. ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले...’, तुकोबांनी दिलेली सत्पुरुषाची ही अचूक ओळख. ही ओळख सार्थ ठरविणारे एक नाव म्हणजे रामभाऊ इंगोले. रामभाऊंनी समाजाकडून तिरस्कार, अवहेलनेशिवाय काहीच न मिळालेल्या वस्तीतील मुलांना त्यांनी पदरात घेतले. नुसतीच माया दिली नाही तर त्यांना समाजाचा जबाबदार आणि संवेदनशील नागरिक बनविण्यासाठी परिश्रम घेतले. कुठलेही शासकीय अनुदान न घेता रामभाऊंनी उभे केलेले ‘विमलाश्रम’ या मुलांचे आधारवड झाले आहे. मात्र, हे सर्व करताना, या मुलांच्या दैनंदिन तसेच शालेय व वैद्यकीय गरजा पूर्ण करताना रामभाऊंवर कर्जाचा डोंगर चढला आहे. सेवेचा हा वसा जपण्यासाठी त्यांना समाजातील संवेदनशील दानदात्यांकडून मदतीची गरज आहे.रामभाऊंच्या या कार्याची सुरुवातही नाटकीयच म्हणावी लागेल. सामाजिक कार्यकर्ता म्हणून आंदोलनासाठी त्या वस्तीत गेलेल्या रामभाऊंना येथील मुलांच्या वेदनादायी दिशाहिन बालपणाची जाणीव झाली आणि आपण या मुलांसाठी कार्य करावे हा निर्णय त्याचक्षणी घेतला. सुरुवातीला या मुलांना त्यांनी अमरावती, नाशिकच्या बालगृहात टाकले. पण या मुलांना तेथेही अवहेलना सहन करावी लागली. शेवटी चार मुलांना घेऊन ते घरी आले. अर्थातच यात त्यांना टोकाचा विरोधही पत्करावा लागला. पहिला विरोध तर घरातूनच सुरू झाला व त्यांना घरही सोडावे लागले. समाजाने त्यांना वाळीत टाकले, ते वेगळेच. पण हा टोकाचा विरोध सोसताना रामभाऊ डगमगले नाहीत की घेतलेला समाजसेवेचा वसा सोडला नाही. कारण समाजाच्या विरोधापेक्षा बहिष्कृत मुलांसाठी त्यांच्या मनात असलेली संवेदना अधिक बळकट होती. यामध्ये काही संवेदनशील मित्रांचे सहकार्य त्यांना मिळाले, ही बाब त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी कारक ठरली. घरातून बाहेर पडल्यानंतर भाड्याच्या घरात त्यांनी कार्य सुरू केले आणि अनेक मित्र, दानदाते यांच्या सहकार्यातून ‘विमलाश्रम’ उभे झाले. हा प्रवास अनेक हालअपेष्टा, संघर्ष आणि असंख्य कटु अनुभवांनी भरलेला आहे, हे येथे वेगळे सांगायला नको. त्यांचे हे कार्य गेल्या २० ते २२ वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. या काळात त्यांच्या विमलाश्रमात वाढलेल्या नऊ मुलींचे थाटात लग्न केले. आठ मुलांनी लहानमोठे व्यवसाय थाटले तर येथून शिकून गेलेली २० ते २२ मुले वेगवेगळ््या ठिकाणी नोकरी करीत आहेत. विमलाश्रमात आताही ३ मुले व २५ मुली असे २८ मुलामुलींचे वास्तव्य असून त्यातील काही पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण घेत आहेत. या मुलांच्या निव्वळ राहण्या व शिक्षणाचीच व्यवस्था रामभाऊ यांनी केली नाही तर संवेदनशीलता निर्माण व्हावी म्हणून वेगवेगळ््या उपक्रमाच्या माध्यमातून समाजाशी जोडून घेतले. कधी गरीब वस्त्यातील मुलांना कपडे वाटप, मंदिरासमोर बसलेल्या उपाशी माणसांना अन्न वाटप तर कामगारांच्या मुलांना शिकविण्याचे काम या मुलांच्या माध्यमातून त्यांनी केले. याच उपक्रमातून विमलाश्रमाच्या कार्याचा विस्तार झाला. उमरेड रोडवरील पाचगावमध्ये दगडाच्या खाणीत काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी दर रविवारी झाडाखाली शाळा भरविण्याचे काम विमलाश्रमातील मुलांनी चालविले आणि आज या कार्याचे विशाल वटवृक्षात रूपांतर झाले. याच झाडाखाली मोठी शाळा उभी झाली असून आजच्या घडीला १३३ मुलांच्या राहण्याची व शिक्षणाची व्यवस्था येथे निर्माण झाली आहे. अशाप्रकारे रामभाऊंच्या विमलाश्रमाचे कार्य विस्तारत गेले. मात्र कार्य विस्तारत गेले तसे त्यांच्यासमोरच्या अडचणीही वाढत गेल्या. समाजाच्या कुचंबणेपुढे रामभाऊ कधी झुकले नाहीत. पण सर्व काळ सारखा नसतो. पाच जीवांचे कुटुंब सांभाळताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, तर हे कु टुंब सांभाळणाºया रामभाऊ यांना काय अडचणी येत असतील याचा विचार करा. रामभाऊ यांच्या शब्दात, सहकार्य करणाऱ्यांच्या पाठबळामुळे सुरू असलेले कार्य अधिक व्यापक करण्याचा मोह आवरता आला नाही आणि त्यातून निर्माण होणाºया आर्थिक गरजा वाढत गेल्या. याशिवाय पाचगावच्या शाळेतील शिक्षकांचे, इतर कर्मचाºयांचे तसेच विमलाश्रमातील कर्मचाºयांचे पगार, मुलांना ने-आण करणाºया वाहनांचा खर्चही वाढला आहे. निव्वळ पेट्रोल पंपाचे थकीत बिल ८० हजारावर गेल्याचे त्यांनी सांगितले. विमलाश्रमात राहत असले तरी या मुलांच्या भावनिक गरजांकडे रामभाऊ यांनी कधी दुर्लक्ष केले नाही. यातील काही मुले मोठ्या शाळेत शिक्षण घेत आहेत. इतर मुलांप्रमाणे त्यांना आवश्यक सोईसुविधांची त्यांनी सतत काळजी घेतली. मुलांची ट्यूशन, संगीत, नृत्याचे क्लासेस, मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी जे-जे आवश्यक आहे, ते पूर्ण करण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. विमलाश्रमातील मुले कुठल्याही बाबतीत वंचित राहू नये, ही त्यामागची भावना. पाचगावच्या निवासी शाळेत निवास आणि शिक्षण एकाच इमारतीत आहे. त्यामुळे या मुलांच्या निवासासाठी स्वतंत्र वसतिगृह व्हावे, असा त्यांचा मानस आहे. यासोबत या मुलांना कौटुंबिक वातावरण मिळावे म्हणून या परिसरात ज्येष्ठ नागरिकांचे निवासकेंद्र उभे राहावे, हेही स्वप्न आहे. विमलाश्रमाच्या काही खोल्या अर्धवट बांधकाम झाल्या आहेत, त्या पूर्ण व्हाव्या, अशी अपेक्षा त्यांना आहे. रामभाऊ यांनी वैयक्तिक कुणाकडूनही काही मागितले नाही तरी हे सेवाकार्य दानदात्यांच्या भरवशावर उभे आहे व भविष्यातही चालावे, अशी त्यांची भावना आहे. त्यामुळे समाजाने त्यांच्या कार्याविषयी संवेदना जागवणे गरजेचे आहे. वंचितांच्या वेदनांशी जुळलेले हे कार्य असेच अहोरात्र सुरू ठेवण्यासाठी दानदात्यांकडून मदतीची अपेक्षा आहे.

अशी करता येईल मदतपत्ता : विमलाश्रम, ५९, उदयनगर एनआयटी गार्डन समोर, नागपूर. मोबाईल क्रमांक : ८६६९३२९६६२धनादेश किंवा मदत जमा करण्यासाठी बँकेचे खातेआम्रपाली उत्कर्ष संघ,बँक ऑफ महाराष्ट्र, अयोध्यानगर शाखाशारदा चौक, अयोध्यानगर.खाते क्रमांक : २००८९०२२७९४आयएफएससी कोड : एमएएच बी ००००९४७

टॅग्स :Socialसामाजिक