शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

ग्रामस्थांनी धरली शेताची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:08 IST

कैलास निघाेट लाेकमत न्यूज नेटवर्क देवलापार : ग्रामीण भागात काेराेना संक्रमण आणि मृत्यूदर झपाट्याने वाढत आहे. काही काेराेना प्रतिबंधक ...

कैलास निघाेट

लाेकमत न्यूज नेटवर्क

देवलापार : ग्रामीण भागात काेराेना संक्रमण आणि मृत्यूदर झपाट्याने वाढत आहे. काही काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे पालन करीत आहेत तर काही आजही बेजबाबदारपणेच वागत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी काहींनी सर्व जीवनावश्यक वस्तू व कुटुंबीयांना साेबत घेऊन शेताची वाट धरली. त्यांनी शेतात तंबू व झाेपडी तयार करून संसार थाटला आहे. काहींनी संसार थाटण्यासाठी चक्क ट्रॅक्टर व त्याच्या ट्राॅलीचा वापर केला आहे. याला सध्या सुरुवात झाली असून, आगामी काही दिवसात याचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने विविध उपाययाेजना केल्या. मात्र, काही नागरिक वारंवार आवाहन व सूचना करूनही त्या उपाययाेजनांचे पालन करीत नाही. याचा फटका साटक (ता. पारशिवनी) गावाला बसला. गावात काेराेनाचे संक्रमण आणि मृत्यूदर वाढत असल्याने भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले. त्यातच राजू भुते व गुणवंत ढबाले, दाेघेही रा. साटक या शेतकऱ्यांनी स्वत:सह कुटुंबीयांना काेराेनापासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्या साटक शिवारातील शेतात राहण्याचा निर्णय घेत शेताची वाट धरली. काेराेना संक्रमणामुळे साटक गावात असलेली पूर्वीची वर्दळ फार कमी झाली आहे.

हा संपूर्ण भाग आदिवासीबहुल असून, या भागातील बहुतांश नागरिकांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. यात राजू भुते व गुणवंत ढबाले यांचाही समावेश आहे. सध्या काेराेना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आराेग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. शहरातील हाॅस्पिटलमध्ये खाटा मिळत नाहीत. राजकीय नेते काही करायला तयार नाहीत. अशा परिस्थितीत काेराेनाची लागण झाली तर उपचारासाठी पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न निर्माण झाल्याने शेतात राहायला येण्याचा निर्णय घेतल्याचे या दाेन्ही शेतकऱ्यांनी सांगितले. असाच निर्णय इतर नागरिक घेत असल्याने गाव हळूहळू ओस पडायला सुरुवात झाली आहे.

राजू भुते त्यांच्या वृद्ध आई व इतर कुटुंबीयांसाेबत तर गुणवंत ढबाले त्यांची पत्नी, अदिती व आकांक्षा या दाेन मुलींसाेबत काही दिवसांपासून त्यांच्या शेतातच वास्तव्य करीत आहेत. दुसरीकडे, गावातील काही नागरिक आजही भामट्यासारखे गावभर विनाकारण फिरताना, कुठेही थुंकताना, गर्दी करताना दिसत आहेत. त्यांना वारंवार सूचना देऊनही ते साधा मास्क वापरण्याची तसदी घेत नाहीत.

...

ढगाळ वातावरणामुळे तारांबळ

या भागातील काही शिवाराची प्रत्यक्ष पाहणी केली असता, किमान चार ते पाच कुटुंबे शेतात झाेपडी किंवा तंबू तयार करून वास्तव्य करीत असल्याचे आढळून येते. या झाेपडी व तंबूंमध्ये विजेची काेणतीही सुविधा नाही. त्यामुळे काही कुटुंबे अख्खी रात्र अंधारात काढत आहेत. या भागात काही दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले असून, अधूनमधून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी काेसळत आहेत. वादळामुळे तंबूचे कापड उडून जात आहेत तर पावसामुळे धान्य व इतर साहित्य भिजत आहे. परंतु, गावाच्या तुलनेत शेतात सुरक्षित वाटत असल्याची प्रतिक्रिया राजू भुते, गुणवंत ढबाले यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.

...

विलगीकरणाची समस्या

काेराेनामुळे शहरात राेजगारासाठी गेलेली मंडळी गावात परत आली आहे. त्यातच घराघरात काेराेनाचे रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णांना गृह विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला जाताे. मात्र, अनेकांची घरे जुन्या पद्धतीची असल्याने त्यांच्या घरात स्वतंत्र खाेल्या नसल्याने विलगीकरणात राहायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमाेर उपस्थित हाेताे. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन गावातील समाजभवन अथवा शाळेच्या इमारतीत विलगीकरण कक्ष तयार करीत नाही. त्यामुळे काही रुग्ण इच्छा नसतानाही त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात येत आहेत. यातून काेराेनाचे संक्रमणही वाढत आहे.