शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

पाणीदार गावासाठी सरसावले ग्रामस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 22:32 IST

नरखेड तालुक्यातील ६६ गावांत पाणी फाऊंडेशनच्या ‘वॉटर कप’ स्पर्धेचे वारे जोरदार वाहू लागले आहे. गत आठवडाभरापूर्वी पाणीदार गाव करण्याच्या उपक्रमाला सुरुवात झाली. त्याअंतर्गत अख्खेच्या अख्खे गाव जोमाने कामाला लागले आहे. खैरगावही त्यात मागे नाही. या गावात वयोवृद्धांपासून तर बालकांपर्यंत जमेल ते काम करण्यासाठी सज्ज झाले आहे. त्यामुळेच गाव पाणीदार होण्याचे शुभसंकेत मिळत आहे. या उपक्रमासाठी ग्रामस्थांनी आपापल्या परीने निधीही उभारला. त्यात तेथील शाळेचाही मोठा हातभार लागला, हे विशेष!

ठळक मुद्देसामूहिक श्रमदान अन् आर्थिक हातभारखैरगावमध्ये वयोवृद्धांपासून बच्चेकंपनीही उतरली मैदानात

गणेश खवसे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नरखेड तालुक्यातील ६६ गावांत पाणी फाऊंडेशनच्या ‘वॉटर कप’ स्पर्धेचे वारे जोरदार वाहू लागले आहे. गत आठवडाभरापूर्वी पाणीदार गाव करण्याच्या उपक्रमाला सुरुवात झाली. त्याअंतर्गत अख्खेच्या अख्खे गाव जोमाने कामाला लागले आहे. खैरगावही त्यात मागे नाही. या गावात वयोवृद्धांपासून तर बालकांपर्यंत जमेल ते काम करण्यासाठी सज्ज झाले आहे. त्यामुळेच गाव पाणीदार होण्याचे शुभसंकेत मिळत आहे. या उपक्रमासाठी ग्रामस्थांनी आपापल्या परीने निधीही उभारला. त्यात तेथील शाळेचाही मोठा हातभार लागला, हे विशेष!अभिनेता आमिर खानच्या ‘पाणी फाऊंडेशन’तर्फे ‘ड्राय झोन’ गावात ‘वॉटर कप’ स्पर्धा घेण्यात येत आहे. याअंतर्गत गावाची तहान गावातच भागली जावी, यावरच भर देण्यात येत आहे. त्यामुळे तहानलेल्या गावात पानवठे - बंधारे, बांध तयार करणे, पाण्याचे स्रोत शोधून त्या पाण्याचे योग्य नियोजन करणे आणि विशेष म्हणजे ही सर्व कामे लोकसहभागातून करणे हा प्रमुख उद्देश या ‘वॉटर कप’चा आहे.नरखेड तालुक्यातील तब्ब्ल ६६ गावे या स्पर्धेत समाविष्ट करण्यात आली आहे. संबंधित गावात जोरदार तयारी करण्यात येत आहे. गावातील प्रत्येक नागरिक आपापल्या परीने जे काम करता येईल, त्यासाठी स्वत:हून पुढे येत आहे. एवढेच काय तर त्यात वयोवृद्ध आणि बच्चेकंपनीही मागे नाही. अख्खे गाव सामूहिक श्रमदान करून बांध-बंधारे बांधण्याच्या कामात व्यस्त आहे. याच तालुक्यातील खैरगावात अशाप्रकारचे चित्र असून ग्रामस्थांनी दाखविलेल्या एकजुटतेबद्दत स्तुतिसुमने उधळली जात आहे.सामूहिक श्रमदानासोबतच खैरगाव येथील कामासाठी लागणारा पैसा उभारण्यासाठीही ग्रामस्थांनीच पुढाकार घेतला. त्यातून पै-पै करून बऱ्यापैकी निधी जमा झाला. त्यात जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पंकज देवते, प्रकाश गणोरकर, भूषण बेलसरे, सुधाकर काळे, कृष्णाराव खरळकर, गणेश चौधरी, विलास कोरडे, अजय बारमासे, चेतन खुरळकर, रामराव बेलसरे, रवींद्र सोरते, किसना सावरकर, किशोर अलोने, दिलीप अकर्ते यांच्यासह इतर ग्रामस्थांचा आर्थिक हातभार लागला.पुरस्कारापेक्षा गावात पाणी महत्त्वाचे!‘वॉटर कप’ स्पर्धेअंतर्गत नरखेड तालुक्यातील गावा-गावांत जणू चढाओढच सुरू झाल्याचे चित्र नजरेस पडते. या उपक्रमात पहिल्या दिवशी उमठा येथे तब्बल ८० दगडी बांध ग्रामस्थांनी सामूहिक श्रमदानातून तयार करण्याचा पराक्रम केला. इतर गावातही कमी-अधिक प्रमाणात ग्रामस्थांचे अशाप्रकारचे प्रयत्न सुरू आहे. गावा-गावांत अशाप्रकारे ही स्पर्धा सुरू झालेली असली तरी, गावाला पुरस्कार मिळाला नाही तरी गावाची तहान गावातच भागणार ही बाब महत्त्वाची असल्याची प्रतिक्रिया आता ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.

टॅग्स :Waterपाणीnagpurनागपूर