शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
2
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
3
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
4
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
5
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
6
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
7
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
8
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
9
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
10
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
11
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
12
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
13
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
14
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
15
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
16
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
17
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
18
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
19
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
20
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले

पाणीदार गावासाठी सरसावले ग्रामस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 22:32 IST

नरखेड तालुक्यातील ६६ गावांत पाणी फाऊंडेशनच्या ‘वॉटर कप’ स्पर्धेचे वारे जोरदार वाहू लागले आहे. गत आठवडाभरापूर्वी पाणीदार गाव करण्याच्या उपक्रमाला सुरुवात झाली. त्याअंतर्गत अख्खेच्या अख्खे गाव जोमाने कामाला लागले आहे. खैरगावही त्यात मागे नाही. या गावात वयोवृद्धांपासून तर बालकांपर्यंत जमेल ते काम करण्यासाठी सज्ज झाले आहे. त्यामुळेच गाव पाणीदार होण्याचे शुभसंकेत मिळत आहे. या उपक्रमासाठी ग्रामस्थांनी आपापल्या परीने निधीही उभारला. त्यात तेथील शाळेचाही मोठा हातभार लागला, हे विशेष!

ठळक मुद्देसामूहिक श्रमदान अन् आर्थिक हातभारखैरगावमध्ये वयोवृद्धांपासून बच्चेकंपनीही उतरली मैदानात

गणेश खवसे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नरखेड तालुक्यातील ६६ गावांत पाणी फाऊंडेशनच्या ‘वॉटर कप’ स्पर्धेचे वारे जोरदार वाहू लागले आहे. गत आठवडाभरापूर्वी पाणीदार गाव करण्याच्या उपक्रमाला सुरुवात झाली. त्याअंतर्गत अख्खेच्या अख्खे गाव जोमाने कामाला लागले आहे. खैरगावही त्यात मागे नाही. या गावात वयोवृद्धांपासून तर बालकांपर्यंत जमेल ते काम करण्यासाठी सज्ज झाले आहे. त्यामुळेच गाव पाणीदार होण्याचे शुभसंकेत मिळत आहे. या उपक्रमासाठी ग्रामस्थांनी आपापल्या परीने निधीही उभारला. त्यात तेथील शाळेचाही मोठा हातभार लागला, हे विशेष!अभिनेता आमिर खानच्या ‘पाणी फाऊंडेशन’तर्फे ‘ड्राय झोन’ गावात ‘वॉटर कप’ स्पर्धा घेण्यात येत आहे. याअंतर्गत गावाची तहान गावातच भागली जावी, यावरच भर देण्यात येत आहे. त्यामुळे तहानलेल्या गावात पानवठे - बंधारे, बांध तयार करणे, पाण्याचे स्रोत शोधून त्या पाण्याचे योग्य नियोजन करणे आणि विशेष म्हणजे ही सर्व कामे लोकसहभागातून करणे हा प्रमुख उद्देश या ‘वॉटर कप’चा आहे.नरखेड तालुक्यातील तब्ब्ल ६६ गावे या स्पर्धेत समाविष्ट करण्यात आली आहे. संबंधित गावात जोरदार तयारी करण्यात येत आहे. गावातील प्रत्येक नागरिक आपापल्या परीने जे काम करता येईल, त्यासाठी स्वत:हून पुढे येत आहे. एवढेच काय तर त्यात वयोवृद्ध आणि बच्चेकंपनीही मागे नाही. अख्खे गाव सामूहिक श्रमदान करून बांध-बंधारे बांधण्याच्या कामात व्यस्त आहे. याच तालुक्यातील खैरगावात अशाप्रकारचे चित्र असून ग्रामस्थांनी दाखविलेल्या एकजुटतेबद्दत स्तुतिसुमने उधळली जात आहे.सामूहिक श्रमदानासोबतच खैरगाव येथील कामासाठी लागणारा पैसा उभारण्यासाठीही ग्रामस्थांनीच पुढाकार घेतला. त्यातून पै-पै करून बऱ्यापैकी निधी जमा झाला. त्यात जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पंकज देवते, प्रकाश गणोरकर, भूषण बेलसरे, सुधाकर काळे, कृष्णाराव खरळकर, गणेश चौधरी, विलास कोरडे, अजय बारमासे, चेतन खुरळकर, रामराव बेलसरे, रवींद्र सोरते, किसना सावरकर, किशोर अलोने, दिलीप अकर्ते यांच्यासह इतर ग्रामस्थांचा आर्थिक हातभार लागला.पुरस्कारापेक्षा गावात पाणी महत्त्वाचे!‘वॉटर कप’ स्पर्धेअंतर्गत नरखेड तालुक्यातील गावा-गावांत जणू चढाओढच सुरू झाल्याचे चित्र नजरेस पडते. या उपक्रमात पहिल्या दिवशी उमठा येथे तब्बल ८० दगडी बांध ग्रामस्थांनी सामूहिक श्रमदानातून तयार करण्याचा पराक्रम केला. इतर गावातही कमी-अधिक प्रमाणात ग्रामस्थांचे अशाप्रकारचे प्रयत्न सुरू आहे. गावा-गावांत अशाप्रकारे ही स्पर्धा सुरू झालेली असली तरी, गावाला पुरस्कार मिळाला नाही तरी गावाची तहान गावातच भागणार ही बाब महत्त्वाची असल्याची प्रतिक्रिया आता ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.

टॅग्स :Waterपाणीnagpurनागपूर