शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

एक गाव सरपंच नसलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 16:07 IST

नागपूर तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायतला प्रशासनाच्या चुकीमुळे सरपंच मिळाला नाही. त्यामुळे गावचा कारभार सांभाळणार कोण? असा पेच या गावात निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देप्रशासनासह निवडून आलेल्या उमेदवारांपुढे पेचउपसरपंचालाच द्यावे अधिकार

आॅनलाईन लोकमतनागपूर : पंचायतराज व्यवस्थेने गावस्तरावर ग्रामपंचायतीला सर्व अधिकार दिले आहेत. सरपंचाकडे संपूर्ण गावाच्या विकासाची जबाबदारी दिली आहे. यावर्षी पहिल्यांदा शासनाने सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला. नागपूर जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच निवडून आले. परंतु नागपूर तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायतला प्रशासनाच्या चुकीमुळे सरपंच मिळाला नाही. त्यामुळे गावचा कारभार सांभाळणार कोण? असा पेच या गावात निर्माण झाला आहे.खंडाळा ग्रामपंचायत सरपंचपद हे अनुसूचित जमातीसाठी आरक्षित ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे, या गावात अनुसूचित जमातीचे केवळ आठ ते नऊ मतदार आहेत. तेही स्थायी नाही. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सरपंच अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाल्याने, येथे सरपंचपदासाठी उमेदवारच मिळाला नाही. १७ आॅक्टोबरला निकाल लागले तेव्हा जनहित पॅनलचे पाच व शेतकरी पॅनलचे दोन उमेदवार ग्रामपंचायतवर सदस्य म्हणून निवडून आले. सरपंचच नसल्याने ग्रामपंचायत चालणार कशी, असा प्रश्न या उमेदवारापुढे पडला आहे.विशेष म्हणजे, गेल्या १९ वर्षांपासून या ग्रामपंचायतमध्ये अनुसूचित जमातीचे आरक्षण आहे. याचे कारण म्हणजे या गावातील शेतकरी, मालगुजार पूर्वी मध्य प्रदेशातून शेतीच्या कामासाठी मजूर आणायचे. यामध्ये मोठ्या संख्येने मजूर हे मध्य प्रदेशातील आदिवासी भागातील असायचे. २०११ च्या जनगणनेमध्ये १११ अनुसूचित जमातीची लोकसंख्या गावात नोंदविल्या गेली. पर्यायाने मतदार यादीमध्ये सुद्धा त्यांचे नाव आले. मात्र हे लोक शेतीची कामे केल्यानंतर आपल्या गावी परतले. आजही गावात अनुसूचित जातीचे मजूर आहेत. त्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. प्रशासनाने २०११ च्या जनगणनेच्या आधारावर येथे अनुसूचित जमातीचे आरक्षण दिले. यापूर्वीच्या दोन टर्ममध्ये सदस्यासाठी आरक्षण होते. या ग्रामपंचायतमधील सदस्यसंख्या सात आहे. मात्र गेल्या दोन्ही टर्म अनुसूचित जमातीचा उमेदवार न मिळाल्यामुळे सदस्यांचे पद रिक्तच राहिले. यावर्षी रोस्टर बदलल्याने अनुसूचित जमातीचे आरक्षण सरपंचासाठी आले आणि सदस्यांसारखीच गत सरपंचाची झाली. या गावात सरपंचासाठी अनुसूचित जमातीचा उमेदवारच मिळाला नाही. प्रशासनानेही त्याची दखल घेतली नाही. आता निवडणुका आटोपल्यावर ग्रामपंचायतचा कारभार सांभाळणार कोण, असा पेच प्रशासनापुढे पडला आहे.उपसरपंचालाच द्यावे अधिकारप्रशासनाला आता सरपंचाची निवडणूक घेण्यासाठी रोस्टर बदलवावे लागेल. पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतील. त्यामुळे आता निवडून आलेल्या सदस्यांपैकी ज्या पॅनलचे सदस्य जास्त त्या पॅनलचा उमेदवार उपसरपंच निवडावा आणि त्याला सरपंचाचे अधिकार द्यावेत.- मुकेश भोयर,सदस्य, ग्रा.पं. खंडाळा