शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

एक गाव सरपंच नसलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 16:07 IST

नागपूर तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायतला प्रशासनाच्या चुकीमुळे सरपंच मिळाला नाही. त्यामुळे गावचा कारभार सांभाळणार कोण? असा पेच या गावात निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देप्रशासनासह निवडून आलेल्या उमेदवारांपुढे पेचउपसरपंचालाच द्यावे अधिकार

आॅनलाईन लोकमतनागपूर : पंचायतराज व्यवस्थेने गावस्तरावर ग्रामपंचायतीला सर्व अधिकार दिले आहेत. सरपंचाकडे संपूर्ण गावाच्या विकासाची जबाबदारी दिली आहे. यावर्षी पहिल्यांदा शासनाने सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला. नागपूर जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच निवडून आले. परंतु नागपूर तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायतला प्रशासनाच्या चुकीमुळे सरपंच मिळाला नाही. त्यामुळे गावचा कारभार सांभाळणार कोण? असा पेच या गावात निर्माण झाला आहे.खंडाळा ग्रामपंचायत सरपंचपद हे अनुसूचित जमातीसाठी आरक्षित ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे, या गावात अनुसूचित जमातीचे केवळ आठ ते नऊ मतदार आहेत. तेही स्थायी नाही. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सरपंच अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाल्याने, येथे सरपंचपदासाठी उमेदवारच मिळाला नाही. १७ आॅक्टोबरला निकाल लागले तेव्हा जनहित पॅनलचे पाच व शेतकरी पॅनलचे दोन उमेदवार ग्रामपंचायतवर सदस्य म्हणून निवडून आले. सरपंचच नसल्याने ग्रामपंचायत चालणार कशी, असा प्रश्न या उमेदवारापुढे पडला आहे.विशेष म्हणजे, गेल्या १९ वर्षांपासून या ग्रामपंचायतमध्ये अनुसूचित जमातीचे आरक्षण आहे. याचे कारण म्हणजे या गावातील शेतकरी, मालगुजार पूर्वी मध्य प्रदेशातून शेतीच्या कामासाठी मजूर आणायचे. यामध्ये मोठ्या संख्येने मजूर हे मध्य प्रदेशातील आदिवासी भागातील असायचे. २०११ च्या जनगणनेमध्ये १११ अनुसूचित जमातीची लोकसंख्या गावात नोंदविल्या गेली. पर्यायाने मतदार यादीमध्ये सुद्धा त्यांचे नाव आले. मात्र हे लोक शेतीची कामे केल्यानंतर आपल्या गावी परतले. आजही गावात अनुसूचित जातीचे मजूर आहेत. त्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. प्रशासनाने २०११ च्या जनगणनेच्या आधारावर येथे अनुसूचित जमातीचे आरक्षण दिले. यापूर्वीच्या दोन टर्ममध्ये सदस्यासाठी आरक्षण होते. या ग्रामपंचायतमधील सदस्यसंख्या सात आहे. मात्र गेल्या दोन्ही टर्म अनुसूचित जमातीचा उमेदवार न मिळाल्यामुळे सदस्यांचे पद रिक्तच राहिले. यावर्षी रोस्टर बदलल्याने अनुसूचित जमातीचे आरक्षण सरपंचासाठी आले आणि सदस्यांसारखीच गत सरपंचाची झाली. या गावात सरपंचासाठी अनुसूचित जमातीचा उमेदवारच मिळाला नाही. प्रशासनानेही त्याची दखल घेतली नाही. आता निवडणुका आटोपल्यावर ग्रामपंचायतचा कारभार सांभाळणार कोण, असा पेच प्रशासनापुढे पडला आहे.उपसरपंचालाच द्यावे अधिकारप्रशासनाला आता सरपंचाची निवडणूक घेण्यासाठी रोस्टर बदलवावे लागेल. पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतील. त्यामुळे आता निवडून आलेल्या सदस्यांपैकी ज्या पॅनलचे सदस्य जास्त त्या पॅनलचा उमेदवार उपसरपंच निवडावा आणि त्याला सरपंचाचे अधिकार द्यावेत.- मुकेश भोयर,सदस्य, ग्रा.पं. खंडाळा