शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

खेडी व शहरांचा सुवर्णमध्य साधा

By admin | Updated: December 14, 2015 03:10 IST

भारतात होणारे शहरीकरण थांबवून खेडी स्वयंपूर्ण बनविणे तसेच खेडी व शहरांचा सुवर्णमध्य साधून आणि ग्रामीण तंत्रज्ञानाचा उपयोग करून ...

अनिल काकोडकर यांचे प्रतिपादन : ‘कृषी क्षेत्रात रेडिएशनचे महत्त्व’ विषयावर कार्यशाळानागपूर : भारतात होणारे शहरीकरण थांबवून खेडी स्वयंपूर्ण बनविणे तसेच खेडी व शहरांचा सुवर्णमध्य साधून आणि ग्रामीण तंत्रज्ञानाचा उपयोग करून कृषी क्षेत्रात आर्थिक क्रांती घडविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी येथे केले. ‘अ‍ॅग्रो व्हिजन’ या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात ‘कृषी क्षेत्रात रेडिएशनचे महत्त्व’ या विषयावर रविवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, अ‍ॅग्रो व्हिजन सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी आणि वेदचे अध्यक्ष देवेंद्र पारेख उपस्थित होते. रेडिएशन तंत्रज्ञानामुळे शेतकी मालाचे आयुष्य वाढतेरेडिएशन तंत्रज्ञानामुळे शेतकी मालाचे आयुष्य वाढते. बऱ्याचवेळी उत्पादनांच्या किमतीत जाणीवपूर्वक कमी केल्या जातात. पण या तंत्रज्ञानाने मालाला अनेक दिवसांपर्यंत साठवून ठेवता येते आणि मालाला जास्त किंमत मिळाल्यास ते विकता येते. रेडिएशन तंत्रज्ञानाचा उपयोग करून भारतातील आंबे सध्या अमेरिकेत मिळतात. मध्यस्थ टाळून उत्पादक ते ग्राहक अशी साखळी निर्माण होते. ‘बार्क’ने नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे प्रात्यक्षिक प्रकल्प उभारला आहे. प्रकल्पात कांद्यावर रेडिएशन प्रक्रिया करण्यात येते. या प्रकियेत विषाणू आणि अन्य घातक घटकांचा नाश होतो. अशा प्रकारचे १७ रेडिएशन प्रक्रिया प्रकल्प सुरू आहेत. डॉ. गोखने पाटील यांच्या चॉलतर्फे खाद्यान्नांवर अशीच प्रक्रिया करण्यात येते. ही प्रक्रिया गुणवत्तापूर्ण नियमानुसार केली जाते. हे पुढील तंत्रज्ञान असल्याचे काकोडकर यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना बँकांच्या मदतीने कोल्ड स्टोरेज उभारण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांच्या शेतकी मालाला चांगला भाव मिळू शकतो.‘बार्क’ची भूमिका महत्त्वपूर्णकाकोडकर म्हणाले, खेड्यांमधील जीवन सुधारण्यात भाभा आण्विक संशोधन केंद्राची (बार्क) महत्त्वाची भूमिका बजावित आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. एकीकडे कृषी तंत्रज्ञानाचा विकास तर दुसरीकडे गावांमध्ये तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात येत आहे. ‘बार्क’शी संबंधित आकृती संस्थेतर्फे शेतकऱ्यांना मृदु तपासणीची कीट देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीवर मृदु तपासणी करून त्यातील एनपीके घटक शोधावे, असा यामागील उद्देश आहे. कार्बनमय घटकांचे विश्लेषण तसेच खतांचे व्यवस्थापन याद्वारे होणार आहे. तसेच आकृतीतर्फे शुद्ध पाण्याचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना देत आहे. पंढरपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाने कीटचे डिझाईन केले आहे. शेतकऱ्यांनी जास्त किमतीच्या टिश्यू कल्चर लॅबचा उपयोग करण्याऐवजी फार्म स्तरावर टिश्यू कल्चर प्रणालीचा उपयोग करण्याचा सल्ला काकोडकर यांनी दिला. ‘बार्क’ने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी लहान लॅब तयार केली आहे. वातावरण निर्मितीसाठी आकृतीने महाराष्ट्रातील २० गावांना भेटी दिल्या आहेत. ग्रामीणांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खेड्यांमध्ये मानव संशोधन आणि संशोधन सुविधा तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले. ‘बार्क’ने खेड्यांमध्ये कृषीशी संबंधित उपक्रम राबविण्यासाठी महानेत्र नावाने कार्यक्रम सुरू केला असून गेल्या दोन वर्षांत नऊ हजार गावांना फायदा झाल्याचे डॉ. काकोडकर म्हणाले.