शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

खेडी व शहरांचा सुवर्णमध्य साधा

By admin | Updated: December 14, 2015 03:10 IST

भारतात होणारे शहरीकरण थांबवून खेडी स्वयंपूर्ण बनविणे तसेच खेडी व शहरांचा सुवर्णमध्य साधून आणि ग्रामीण तंत्रज्ञानाचा उपयोग करून ...

अनिल काकोडकर यांचे प्रतिपादन : ‘कृषी क्षेत्रात रेडिएशनचे महत्त्व’ विषयावर कार्यशाळानागपूर : भारतात होणारे शहरीकरण थांबवून खेडी स्वयंपूर्ण बनविणे तसेच खेडी व शहरांचा सुवर्णमध्य साधून आणि ग्रामीण तंत्रज्ञानाचा उपयोग करून कृषी क्षेत्रात आर्थिक क्रांती घडविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी येथे केले. ‘अ‍ॅग्रो व्हिजन’ या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात ‘कृषी क्षेत्रात रेडिएशनचे महत्त्व’ या विषयावर रविवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, अ‍ॅग्रो व्हिजन सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी आणि वेदचे अध्यक्ष देवेंद्र पारेख उपस्थित होते. रेडिएशन तंत्रज्ञानामुळे शेतकी मालाचे आयुष्य वाढतेरेडिएशन तंत्रज्ञानामुळे शेतकी मालाचे आयुष्य वाढते. बऱ्याचवेळी उत्पादनांच्या किमतीत जाणीवपूर्वक कमी केल्या जातात. पण या तंत्रज्ञानाने मालाला अनेक दिवसांपर्यंत साठवून ठेवता येते आणि मालाला जास्त किंमत मिळाल्यास ते विकता येते. रेडिएशन तंत्रज्ञानाचा उपयोग करून भारतातील आंबे सध्या अमेरिकेत मिळतात. मध्यस्थ टाळून उत्पादक ते ग्राहक अशी साखळी निर्माण होते. ‘बार्क’ने नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे प्रात्यक्षिक प्रकल्प उभारला आहे. प्रकल्पात कांद्यावर रेडिएशन प्रक्रिया करण्यात येते. या प्रकियेत विषाणू आणि अन्य घातक घटकांचा नाश होतो. अशा प्रकारचे १७ रेडिएशन प्रक्रिया प्रकल्प सुरू आहेत. डॉ. गोखने पाटील यांच्या चॉलतर्फे खाद्यान्नांवर अशीच प्रक्रिया करण्यात येते. ही प्रक्रिया गुणवत्तापूर्ण नियमानुसार केली जाते. हे पुढील तंत्रज्ञान असल्याचे काकोडकर यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना बँकांच्या मदतीने कोल्ड स्टोरेज उभारण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांच्या शेतकी मालाला चांगला भाव मिळू शकतो.‘बार्क’ची भूमिका महत्त्वपूर्णकाकोडकर म्हणाले, खेड्यांमधील जीवन सुधारण्यात भाभा आण्विक संशोधन केंद्राची (बार्क) महत्त्वाची भूमिका बजावित आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. एकीकडे कृषी तंत्रज्ञानाचा विकास तर दुसरीकडे गावांमध्ये तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात येत आहे. ‘बार्क’शी संबंधित आकृती संस्थेतर्फे शेतकऱ्यांना मृदु तपासणीची कीट देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीवर मृदु तपासणी करून त्यातील एनपीके घटक शोधावे, असा यामागील उद्देश आहे. कार्बनमय घटकांचे विश्लेषण तसेच खतांचे व्यवस्थापन याद्वारे होणार आहे. तसेच आकृतीतर्फे शुद्ध पाण्याचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना देत आहे. पंढरपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाने कीटचे डिझाईन केले आहे. शेतकऱ्यांनी जास्त किमतीच्या टिश्यू कल्चर लॅबचा उपयोग करण्याऐवजी फार्म स्तरावर टिश्यू कल्चर प्रणालीचा उपयोग करण्याचा सल्ला काकोडकर यांनी दिला. ‘बार्क’ने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी लहान लॅब तयार केली आहे. वातावरण निर्मितीसाठी आकृतीने महाराष्ट्रातील २० गावांना भेटी दिल्या आहेत. ग्रामीणांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खेड्यांमध्ये मानव संशोधन आणि संशोधन सुविधा तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले. ‘बार्क’ने खेड्यांमध्ये कृषीशी संबंधित उपक्रम राबविण्यासाठी महानेत्र नावाने कार्यक्रम सुरू केला असून गेल्या दोन वर्षांत नऊ हजार गावांना फायदा झाल्याचे डॉ. काकोडकर म्हणाले.