शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

खेडी व शहरांचा सुवर्णमध्य साधा

By admin | Updated: December 14, 2015 03:10 IST

भारतात होणारे शहरीकरण थांबवून खेडी स्वयंपूर्ण बनविणे तसेच खेडी व शहरांचा सुवर्णमध्य साधून आणि ग्रामीण तंत्रज्ञानाचा उपयोग करून ...

अनिल काकोडकर यांचे प्रतिपादन : ‘कृषी क्षेत्रात रेडिएशनचे महत्त्व’ विषयावर कार्यशाळानागपूर : भारतात होणारे शहरीकरण थांबवून खेडी स्वयंपूर्ण बनविणे तसेच खेडी व शहरांचा सुवर्णमध्य साधून आणि ग्रामीण तंत्रज्ञानाचा उपयोग करून कृषी क्षेत्रात आर्थिक क्रांती घडविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी येथे केले. ‘अ‍ॅग्रो व्हिजन’ या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनात ‘कृषी क्षेत्रात रेडिएशनचे महत्त्व’ या विषयावर रविवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, अ‍ॅग्रो व्हिजन सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी आणि वेदचे अध्यक्ष देवेंद्र पारेख उपस्थित होते. रेडिएशन तंत्रज्ञानामुळे शेतकी मालाचे आयुष्य वाढतेरेडिएशन तंत्रज्ञानामुळे शेतकी मालाचे आयुष्य वाढते. बऱ्याचवेळी उत्पादनांच्या किमतीत जाणीवपूर्वक कमी केल्या जातात. पण या तंत्रज्ञानाने मालाला अनेक दिवसांपर्यंत साठवून ठेवता येते आणि मालाला जास्त किंमत मिळाल्यास ते विकता येते. रेडिएशन तंत्रज्ञानाचा उपयोग करून भारतातील आंबे सध्या अमेरिकेत मिळतात. मध्यस्थ टाळून उत्पादक ते ग्राहक अशी साखळी निर्माण होते. ‘बार्क’ने नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे प्रात्यक्षिक प्रकल्प उभारला आहे. प्रकल्पात कांद्यावर रेडिएशन प्रक्रिया करण्यात येते. या प्रकियेत विषाणू आणि अन्य घातक घटकांचा नाश होतो. अशा प्रकारचे १७ रेडिएशन प्रक्रिया प्रकल्प सुरू आहेत. डॉ. गोखने पाटील यांच्या चॉलतर्फे खाद्यान्नांवर अशीच प्रक्रिया करण्यात येते. ही प्रक्रिया गुणवत्तापूर्ण नियमानुसार केली जाते. हे पुढील तंत्रज्ञान असल्याचे काकोडकर यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना बँकांच्या मदतीने कोल्ड स्टोरेज उभारण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांच्या शेतकी मालाला चांगला भाव मिळू शकतो.‘बार्क’ची भूमिका महत्त्वपूर्णकाकोडकर म्हणाले, खेड्यांमधील जीवन सुधारण्यात भाभा आण्विक संशोधन केंद्राची (बार्क) महत्त्वाची भूमिका बजावित आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. एकीकडे कृषी तंत्रज्ञानाचा विकास तर दुसरीकडे गावांमध्ये तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात येत आहे. ‘बार्क’शी संबंधित आकृती संस्थेतर्फे शेतकऱ्यांना मृदु तपासणीची कीट देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीवर मृदु तपासणी करून त्यातील एनपीके घटक शोधावे, असा यामागील उद्देश आहे. कार्बनमय घटकांचे विश्लेषण तसेच खतांचे व्यवस्थापन याद्वारे होणार आहे. तसेच आकृतीतर्फे शुद्ध पाण्याचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना देत आहे. पंढरपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाने कीटचे डिझाईन केले आहे. शेतकऱ्यांनी जास्त किमतीच्या टिश्यू कल्चर लॅबचा उपयोग करण्याऐवजी फार्म स्तरावर टिश्यू कल्चर प्रणालीचा उपयोग करण्याचा सल्ला काकोडकर यांनी दिला. ‘बार्क’ने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी लहान लॅब तयार केली आहे. वातावरण निर्मितीसाठी आकृतीने महाराष्ट्रातील २० गावांना भेटी दिल्या आहेत. ग्रामीणांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खेड्यांमध्ये मानव संशोधन आणि संशोधन सुविधा तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले. ‘बार्क’ने खेड्यांमध्ये कृषीशी संबंधित उपक्रम राबविण्यासाठी महानेत्र नावाने कार्यक्रम सुरू केला असून गेल्या दोन वर्षांत नऊ हजार गावांना फायदा झाल्याचे डॉ. काकोडकर म्हणाले.