शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
3
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
4
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
5
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
6
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
7
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
8
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
9
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
10
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
11
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
12
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
13
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
14
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
15
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
16
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
17
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
18
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
19
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
20
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर

विमा योजनेसाठी गाव हा घटक असावा : शेतकरी प्रतिनिधींच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 22:48 IST

शेतकऱ्यांना खरच पीक विम्याचा लाभ द्यायचा असेल तर या योजनेंतर्गत गाव हा घटक गृहीत धरण्यात यावा, विमा कंपन्यांची कार्यालये गावपातळीवर उघडण्यात यावीत, अशी विनंतीपर सूचना शेतकऱ्यांच्या बहुतांश प्रतिनिधी व खासदारांनी संसदीय कृषी समितीसमोर केली.

ठळक मुद्देसंसदीय कृषी समितीच्या बैठकीत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विमा योजनेमध्ये शेतकरी पैसे भरतात. परंतु त्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना वेळेवर मदत मिळत नाही. तसेच नुकसानीच्या नियमामुळे सुद्धा अनेक शेतकरी वंचित राहतात. शेतकऱ्यांना खरच पीक विम्याचा लाभ द्यायचा असेल तर या योजनेंतर्गत गाव हा घटक गृहीत धरण्यात यावा, विमा कंपन्यांची कार्यालये गावपातळीवर उघडण्यात यावीत, अशी विनंतीपर सूचना शेतकऱ्यांच्या बहुतांश प्रतिनिधी व खासदारांनी संसदीय कृषी समितीसमोर केली.पंतप्रधान विमा योजनेवर चर्चा करण्यासाठी संसदेची कृषी विषयक स्थायी समिती आजपासून दोन दिवसीय नागपूर दौऱ्यावर आली आहे. खा. पर्वतगौडा गड्डीगौडा हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीमध्ये एकूण ३५ खासदारांचा समावेश आहे. आज या समितीची बैठक वर्धा रोडवरील हॉटेल रेडीसन ब्ल्यूमध्ये झाली. बैठकीत ११ सदस्य उपस्थित होते. यात खा. नवनीत राणा यांचा समावेश होता. यासोबतच शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनाही आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील, ज्येष्ठ नेते विजय जावंधिया, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी आदी उपस्थित होते.या बैठकीत पंतप्रधान विमा योजनेच्या नवीन प्रारुपावर चर्चा झाली. यावेळी अनेक सदस्यांनी विमा योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी काय-काय अडचणी आहेत त्या मांडल्या. परंतु सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शेतकरी विमा भरतात, परंतु याचा त्यांना लाभ होताना दिसून येत नाही. उलट विमा कंपन्याच नफा कमवित असल्याचे चित्र आहे. तेव्हा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ होईल, यासाठी गाव किंवा ग्रामपंचायत हा घटक धरण्यात यावा, अशी मागणी लावून धरली. समितीने सर्वांचे म्हणणे गांभीर्याने ऐेकून घेतले. समिती उद्या शुक्रवारी कृषी संशोधन परिषद, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, मृदु संधारण केंद्र, लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र यांना भेट देऊन पाहणी करणार आहे.विम्याची संपूर्ण जबाबदारी सरकारने घ्यावीविमा योजना चांगली आहे. परंतु अंमलबजावणी होत नाही. तीच मुख्य अडचण आहे. घटनेनुसार शेती हा राज्याचा विषय असला तरी शेतीसंदर्भातील सर्व काही विषय हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे केंद्र आपली जबबदारी टाळू शकत नाही. विम्याची जबाबदारी ही १०० टक्के सरकारने घ्यावी. ५० टक्के केंद्र व ५० टक्के राज्य सरकारने भरावे. तसेच गाव किंवा ग्रामपंचायत हा घटक असावा,अशी सूचना आपण केली आहे.विजय जावंधिया, ज्येष्ठ नेते, शेतकरी संघटनाविमा कंपनीचे कार्यालय प्रत्येक जिल्ह्यात असावेविमा कंपन्या हा दररोज २१.९ कोटी रुपये नफा कमावतात. परंतु शेतकºयांना पीक विम्याचा लाभ हवा तसा मिळत नाही. यात अनेक अडचणी आहेत. सर्वात महत्त्वाचे तर नुकसान झले तर कुणाला भेटावे ही अडचण असते. गावपातळीवर विमा कंपनीचे कार्यालयच नाही. तेव्हा गावपातळीवर कार्यालयाची सुविधा उपलब्ध करावी, अशी सूचना आपण केली.नवनीत राणा,खासदार , समिती सदस्यपंचतारांकित हॉटेलमध्ये बैठकीवरून नाराजीशेतकऱ्यांशी संबंधित संसदीय समितीची बैठक पंचतरांकित हॉटेलमध्ये ठेवण्यावरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली. नागपुरात रविभवन, वनामतीसारख्या अनेक शासकीय जागा असताना पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक का, असा प्रश्नही विचारला जात आहे. काही सदस्यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली. सोबतच बैठक कुठेही झाली तरी शेतकऱ्यांसाठी काहीतरी ठोस निर्णय व्हावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली.विम्याची संपूर्ण जबाबदारी सरकारने घ्यावीविमा योजना चांगली आहे. परंतु अंमलबजावणी होत नाही. तीच मुख्य अडचण आहे. घटनेनुसार शेती हा राज्याचा विषय असला तरी शेतीसंदर्भातील सर्व काही विषय हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे केंद्र आपली जबबदारी टाळू शकत नाही. विम्याची जबाबदारी ही १०० टक्के सरकारने घ्यावी. ५० टक्के केंद्र व ५० टक्के राज्य सरकारने भरावे. तसेच गाव किंवा ग्रामपंचायत हा घटक असावा,अशी सूचना आपण केली आहे.विजय जावंधियाज्येष्ठ नेते, शेतकरी संघटना

 

टॅग्स :Farmerशेतकरी