शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

परिस्थिती बघून विधानसभेची उमेदवारी

By admin | Updated: June 10, 2014 01:06 IST

लोकसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला, परंतु विधानसभा निवडणुकीत असे चित्र नसेल. मतदारसंघातील परिस्थिती बघून विधानसभा उमेदवारीचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष

माणिकराव ठाकरे यांची माहिती : विधानसभेत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी  नागपूर : लोकसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला, परंतु विधानसभा निवडणुकीत असे चित्र नसेल. मतदारसंघातील परिस्थिती बघून विधानसभा  उमेदवारीचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.लोकसभा निवडणुकीत काही चुका झाल्याने पराभवाला सामोरे जावे लागले. चुका सुधारण्यासाठी वेळ आहे. समस्यांवर तातडीने निर्णय घ्यावे  लागतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही हीच भूमिका मांडली आहे. राज्याचा विकास कुणाच्या नेतृत्वात होऊ  शकतो, याची जाण जनतेला  आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस संयुक्तपणे निवडणुका लढवितील असा विश्‍वास ठाकरे यांनी व्यक्त केला.लोकसभा निवडणुकीत राज्यातील पराभवाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष म्हणून मी स्वत: व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वीकारली आहे. देशातील  पराभवाची जबाबदारी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी स्वीकारली आहे. यातून  बाहेर पडण्यासाठी पक्षाने निश्‍चित केलेल्या  धोरणाला प्रदेश काँग्रेसचाही पाठिंबा आहे. लोकसभा निवडणुकीसोबतच क ाही राज्यात विधानसभेच्या पोटनिवडणुका झाल्या. यात  बिहारमधील सहा  जागांपैकी भाजपला एक जागा मिळाली. महाराष्ट्रातील जागेवर काँग्रेसचा विजय झाला. गुजरातमधील सात जागापैकी तीन जागा काँग्रेसला मिळाल्याची  माहिती ठाकरे यांनी दिली.लोकांना २४ तास वीज, ओबीसींना शिष्यवृत्ती, मागासवर्गींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण असे निर्णय  घ्यावे लागेल. तसेच  चांगल्या योजनांचे मार्केटिंग  झाले नाही अशी खंत ठाकरे यांनी व्यक्त केली.  (प्रतिनिधी)