शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील नझूल जमिनींची मालकी मिळणार : ३५ हजारांहून अधिक भूपट्टाधारकांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 22:44 IST

नागपूर व अमरावती विभागातील लिलावाद्वारे अथवा अन्य प्रकारे भाडेतत्त्वावर दिलेल्या नझूल जमिनींची अधिमूल्य (प्रीमियम) भरून मालकी देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे भाडेतत्त्वावर असलेल्या जमिनी आता संबंधितांच्या मालकीच्या होतील. या निर्णयामुळे जमिनीच्या खरेदी-विक्रीचे आणि अन्य व्यवहार भूपट्टाधारकांना अन्य जमीन मालकांप्रमाणेच करता येतील. या निर्णयामुळे विदर्भातील ३५ हजारांहून अधिक भूपट्टाधारकांना लाभ मिळेल व त्यातही नागपूर विभागाला सर्वाधिक फायदा पोहोचणार आहे.

ठळक मुद्देलिजधारकांना मोठा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर व अमरावती विभागातील लिलावाद्वारे अथवा अन्य प्रकारे भाडेतत्त्वावर दिलेल्या नझूल जमिनींची अधिमूल्य (प्रीमियम) भरून मालकी देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे भाडेतत्त्वावर असलेल्या जमिनी आता संबंधितांच्या मालकीच्या होतील. या निर्णयामुळे जमिनीच्या खरेदी-विक्रीचे आणि अन्य व्यवहार भूपट्टाधारकांना अन्य जमीन मालकांप्रमाणेच करता येतील. या निर्णयामुळे विदर्भातील ३५ हजारांहून अधिक भूपट्टाधारकांना लाभ मिळेल व त्यातही नागपूर विभागाला सर्वाधिक फायदा पोहोचणार आहे.निवासी, वाणिज्यिक आणि औद्योगिक प्रयोजनासाठी तत्कालीन मध्य प्रांत आणि बेरार भागात लागू असलेल्या कायद्यानुसार नागपूर व अमरावती या महसुली विभागात मोठ्या प्रमाणात नझूल जमिनी भाडेपट्ट्याने दिल्या होत्या. या जमिनीच्या भाडेपट्ट्यात १ ऑगस्ट २०१४ च्या शासन निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने भाडेकराराच्या नूतनीकरणात उदासीनता दिसून येत होती. त्यामुळे या शासन निर्णयात सुधारणा करण्यासह भुईभाडे दर कमी करून सुधारित धोरण निश्चित करण्यात आले होते, तरीदेखील भाडेपट्ट्यांच्या नूतनीकरणास प्रतिसाद मिळत नव्हता. त्यासोबतच या जमिनीचे मालकी हक्क देण्याची वारंवार मागणी होत होती. त्यामुळे या जमिनी ‘फ्री-होल्ड’ करण्याबाबत शिफारस करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीने जमिनी ‘फ्री-होल्ड’ करण्याची शिफारस केली होती.५ टक्के अधिभार भरावा लागणारनिवासी प्रयोजनासाठी मिळालेल्या नझूल जमिनींच्या मालकीसाठी रेडिरेकनर दरानुसार होणाऱ्या बाजारमूल्याच्या ५ टक्के अधिभार भरावा लागेल. वाणिज्यिक व औद्योगिक प्रयोजनासाठीच्या जमिनींकरिता १० टक्के अधिभार भरावा लागेल. ही योजना ऐच्छिक स्वरूपाची असून सवलतीचा लाभ घ्यायचा नसेल त्या भाडेपट्टाधारकांना जुन्या भाडेपट्टा धोरणानुसार भाडेपट्टा पुढे सुरू ठेवता येणार आहे. ज्या लोकांना नझूलची जागा देण्यात आली आहे, त्यांना दर ३० वर्षांनी परत ‘लिज’ घ्यावी लागत होती. आता ही डोकेदुखी दूर झाली आहे. त्यांना दरवर्षी नझूल विभागाला वार्षिक ‘ग्राऊंड रेंट’देखील द्यावा लागणार नाही. तसेच परिसरात निर्माणकार्य करणे किंवा त्याला विकण्यासाठी नझूल विभागाची परवानगी घेणेदेखील आवश्यक राहणार नाही.नागपुरातील सुमारे ११ हजार संपत्तीधारकांना फायदानझूल संपत्तीला ‘फ्री होल्ड’ करण्याच्या निर्णयाचा सर्वाधिक फायदा नागपूर शहराला झाला आहे. शहरात एकूण १० हजार ९६३ नझूलच्या संपत्ती आहेत, तर विदर्भात हीच संख्या ३५ हजार ३४६ इतकी आहे. नागपुरातील नझूलच्या संपत्ती मुख्यत्वेकरून धंतोली, रामदासपेठ, शिवाजीनगर, सीताबर्डी, धरमपेठ, सिव्हिल लाईन्स, अमरावती रोड, खामला, जरीपटका, सदर, अंबाझरी येथे पसरल्या आहेत. या भागांमध्ये बहुमजली इमारतींची संख्या जास्त असल्यामुळे या घोषणेचा लाभ एक लाखांहून अधिक लोकांना पोहोचेल. अमरावती विभागात १० हजार ५२८ नझूल संपत्ती आहेत. नागपूर नझूल प्लॉट ओनर्स असोसिएशनकडून सातत्याने ही मागणी करण्यात येत होती. या घोषणेमुळे लीजधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.विदर्भालाच फायदा का?या घोषणेमुळे केवळ विदर्भालाच दिलासा का मिळाला, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. १९५६ पर्यंत विदर्भ ‘सीपी अ‍ॅन्ड बेरार’ राज्याचा भाग होता, तर शेष महाराष्ट्र तत्कालीन मुंबई प्रांत किंवा हैदराबादच्या निझामाच्या क्षेत्रात होता. ‘लिज’वर जागा देण्याची (नझूल) प्रणाली केवळ ‘सीपी अ‍ॅन्ड बेरार’मध्येच होती. त्यामुळे सद्यस्थितीत नझूलची जागा विदर्भातच आहे.

 

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागVidarbhaविदर्भ