शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

विदर्भ राज्य आंदोलनाची गुढी उंच उभारू

By admin | Updated: April 9, 2016 03:14 IST

विदर्भाचा विकास करायचा असेल तर आता स्वतंत्र विदर्भ राज्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आंदोलनाची गुढी आता इतकी उंच उभारू ...

‘लढा विदर्भाचा’ : विदर्भ राज्य समन्वय समितीच्या कार्याचा शुभारंभ नागपूर : विदर्भाचा विकास करायचा असेल तर आता स्वतंत्र विदर्भ राज्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आंदोलनाची गुढी आता इतकी उंच उभारू की ती पंतप्रधानांनाही दिसली पाहिजे. आता स्वतंत्र विदर्भ राज्य द्यावेच लागेल, असे त्यांना वाटले पाहिजे, असे आश्वासन विदर्भ राज्य समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी दिले.वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी विदर्भ प्रदेश विकास परिषद, वेद आणि जनमंच या समविचारी सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन ‘लढा विदर्भाचा’ या नावाने विदर्भ राज्य समन्वय समिती स्थापन केली आहे. या समितीच्या कार्याचा शुभारंभ शुक्रवारी सन्मान लॉन बजाजनगर चौक येथे करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ नेते दत्ता मेघे, हरिभाऊ केदार, ज्येष्ठ समाजसेवी उमेश चौबे प्रामुख्याने उपस्थित होते. अ‍ॅड. अनिल किलोर म्हणाले, स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी सर्वांच्याच पाठबळाची गरज आहे. राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांचा या समन्वय समितीला पूर्ण पाठिंबा आहे. वेगळ्या विदर्भासाठी होणारे आंदोलन हे जाळपोळ, तोडफोड व लोकांना नुकसान पोहोचेल, असे होणार नाही तर ते वैधानिक पद्धतीनेच केले जाईल. परंतु विदर्भवाद्यांची सहनशीलता तपासून पाहू नये, असा इशाराही त्यांनी दिला. १ मे पर्यंत सरकार या मुद्यावर कोणती भूमिका घेते हे पाहिले जाईल. त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल, असेही त्यांनी सांगितले. आम्ही कुठलीही निवडणूक लढणार नाही. कुठल्याही राजकीय पक्षाशी जवळीक साधणार नाही. जो पक्ष स्वतंत्र विदर्भ राज्याचे समर्थन करेल, तो पक्ष आमचा अशी भूमिका राहील. या आंदोलनात युवकांना मोठ्या प्रमाणावर जोडले जाईल आणि गावागावात जनजागृती केली जाईल. विदर्भ विदर्भ म्हणजे केवळ नागपूर नव्हे तर पश्चिम भागही येतो. त्यामुळे विदर्भातील सर्व ११ ही जिल्ह्यात जनजागृती केली जाईल. विदर्भ राज्य झाले तर पश्चिम विदर्भाला त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल याचा प्रयत्न केला जाईल, असेही अ‍ॅड. अनिल किलोर म्हणाले. याप्रसंगी हरिभाऊ केदार व उमेश चौबे यांनीही आपले विचार व्यक्त केले. नितीन रोंघे यांनी पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारा विदर्भावर प्रकाश टाकला. (प्रतिनिधी)विदर्भ आंदोलनासाठी आता मार्गदर्शकाचीच भूमिका ज्येष्ठ विदर्भवादी नेते माजी खासदार दत्ता मेघे म्हणाले, स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीत अनेक वर्षांपासून नेतृत्व करीत आलो आहे. परंतु आता कुठलेही नेतृत्व स्वीकारणार नाही, केवळ मार्गदर्शकाचीच भूमिका निभावणार असा निर्णय आपण घेतला आहे. नवीन नेतृत्व पुढे येण्याची आवश्यकता आहे. परंतु हे तितके सोपे नाही. विदर्भाचे आंदोलन हे जनआंदोलन करावे लागले. लोकमानसात जागृती करावी लागेल. विदर्भाबाबत ‘लोकमत’ तयार करावे लागले. यासाठी दोन -चार वर्षांची योजना आखावी लागेल, असेही त्यांनी सांगितले. विदर्भ राज्य समन्वय समितीची कार्यकारिणी याप्रसंगी विदर्भ राज्य समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी समितीच्या पदाधिकारी व सदस्यांची घोषणा केली. अध्यक्ष - अ‍ॅड. अनिल किलोर, उपाध्यक्ष- देवेंद्र पारेख, महमूद अन्सारी, सचिव - राजेंद्र मिश्रा, सहसचिव - राम आखरे, प्रदीप माहेश्वरी, कोषाध्यक्ष- गिरीश गांधी, सदस्य- बाळ कुलकर्णी, विलास काळे, अमिताभ पावडे, विलास कांबळे, मिलिंद राऊत, नवीन मालेवार, अ‍ॅड. उषा पांडे, आशुतोष दाभोळकर, डॉ. अंजली पाटील-गायकवाड, रिना सिन्हा, विनिता माथूर.मार्गदर्शक : दत्ता मेघे, रणजित देशमुख, गेव्ह आवारी, डॉ. नितीन राऊत, मारोतराव कोवासे, अनिल देशमुख, मधुकरराव किंमतकर, तुकाराम बिरकड, सुदर्शन निमकर, संजय खाडके, उमेश चौबे, हरिभाऊ केदार, प्रा. शरद पाटील, निमंत्रित सदस्य : आ. विजय वडेट्टीवार, आ. आशीष देशमुख, आ. समीर मेघे, आ. चरणदास वाघमारे.