शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

विदर्भाची रिकामी झोळी, नागपूर कराराची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2022 10:31 IST

विदर्भ राज्य आंदोलन समितीचा इशारा : यापुढील आंदोलने तीव्र होणार

नागपूर : नागपूर कराराने विदर्भाला २८ सप्टेंबर १९५३ ला महाराष्ट्रात सामील करून घेतले. मात्र, या कराराच्या ११ ही कलमांचे पालन करण्यात आले नाही. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी विदर्भावर अन्यायाची मालिका उभारली. याचा निषेध करीत विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे नागपूर शहरात विविध ठिकाणी नागपूर कराराची होळी करण्यात आली.

व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर तसेच जगनाडे चौक व शहीद चौक विदर्भ चंडिका मंदिरासमोरही नागपूर कराराची होळी करण्यात आली. होळी करताना विदर्भवाद्यांनी ‘जळाला रे जळाला, फसवा करार जळाला’, ‘लेके रहेंगे लेके रहेंगे, विदर्भ राज्य लेकर रहेंगे’ अशा घोषणा दिल्या. आंदोलनात अरुण केदार, प्रकाश पोहरे, संजय मुळे, रवींद्र भामोडे, मुकेश मासुरकर, खा निमजे, सुधा पावडे, प्रभाकर कोंडबत्तुनवार, कोअर कमिटी सदस्य तात्यासाहेब मत्ते, प्रशांत मुळे, ज्योती खांडेकर, ओमप्रकाश शाहू, गुणवंत सोमकुवर यांच्यासह विदर्भवाद्यांनी भाग घेतला.

विदर्भातील बेरोजगारीचे काय ?

- नागपूर कराराच्या अभिवचनाप्रमाणे २३ टक्के नोकऱ्या विदर्भातील तरुणांना देण्याचे कबूल केले होते. मात्र, याउलट चार लाखांहून अधिक नोकऱ्या पळविल्या. त्यामुळे विदर्भात बेरोजगारांची फौज निर्माण झाली आहे. सोबतच विदर्भात कारखाने उभारण्यात न आल्याने मोठ्या प्रमाणात युवकांचे पलायन झाले, असे सांगत याचाही निषेध व्यक्त करण्यात आला.

टॅग्स :PoliticsराजकारणVidarbhaविदर्भ