शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी ६ एप्रिलला ‘रेल रोको’

By admin | Updated: March 6, 2017 02:02 IST

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने सातत्याने आंदोलन सुरू आहे.

विदर्भ राज्य आंदोलन समिती : सेवाग्रामच्या आंदोलनाने वेधणार देशाचे लक्ष नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने सातत्याने आंदोलन सुरू आहे. गेल्या वर्षभरात शांततेच्या मार्गाने सुरू असलेले आंदोलन आता अधिक तीव्र करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. या अंतर्गत जानेवारी महिन्यात विदर्भभर रास्ता रोको करण्यात आले. आता येत्या ६ एप्रिल रोजी रेल रोको आंदोलन करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. सेवाग्राम येथे होणाऱ्या या रेल रोको आंदोलनाद्वारे देशाचे लक्ष विदर्भ राज्याच्या मागणीकडे वेधले जाईल, असा विश्वास समितीचे नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप आणि मुख्य संयोजक राम नेवले यांनी रविवारी पत्रपरिषदेत व्यक्त केला. गिरीपेठ येथील विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यालयात कोर कमिटीची रविवारी बैठक पार पडली. अ‍ॅड. आनंदराव वंजारी हे अध्यक्षस्थानी होते. अ‍ॅड. वामनराव चटप आणि राम नेवले यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. या बैठकीत सेवाग्राम येथे रेल रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्पूर्वी ८ मार्चला नागभीड येथे महिला मेळावा होईल, तर एप्रिलमध्ये बेरोजगारांचा मेळावा होईल. या बैठकीत विदर्भस्तरीय कोर कमिटीचे पुनर्गठन करण्यात आले असून राजू नागुलवार यांची नागपूर शहर अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. बैठकीला प्रबीरकुमार चक्रवर्ती, धर्मराज रेवतकर, अरुण केदार, श्याम वाघ, प्रभाकर कोहळे, अर्चना नंदघले, राजूभाऊ नागुलवार, डॉ. जी.एस. ख्वाजा, राजेंद्र ठाकूर, नीळकंठराव घवघवे, मधुसूदन हरणे, गंगाधर मुटे, तेजराव मुंडे, डॉ. रमेश गजबे, अ‍ॅड. स्नेहल ठाकरे, किशोर पोतनवार, वासुदेवराव नेवारे, रियाझ खान, प्रदीप धामणकर, पवन राऊत, अ‍ॅड. अनिल काळे, शशिकांत मानकर, विनोद भलमे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी) मुख्यमंत्र्यांच्या विरोधात करणार तक्रार शेतकरीविरोधी धोरणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांविरुद्ध ३०२ चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी विरोधी पक्षात असताना केली होती. याची आठवण करून देत अ‍ॅड. चटप यांनी सांगितले की, आजही परिस्थिती बदललेली नाही. त्यामुळे १९ मार्च रोजी यवतमाळ येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर तेथे अभ्यासपूर्ण चर्चा होणार असून, मेळाव्यानंतर कार्यकर्ते यवतमाळ येथील पोलीस अधीक्षकाकडे जाऊन मुख्यमंत्र्यांविरुद्ध ३०६ अन्वये (आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे) गुन्हा दाखल करतील.