शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

विदर्भातील अडीच हजार कोटींच्या कामांना हिरवी झेंडी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2021 15:59 IST

विदर्भातील अडीच हजार कोटींच्या ९१ निविदांनादेखील दिलासा देण्याची तयारी सुरू आहे. सिंचन घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकणसोबतच या निविदादेखील रद्द करण्यात आल्या होत्या.

ठळक मुद्देसिंचन घोटाळ्यावर पडदा पाडण्याकडे सरकारची पावलेविदर्भाच्या ९१ निविदा झाल्या होत्या रद्द

कमल शर्मा

नागपूर : कोकण विभागातील सहा प्रकल्पांच्या निविदा रद्द करण्याचा निर्णय परत घेऊन सिंचन घोटाळ्यावर पडदा टाकण्याचा मानस असल्याचे संकेत राज्य शासनाने दिले आहेत. विदर्भातील अडीच हजार कोटींच्या ९१ निविदांनादेखील दिलासा देण्याची तयारी सुरू आहे. सिंचन घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकणसोबतच या निविदादेखील रद्द करण्यात आल्या होत्या.

१९९९ ते २००९ पर्यंत जवळपास ३५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप लागला होता. दीडशे अधिकाऱ्यांची एसीबीने चौकशी केली होती. प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. तत्कालीन राज्य शासनाने २०१७ मध्ये या पार्श्वभूमीवर निविदा रद्द केल्या होत्या. यात विदर्भातील गोसेखुर्द, बेंबळा यांच्यासह ९१ निविदांचा समावेश होता. यातील काही कामच होऊ शकले आहे. गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प असल्याने बहुतांश कार्य नॅशनल बिल्डिंग कॉर्पोरेशनमार्फत करण्यात आले. परंतु जिगाव, पैनगंगा, वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प अडकले. कोकणासंबंधात झालेल्या निर्णयानंतर कंत्राटदारांकडून विदर्भातील निविदादेखील परत बहाल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

विदर्भातील कंत्राटदारदेखील राहिले शांत

कोकणातील निविदा रद्द झाल्यानंतर कंत्राटदारांनी न्यायालयात धाव घेतली होती. परंतु विदर्भातील कंत्राटदारांनी सरकारला सहकार्य करीत न्यायालयात न जाण्याचा निर्णय घेतला होता. आता राज्य शासनाने कोकणातील कंत्राटदार न्यायालयात गेल्याचे कारण देत निविदा रद्द करण्याचा निर्णय फिरविला. विदर्भातील काम थांबू नये, हा कंत्राटदारांचा मानस होता. त्यामुळे ते न्यायालयात गेले नाही. प्रकल्पाचे काम लवकर व्हावे याला विदर्भातील कंत्राटदारांनी प्राधान्य दिले, असे कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण महाजन यांनी सांगितले.

कोकणसंदर्भात कसा झाला निर्णय?

कोकणातील रद्द निविदांबाबत कंत्राटदारांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने सिंचन विभागाने नियामक आयोगाच्या निर्णयाचा हवाला देत कंत्राटदारांच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. परंतु आयोगाच्या ज्या आदेशाचा हवाला देण्यात आला, त्यात चौकशीची शिफारस करण्यात आली. निविदा रद्द करण्याचा निर्णय कुठल्याही चौकशीविनाच घेण्यात आला.

टॅग्स :Governmentसरकारfundsनिधी