शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

विदर्भ तिसऱ्यांदा रणजी जेतेपदासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 07:21 IST

अक्षय वाडकरच्या नेतृत्वात विदर्भाने सातत्य राखले असून, यंदा विजय हजारे करंडकाची अंतिम फेरीही गाठली होती.

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आघाडीच्या खेळाडूंचा शानदार फॉर्म, सांघिक योगदान तसेच स्थानिक परिस्थितीचा लाभ घेणारा गत उपविजेता विदर्भ संघ व्हीसीएच्या जामठा स्टेडियमवर बुधवारपासून केरळविरुद्ध रणजी करंडक अंतिम सामन्यासाठी सज्ज झाला आहे. यंदा अपराजित राहिलेल्या विदर्भाकडे मुंबईला उपांत्य फेरीत धूळ चारल्यामुळे जेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहे.

अक्षय वाडकरच्या नेतृत्वात विदर्भाने सातत्य राखले असून, यंदा विजय हजारे करंडकाची अंतिम फेरीही गाठली होती. फलंदाजांनी शानदार कामगिरी केली तर गोलंदाजांनीही स्वत:ची भूमिका चोखपणे बजावली. विदर्भ २०१७-१८ आणि २०१८-१९ मध्ये रणजी चॅम्पियन राहिला आहे. तसेच, मागच्या वर्षी फायनलमध्ये मुंबईकडून पराभव पत्करावा लागला होता. दुसरीकडे, केरळ पहिल्यांदा फायनल खेळत असून त्यांना नशीबाचीही मोठी साथ लाभली आहे. 

उपांत्यपूर्व सामन्यात केरळने जम्मू-काश्मीरला केवळ एका धावेच्या आघाडीने नमवले. तर उपांत्य सामन्यात पहिल्या डावात अवघ्या दोन धावांची आघाडी मिळवून गुजरातला नमविले होते. कागदावर दोन्ही संघ मजबूत असून सामन्याच्या पूर्वसंध्येवर मंगळवारी उभय संघांनी कसून सराव केला. सरावानंतर दोन्ही संघांच्या कर्णधारांनी विजयाबद्दल आशा व्यक्त केल्यामुळे लढत निश्चितच संघर्षपूर्ण होणार असली तरी, यजमानांचे पारडे जड आहे. 

१००  बळींचा विक्रम दृष्टिपथात...विदर्भाचा अष्टपैलू फिरकी गोलंदाज २२ वर्षांचा हर्ष दुबे याने यंदा ६६ बळी घेतले. सर्वाधिक बळींपासून तो दोन बळी दूर आहे.  बिहारच्या आशुतोष अमन याने २०१८-१९ मध्ये एका सत्रात ६८ बळी घेतले होते. 

हर्षने फायनमध्ये काही बळी घेतल्यास तो विदर्भाकडून सर्वांत कमी सामन्यात १०० बळींचा टप्पा गाठू शकतो. आदित्य सरवटेने २१ सामन्यांत १०० बळी पूर्ण केले. हर्षला १८ व्या सामन्यात विक्रम मोडण्याची ६ बळींची गरज असेल.

टॅग्स :Ranji Trophyरणजी करंडक