शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

विदर्भ माझा पक्ष लढविणार जिल्हा परिषद निवडणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 00:00 IST

विदर्भातील तीन जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढविण्याचा निर्णय विदर्भ माझा पक्षाने जाहीर केला आहे.

ठळक मुद्देतीन जिल्ह्यात लढणार : विदर्भाचा मुद्दा राजकीय करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील तीन जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढविण्याचा निर्णय विदर्भ माझा पक्षाने जाहीर केला आहे. विदर्भाचा मुद्दा अधिक वेगाने राजकीय बनविण्यासाठी आणि विदर्भासंदर्भात असलेले जनमत मतपेटीतून व्यक्त व्हावे यासाठी या निवडणुका लढविल्या जातील, असे पक्षाच्या वतीने शनिवारी पत्रकार परिषदेतून जाहीर करण्यात आले.यासंदर्भात माहिती देताना पक्षाचे संस्थापक राजकुमार तिरपुडे म्हणाले, विदर्भ राज्य निर्मितीचा उद्देश डोळ्यापुढे ठेवूनच या पक्षाची स्थापना झाली आहे. माजी उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे यांच्या कार्याची प्रेरणा यामागे आहे. वेगळ्या विदर्भ राज्य निर्मितीच्या मागणीसाठी पक्षाने प्रत्येक वेळी आपली स्पष्ट भूमिका ठेवली आहे. या वेळीही विदर्भनिर्मितीच्या उद्देशानेच फक्त विदर्भातील तिन्ही जिल्ह्यात आपला पक्ष मैदानात उतरणार आहे. बहुतेक सर्वच जागा पक्षाकडून लढल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.स्थानिक पक्ष बळकट होणार नाही आणि मागणीसाठी भक्कमपणे पुढे येणार नाही, तोपर्यंत राज्यनिर्मितीचे वातावरण तयार होणार नाही. तेलंगणाच्या निर्मितीपूर्वी स्थानिक राजकीय पक्षांनी वारंवार निवडणुका लढविल्या. त्यातून राज्यनिर्मितीसंदर्भात असणारे जनमत स्पष्ट होत गेले. ९० ते ९५ टक्के जनता विदर्भ राज्य निर्मितीच्या बाजूने असल्याचा दावा तिरपुडे यांनी यावेळी केला. मतदानातून नागरिकांनी तो व्यक्त करावा, अशी विनंती आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर जिल्ह्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका दीपक पालीवाल यांच्या नेतृत्वात तर पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष अजाबराव टाले यांच्या नेतृत्वात अकोला आणि वाशीम जिल्ह्यातील निवडणुका लढविल्या जातील, असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला दीपक पालीवाल, बाबा कोंबाडे, मंगेश तेलंग, किरण बोरकर, संजय कटकमवार, ज्ञानेश्वर गुरव आदी उपस्थित होते.

टॅग्स :zpजिल्हा परिषदElectionनिवडणूक