शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ साहित्य संघ; आमसभा आटोपली केवळ ३० मिनिटांत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 12:45 IST

अ.भा. मराठी साहित्य महामंडळाची घटक संस्था असलेल्या विदर्भ साहित्य संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी २८ जुलै रोजी केवळ ३० मिनिटात आटोपली, हेच या आमसभेचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

ठळक मुद्देउपस्थिती नसल्यामुळे, मुद्दे मांडण्याचे औचित्यच उरले नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अ.भा. मराठी साहित्य महामंडळाची घटक संस्था असलेल्या विदर्भ साहित्य संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी २८ जुलै रोजी केवळ ३० मिनिटात आटोपली, हेच या आमसभेचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.साधारणत: कोणत्याही संस्थेची वार्षिक आमसभा म्हटली की, बैठकीसंदर्भात सभासदांमध्ये बरेच आकर्षण असल्याचे दिसून येते. सभेमध्ये उपस्थित करावयाचे मुद्दे, मागील धोरणावर आक्षेप-टीका-दुरुस्ती आणि संस्थात्मक कार्यासंदर्भात शहर, राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेल्या विषयांवरील संस्थेची धोरणे.. असा सारा खल होत असतो. त्यातच, साहित्य विश्वात असे खल होणे म्हणजे, वर्तमानात निर्माण झालेल्या स्थितीवरून तरी सवयीचा विषय. असे असतानाही, वि.सा. संघाची आमसभा केवळ १९ पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत केवळ ३० मिनिटात आटोपली, हेच या सभेचे वैशिष्ट म्हणून अधोरेखित करावे लागेल. सध्या महाराष्ट्रात मराठी भाषा आणि शाळांसदर्भात निर्माण झालेल्या उदासीन धोरणाबाबत वेगवेगळ्या संस्था व संघटनांकडून विषय लावून धरण्यात येत आहे. त्यात सगळ्यात पुढे अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष व वि.सा. संघाचे उपाध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी आहेत. शिवाय, केंद्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या नव्या शिक्षणाच्या मसुद्यावरही बरेच आक्षेप घेतले जात आहेत. विशेष म्हणजे, हा मसुदा मराठीसह अन्य कोणत्याही प्रादेशिक भाषेत नसल्यामुळे, हा विषय आमसभेत चर्चेत येणे अपेक्षित होते. घटनेनुसार असे मुद्दे उपस्थित करण्याचे अधिकार प्रत्येक सभासदाला आहेत. मात्र, आमसभेत या विषयांसंदर्भात ना कोणते प्रस्ताव, ठराव सादर करण्यात आले ना टीका, टिपणी किंवा निषेध व्यक्त करण्याची तसदी घेतली गेली नाही. वि.सा. संघाच्या धोरणाबाबतही कुठलाही विचार उपस्थित केला गेला नाही. सगळेच गृहित मानून अध्यक्षांनी विषय ठेवले आणि बोटावर मोजण्याइतक्या उपस्थित सदस्यांच्या मान्यतेने ते विषय मार्गी लावण्यात आले. खरे सांगायचे तर, सभासदांची उपस्थितीच तोकडी असल्याने आणि बोलणारे व मुद्दे उपस्थित करणारेच उपस्थित नसल्याने, सभा अवघ्या ३० मिनिटात आटोपण्यात आली.सभासदांना निरोप पोहोचलेच नाही!संस्थेच्या प्रत्येक सभासदाकडे वि.सा. संघाकडून काढण्यात येत असलेल्या ‘युगवाणी’ या त्रैमासिकाद्वारे संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रम व विशेष घटनेबाबत माहिती पोहोचत होती. त्रैमासिक पूर्वी नि:शुल्क पोहोचविण्यात येत असे. मात्र, आता सभासदांची संख्या प्रचंड वाढली असल्याने, त्रैमासिकाचा खर्च पेलवत नसल्याने, प्रति अंक शंभर रुपये देणगी आकारली जाते. हे मासिक प्रत्येकच सभासद घेतो असे नाही आणि त्यामुळेच, सभासदांपर्यंत आमसभेचा निरोप पोहोचला नसल्याचे सांगण्यात येते. मात्र, स्मार्टफोनच्या काळात सभेचा निरोप पोहोचला नसावा... अशा शक्यतेला बळ मिळत नसून, सभासदांमध्ये साहित्य संघाकडे बघण्याच्या दृष्टिकोनातच उदासीनता असल्याचे दिसून येते. 

टॅग्स :Vidarbha Sahitya Sanghविदर्भ साहित्य संघ