शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

मराठी विश्वकोश निर्मिती आणि साहित्य-संस्कृती मंडळावर विदर्भाला नगण्य स्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 07:18 IST

Nagpur News महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि साहित्य व संस्कृती मंडळ अध्यक्ष व सदस्यांची घोषणा करण्यात आली. या दोन्ही मंडळांवर विदर्भातून एक-एक सदस्य निवडला गेल्याने वैदर्भीय साहित्य क्षेत्रातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देरवींद्र शोभणे, रवींद्र रुक्मिणी यांना सदस्यपदी संधी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि साहित्य व संस्कृती मंडळ अध्यक्ष व सदस्यांची घोषणा करण्यात आली. या दोन्ही मंडळांवर विदर्भातून एक-एक सदस्य निवडला गेल्याने वैदर्भीय साहित्य क्षेत्रातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळावर डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ३० सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. या सदस्यांमध्ये विदर्भातून डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली आहे. विश्वकोष निर्मिती मंडळावर डॉ. श्रीधर उपाख्य राजा दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात आलेल्या २५ सदस्यांमध्ये विदर्भातून केवळ रवींद्र रुक्मिणी रवींद्रनाथ यांचाच समावेश आहे.

विदर्भ सोडलेल्यांना वैदर्भीयांनीही सोडले का?

दोन्ही मंडळांवर निवडण्यात आलेल्या सदस्यांमध्ये काही माजी वैदर्भीय साहित्यिक व मराठी भाषा अभ्यासकांचा समावेश आहे. त्यात प्रेमानंद गजवी, नागनाथ कोतापल्ले यांच्यासारख्यांचा समावेश आहे. त्यांनी विदर्भ सोडण्याची कारणे वैयक्तिक होती. मात्र, विदर्भप्रेम त्यांनी कायम जपले आहे. मात्र, वैदर्भीय साहित्यिक त्यांना वैदर्भीय मानत नाही का, असा सवाल उपस्थित व्हायला लागला आहे.

द्वादशीवार यांच्यानंतर विदर्भाला अध्यक्षपद नाहीच

- प्रा. डॉ. सुरेश द्वादशीवार हे १९९९-२००० या काळात साहित्य व संस्कृती मंडळावर अध्यक्ष होते. काही कारणास्तव त्यांनी राजीनामा दिला होता. तेव्हापासून या मंडळावर विदर्भातून अध्यक्ष लाभले नाहीत.

विदर्भात गुणवत्ता नाही का?

गेल्या काही टर्ममध्ये या दोन्ही मंडळांवर तीच ती नावे, तेच ते अध्यक्ष बघतो आहोत. अशाने नवीन लोकांना संधी कधी मिळणार? विदर्भात ११ जिल्हे आहेत आणि प्रत्येक वेळी एक किंवा दोन सदस्य अशी स्थिती असते. सगळ्या जिल्ह्यांना समान न्याय या नात्याने प्रत्येक जिल्ह्यातून एक सदस्य घेणे अपेक्षित आहे, अन्यथा विदर्भ तोडून तरी टाका.

- डॉ. मनोज तायडे, अमरावती

.......

टॅग्स :Vidarbhaविदर्भliteratureसाहित्य