शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

विदर्भाला अवकाळी पावसाचा फटका; संत्रा, मोसंबी, भाजीपाल्यासह रब्बी पिकांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 20:09 IST

Nagpur News विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना अवकाळी पावसाने व गारपिटीने झोडपून काढले आहे. यात रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

नागपूरः नागपूरसह अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना अक्षरशः झोडपले. विशेषतः सावनेर, कामठी, पारशिवनी व रामटेक तालुक्यात पावसाचा जोर जास्त होता. रामटेकसह परिसरात गारपिटीमुळे संत्रा, मोसंबी, भाजीपाला यांच्यासह रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले.

सावनेर तालुक्यातील चनकापूर, सिल्लेवाडा, दहेगाव (रंगारी), वलनी, रोहणा आणि पिपळा (डाक बंगला), तसेच कन्हान नदीकाठची काही गावे, कामठी तालुक्यातील कोराडी, महादुला, नांदा, तसेच पारशिवनी तालुक्यातील दहेगाव(जोशी)सह परिसरातील गावांमधील संत्रा व मोसंबी, तसेच कापणीला आलेली तूर, कपाशी, गहू, हरभरा, टोमॅटो यासह अन्य भाजीपाल्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रामटेकजवळील दाहोदा आणि घोटी या गावात गारपीट झाली आहे. त्यामुळे गारांचा मोठा थर साचला होता. काही ठिकाणी मोठी झाडेही कोसळली.

भंडारा जिल्ह्यात घरांचे नुकसान

मंगळवारी भंडारा शहरासह चार तालुक्यांत पावसाची नोंद करण्यात आली. पवनी तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे वादळी वाऱ्यामुळे दोन घरांसह काही पानठेल्यावरील टिनाचे पत्रे उडून गेले.

गडचिरोली जिल्ह्यात वाहतूक विस्कळीत

साेमवारी व मंगळवारी गडचिराेली जिल्ह्याला पावसाने झाेडपून काढले. साेमवारी रात्री व मंगळवारीही दमदार पाऊस झाला. आजपर्यंत काेरडे पडलेले नदी-नाले अवकाळी पावसाच्या तडाख्याने ओसंडून वाहू लागले. मिरची, कापूस व इतर रब्बी पिकांचे माेठे नुकसान झाले. गाेविंदपूर नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू आहे. हा नाला ओसंडून वाहू लागल्याने चामाेर्शी-गडचिराेली मार्गावरील वाहतूक मंगळवारी सकाळी काळी काळ ठप्प पडली हाेती.

गोंदिया जिल्ह्यात २४ हजार हेक्टरवरील पिकांना फटका

गोंदिया जिल्ह्यात सकाळी १० वाजताच्या सुमारास जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सडक अर्जुनी तालुक्यात काही ठिकाणी झाडांची पडझड झाली. अवकाळी पावसामुळे २४ हजार हेक्टरमधील पिकांना फटका बसला असून, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

पावसाची शक्यता कायम

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, पश्चिम किनारपट्टीवरील वातावरण बदलामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे अवकाळी पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला होताच. मुसळधार पावसामुळे वातावरणातील गारठाही वाढला. पुढील दोन दिवस जिल्ह्यात हवामानाची हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस