शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

यंदा पीक विम्यासाठी विदर्भातील शेतकरी अनुत्साही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 11:13 IST

पिकांचे झालेले नुकसानाची भरपाई देताना विमा कंपन्यांच्या आडमुठ्या भूमिकेचा शेतकऱ्यांना आलेला प्रत्यय आणि यंदा पाऊस चांगला झाल्याने पीकही चांगले होण्याची शक्यता लक्षात घेता पीक विमा काढण्यासाठी शेतकरी फारसे उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्दे३१ जुलैपर्यंत मुदतवाढ विमा कंपन्यांच्या आलेल्या अनुभवाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पिकांचे झालेले नुकसानाची भरपाई देताना विमा कंपन्यांच्या आडमुठ्या भूमिकेचा शेतकऱ्यांना आलेला प्रत्यय आणि यंदा पाऊस चांगला झाल्याने पीकही चांगले होण्याची शक्यता लक्षात घेता पीक विमा काढण्यासाठी शेतकरी फारसे उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच कृषी विभागाने पीक विम्याची तरीख ३१ जुलैपर्यंत वाढवून दिली असून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०१८ अंतर्गत बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असून कर्जदार शेतकऱ्यांसाठी अनिवार्य आहे.कर्जदार शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत पिकांचा विमा उतरविणे आवश्यक आहे. तालुकानिहाय पीक हंगामासाठी आठ अधिसूचित पिकांसाठी संपूर्ण नागपूर जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत आहे.यामध्ये हंगामी पिकांसाठी २ टक्के तर नगदी पिकांसाठी ५ टक्के विमा हप्ता रक्कम निश्चित केली असून सर्व पिकांसाठी जोखिमस्तर ७० टक्के निश्चित केलेला आहे. परंतु शेतकऱ्यांचा पाहिजे तसा उत्साह दिसून येत नाही. यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकरी उत्सुक नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे असले तरी विमा कंपन्यांची एकूणच भूमिका ही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची नसल्याचा प्रत्यय शेतकऱ्यांना वेळोवेळी आलेला आहे.त्यामुळेच शेतकरी विमा काढण्यासाठी फारसे उत्सुक नाहीत. दरम्यान खरीप हंगामातील सर्व पिकांच्या संरक्षणासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत ३१ जुलैपूर्वी सहभागी होऊन पिकांचा विमा उतरविण्यात यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी केले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी