शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

यंदा पीक विम्यासाठी विदर्भातील शेतकरी अनुत्साही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 11:13 IST

पिकांचे झालेले नुकसानाची भरपाई देताना विमा कंपन्यांच्या आडमुठ्या भूमिकेचा शेतकऱ्यांना आलेला प्रत्यय आणि यंदा पाऊस चांगला झाल्याने पीकही चांगले होण्याची शक्यता लक्षात घेता पीक विमा काढण्यासाठी शेतकरी फारसे उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्दे३१ जुलैपर्यंत मुदतवाढ विमा कंपन्यांच्या आलेल्या अनुभवाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पिकांचे झालेले नुकसानाची भरपाई देताना विमा कंपन्यांच्या आडमुठ्या भूमिकेचा शेतकऱ्यांना आलेला प्रत्यय आणि यंदा पाऊस चांगला झाल्याने पीकही चांगले होण्याची शक्यता लक्षात घेता पीक विमा काढण्यासाठी शेतकरी फारसे उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच कृषी विभागाने पीक विम्याची तरीख ३१ जुलैपर्यंत वाढवून दिली असून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०१८ अंतर्गत बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असून कर्जदार शेतकऱ्यांसाठी अनिवार्य आहे.कर्जदार शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत पिकांचा विमा उतरविणे आवश्यक आहे. तालुकानिहाय पीक हंगामासाठी आठ अधिसूचित पिकांसाठी संपूर्ण नागपूर जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत आहे.यामध्ये हंगामी पिकांसाठी २ टक्के तर नगदी पिकांसाठी ५ टक्के विमा हप्ता रक्कम निश्चित केली असून सर्व पिकांसाठी जोखिमस्तर ७० टक्के निश्चित केलेला आहे. परंतु शेतकऱ्यांचा पाहिजे तसा उत्साह दिसून येत नाही. यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकरी उत्सुक नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे असले तरी विमा कंपन्यांची एकूणच भूमिका ही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची नसल्याचा प्रत्यय शेतकऱ्यांना वेळोवेळी आलेला आहे.त्यामुळेच शेतकरी विमा काढण्यासाठी फारसे उत्सुक नाहीत. दरम्यान खरीप हंगामातील सर्व पिकांच्या संरक्षणासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत ३१ जुलैपूर्वी सहभागी होऊन पिकांचा विमा उतरविण्यात यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी केले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी