शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सरची विदर्भ ‘राजधानी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 23:54 IST

भारतात दरवर्षी कॅन्सरमुळे १० लाख रुग्णांचा मृत्यू होतो. देशातील इतर राज्याच्या तुलनेत या रोगाच्या अकाली मृत्यूमध्ये  महाराष्ट्रचा तिसरा क्रमांक लागतो. यात ‘हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सर’मध्ये विदर्भ ‘राजधानी’ ठरत असून, नागपुरात इतर कॅन्सरच्या तुलनेत याचे २२.७ टक्के रुग्ण आहेत. विशेष म्हणजे, मेडिकलमध्ये कॅन्सरच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. २०१७ मध्ये २,४६३ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, यातील ७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्दे२२.७ टक्के रुग्ण : मेडिकलमध्ये गेल्या वर्षी २,४६३ नव्या रुग्णांची नोंदजागतिक कर्करोग दिन

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात दरवर्षी कॅन्सरमुळे १० लाख रुग्णांचा मृत्यू होतो. देशातील इतर राज्याच्या तुलनेत या रोगाच्या अकाली मृत्यूमध्ये  महाराष्ट्रचा तिसरा क्रमांक लागतो. यात ‘हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सर’मध्ये विदर्भ ‘राजधानी’ ठरत असून, नागपुरात इतर कॅन्सरच्या तुलनेत याचे २२.७ टक्के रुग्ण आहेत. विशेष म्हणजे, मेडिकलमध्ये कॅन्सरच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. २०१७ मध्ये २,४६३ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, यातील ७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.५० टक्के कर्करोगाला (कॅन्सर) तंबाखू हे कारणीभूत ठरते. भारतात ३४.६ टक्के लोक तंबाखूचे सेवन करतात. यात सिगारेट ओढणारे ५.७ टक्के, बिडी ओढणारे ९.२ टक्के तर तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्यांची संख्या २५.९ टक्के आहे.  महाराष्ट्रात हेच प्रमाण ३१.४ टक्के आहे. ३.४ टक्के लोक सिगारेट ओढतात, २.७ टक्के बिडी ओढतात तर २७.६ टक्के मुले तंबाखूजन्य पदार्थ खातात. नागपुरात एक लाख लोकसंख्येच्या तुलनेत नव्याने आढळून येणाऱ्या कॅन्सरच्या रुग्णांमध्ये ४९.४ टक्के पुरुष रुग्ण हे तंबाखूशी संबंधित कॅन्सरचे आहेत, तर यात महिलांची टक्केवारी १८.२ टक्के आहे.कॅन्सरची ओपीडी ३०० ने वाढली - डॉ. दिवाणमेडिकलच्या कॅन्सर विभागाचे प्रमुख डॉ. अशोक दिवाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१५ मध्ये बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) २,२२५ नव्या रुग्णांची नोंद झाली. २०१६ मध्ये ही संख्या २,१५७ होती तर गेल्या वर्षी यात ३०० ने वाढ होऊन नव्या रुग्णांची संख्या २,४६३ वर पोहोचली आहे. यातील ७१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.दरवर्षी कॅन्सरच्या रुग्णांत १० टक्क्यांनी वाढ - डॉ. कांबळेमेडिकलच्या कॅन्सर रोग विभागाचे प्राध्यापक डॉ. कृष्णा कांबळे यांनी सांगितले की, दरवर्षी कॅन्सरच्या रुग्णांत १० टक्क्यांनी वाढ होत आहे. त्यातुलनेत शासकीय सोयी उपलब्ध नाहीत. मेडिकलमध्ये आजही कालबाह्य झालेल्या कोबाल्ट यंत्रावर रुग्णांवर उपचार होतात. विदर्भात वाढत्या कॅन्सर रुग्णांसाठी कॅन्सर इन्स्टिट्यूट महत्त्वाचे झाले आहे. शासनाने त्यादृष्टीने वेगाने पाऊल टाकणे आवश्यक आहे.२०२० पर्यंत १७.३ लाख नवे रुग्ण-डॉ. मानधनियाप्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉ. सुशील मानधनिया यांनी सांगितले, भारतात सध्या ३ दशलक्ष लोक कॅन्सरने ग्रस्त आहेत. २०२० पर्यंत कॅन्सरच्या नव्या रुग्णांची संख्या १७.३ लाखांवर आणि ८.७ लाख सांभाव्य मृत्यूची शक्यता आहे. पुरुषांमध्ये ‘ओरल’, ‘लंग्स’ तर महिलांमध्ये गर्भाशय व स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाण मोठे असून मृत्यूचा धोका ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.दुसऱ्या क्रमांकावर गर्भाशयाचा कॅन्सर२०१४मधील नागपुरातील कॅन्सरच्या आकडेवारीनुसार, इतर कॅन्सरच्या तुलनेत ‘हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सर’चे सर्वाधिक म्हणजे २२.७ टक्के रुग्ण आहेत.दुसऱ्या क्रमांकावर गर्भाशयाच्या कॅन्सरचे १५.१ टक्के तर स्तनाच्या कॅन्सरचे १४.९ टक्के रुग्ण आहेत.कॅन्सर इन्स्टिट्यूटसाठी आले २० कोटीगेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कॅन्सर इन्स्टिट्यूटचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. शासनाने यंत्रसामुग्रीसाठी २० कोटी रुपये दिले. परंतु इमारत नसताना यंत्रसामुग्रीसाठी देण्यात आलेला हा निधी वादात सापडला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच बैठक घेऊन हा निधी कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या बांधकामासाठी वापरण्यास मंजुरी दिल्याचे समजते. यामुळे पुढील काही महिन्यात इन्स्टिट्यूच्या बांधकामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :cancerकर्करोगnagpurनागपूर