शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
2
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
3
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
4
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
5
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
6
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
7
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
8
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
9
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
10
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
11
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
12
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
13
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
14
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
15
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
16
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
17
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
18
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
19
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
20
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...

हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सरची विदर्भ ‘राजधानी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 23:54 IST

भारतात दरवर्षी कॅन्सरमुळे १० लाख रुग्णांचा मृत्यू होतो. देशातील इतर राज्याच्या तुलनेत या रोगाच्या अकाली मृत्यूमध्ये  महाराष्ट्रचा तिसरा क्रमांक लागतो. यात ‘हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सर’मध्ये विदर्भ ‘राजधानी’ ठरत असून, नागपुरात इतर कॅन्सरच्या तुलनेत याचे २२.७ टक्के रुग्ण आहेत. विशेष म्हणजे, मेडिकलमध्ये कॅन्सरच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. २०१७ मध्ये २,४६३ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, यातील ७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्दे२२.७ टक्के रुग्ण : मेडिकलमध्ये गेल्या वर्षी २,४६३ नव्या रुग्णांची नोंदजागतिक कर्करोग दिन

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात दरवर्षी कॅन्सरमुळे १० लाख रुग्णांचा मृत्यू होतो. देशातील इतर राज्याच्या तुलनेत या रोगाच्या अकाली मृत्यूमध्ये  महाराष्ट्रचा तिसरा क्रमांक लागतो. यात ‘हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सर’मध्ये विदर्भ ‘राजधानी’ ठरत असून, नागपुरात इतर कॅन्सरच्या तुलनेत याचे २२.७ टक्के रुग्ण आहेत. विशेष म्हणजे, मेडिकलमध्ये कॅन्सरच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. २०१७ मध्ये २,४६३ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, यातील ७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.५० टक्के कर्करोगाला (कॅन्सर) तंबाखू हे कारणीभूत ठरते. भारतात ३४.६ टक्के लोक तंबाखूचे सेवन करतात. यात सिगारेट ओढणारे ५.७ टक्के, बिडी ओढणारे ९.२ टक्के तर तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्यांची संख्या २५.९ टक्के आहे.  महाराष्ट्रात हेच प्रमाण ३१.४ टक्के आहे. ३.४ टक्के लोक सिगारेट ओढतात, २.७ टक्के बिडी ओढतात तर २७.६ टक्के मुले तंबाखूजन्य पदार्थ खातात. नागपुरात एक लाख लोकसंख्येच्या तुलनेत नव्याने आढळून येणाऱ्या कॅन्सरच्या रुग्णांमध्ये ४९.४ टक्के पुरुष रुग्ण हे तंबाखूशी संबंधित कॅन्सरचे आहेत, तर यात महिलांची टक्केवारी १८.२ टक्के आहे.कॅन्सरची ओपीडी ३०० ने वाढली - डॉ. दिवाणमेडिकलच्या कॅन्सर विभागाचे प्रमुख डॉ. अशोक दिवाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१५ मध्ये बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) २,२२५ नव्या रुग्णांची नोंद झाली. २०१६ मध्ये ही संख्या २,१५७ होती तर गेल्या वर्षी यात ३०० ने वाढ होऊन नव्या रुग्णांची संख्या २,४६३ वर पोहोचली आहे. यातील ७१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.दरवर्षी कॅन्सरच्या रुग्णांत १० टक्क्यांनी वाढ - डॉ. कांबळेमेडिकलच्या कॅन्सर रोग विभागाचे प्राध्यापक डॉ. कृष्णा कांबळे यांनी सांगितले की, दरवर्षी कॅन्सरच्या रुग्णांत १० टक्क्यांनी वाढ होत आहे. त्यातुलनेत शासकीय सोयी उपलब्ध नाहीत. मेडिकलमध्ये आजही कालबाह्य झालेल्या कोबाल्ट यंत्रावर रुग्णांवर उपचार होतात. विदर्भात वाढत्या कॅन्सर रुग्णांसाठी कॅन्सर इन्स्टिट्यूट महत्त्वाचे झाले आहे. शासनाने त्यादृष्टीने वेगाने पाऊल टाकणे आवश्यक आहे.२०२० पर्यंत १७.३ लाख नवे रुग्ण-डॉ. मानधनियाप्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉ. सुशील मानधनिया यांनी सांगितले, भारतात सध्या ३ दशलक्ष लोक कॅन्सरने ग्रस्त आहेत. २०२० पर्यंत कॅन्सरच्या नव्या रुग्णांची संख्या १७.३ लाखांवर आणि ८.७ लाख सांभाव्य मृत्यूची शक्यता आहे. पुरुषांमध्ये ‘ओरल’, ‘लंग्स’ तर महिलांमध्ये गर्भाशय व स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाण मोठे असून मृत्यूचा धोका ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.दुसऱ्या क्रमांकावर गर्भाशयाचा कॅन्सर२०१४मधील नागपुरातील कॅन्सरच्या आकडेवारीनुसार, इतर कॅन्सरच्या तुलनेत ‘हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सर’चे सर्वाधिक म्हणजे २२.७ टक्के रुग्ण आहेत.दुसऱ्या क्रमांकावर गर्भाशयाच्या कॅन्सरचे १५.१ टक्के तर स्तनाच्या कॅन्सरचे १४.९ टक्के रुग्ण आहेत.कॅन्सर इन्स्टिट्यूटसाठी आले २० कोटीगेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कॅन्सर इन्स्टिट्यूटचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. शासनाने यंत्रसामुग्रीसाठी २० कोटी रुपये दिले. परंतु इमारत नसताना यंत्रसामुग्रीसाठी देण्यात आलेला हा निधी वादात सापडला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच बैठक घेऊन हा निधी कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या बांधकामासाठी वापरण्यास मंजुरी दिल्याचे समजते. यामुळे पुढील काही महिन्यात इन्स्टिट्यूच्या बांधकामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :cancerकर्करोगnagpurनागपूर